शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
3
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
8
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
9
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
10
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
11
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
12
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

धरण दुस-यांदा ओव्हरफ्लो ; ४ हजार क्युसेक्सने पाणी नदी पात्रात झेपावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 17:37 IST

धरण अभियंता शामराव बुधवंत यांनी कळ दाबल्यानंतर पाण्याचा विसर्ग सुरू झाला. मुळा धरणाच्या पाणालोट क्षेत्रावर पावसाने हजेरी लावली आहे. सकाळी ६ वाजता २ हजार क्सुसेक्सने पाणी सोडण्यात आले. त्यानंतर सकाळी ९ वाजता ४ हजार क्युसेक्सने पाणी नदी पात्रात सोडण्यात आले.

राहुरी : दक्षिण अहमदनगर जिल्हयाची जीवनवाहिनी असलेल्या मुळा धरणाचे ११ दरवाजे उघडून बुधवारी सकाळी ४ हजार क्युसेक्सने पाणी मुळा नदी पात्रात सोडण्यात आले.धरण अभियंता शामराव बुधवंत यांनी कळ दाबल्यानंतर पाण्याचा विसर्ग सुरू झाला. मुळा धरणाच्या पाणालोट क्षेत्रावर पावसाने हजेरी लावली आहे. सकाळी ६ वाजता २ हजार क्सुसेक्सने पाणी सोडण्यात आले. त्यानंतर सकाळी ९ वाजता ४ हजार क्युसेक्सने पाणी नदी पात्रात सोडण्यात आले. ११ दरवाजे प्रत्येकी चार इंच उंच करून पाण्याला वाट करून देण्यात आली.२६ हजार दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमतेचे मुळा धरण पुन्हा एकदा पूर्ण क्षमतेने भरले़ कोतूळ येथे १५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली़ नदी पात्रात पाणी सोडण्यापूर्वी मुळा नदी काठी असलेल्या ग्रामपंचयाती,राहुरी पोलीस ठाणे, तहसील कार्यालय यांना पाटबंधारे खात्याने कळविले. मुळा धरणावर असलेला भोंगा वाजवून सावधानतेचा इशारा देण्यात आला. यावेळी धरण शाखा अभियंता शामराव बुधवंत, सतीश जाधव,संदीप शिंगाडे, गुलाब शेख, दिलीप कुलकर्णी, दत्तू पवार, बबन शिंदे, सलीम शेख आदी उपस्थित होते.बुधवारी दिवसभर लाभक्षेत्र व पाणलोट क्षेत्रावर पावसाची रिमझिम सुरू होती़ परतीचा पाऊस असल्याने शेतकºयांचे लक्ष आभाळाकडे लागले आहे. पावसामुळे शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे. दिवसभर ढगाळ वातावरण असल्याने सूर्यदर्शन झाले नाही़ मंगळवारी रात्रभर पाऊस सुरू होता. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले.या पावसाळ्यात मुळा धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतर २१ सप्टेंबरला मुळा नदी पात्रात पाणी सोडण्यात आले होते. गेल्या आठवड्यात आवक घटल्याने पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला होता़ बुधवार ११ आॅक्टोबरला धरण दुस-यांदा ओव्हरफ्लो होऊन त्यातून पाणी सोडण्यात आले. १९७१ पासून मुळा धरण २७ वेळा पूर्ण क्षमतेने भरले.

मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर पावसाने हजेरी लावली आहे़ पाण्याची नव्याने आवक सुरू झाल्याने नदी पात्रात ४ हजार क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणाची पातळी प्रत्येक तासाला तपासली जात आहे़ अधुनमधून पावसाच्या सरी सुरू आहेत़ २६ हजार द.ल.घ.फू. पाण्याचा साठा कायम ठेऊन आलेले पाणी नदी पात्रात सोडले जात आहे़ पावसाची शक्यता लक्षात घेता नदी कठावरील गावक-यांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.-शामराव बुधवंत मुळा धरण अभियंता, राहुरी.