शहरं
Join us  
Trending Stories
1
महागठबंधन नव्हे महालठबंधन, NDA मोडणार सर्व विक्रम; PM मोदींनी फुंकले प्रचाराचे रणशिंग
2
“...आता राज्यात ‘नैसर्गिक शेती मिशन’ राबविणार”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
3
देवाकडून मार्गदर्शन मागणे म्हणजे फसवणूक नाही; राम मंदिरचा निर्णय अवैध ठरवायची याचिका फेटाळली
4
भारत व्यापार करार दबावाखाली करत नाही; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी अमेरिकेला ठणकावले
5
लोकपाल सदस्यांना बीएमडब्ल्यू देण्यावरून राजकारण तापले; आता स्वदेशी चळवळीचे काय झाले?
6
कोणत्याही शत्रूला कमी न लेखता लष्करी जवानांनी सदैव सतर्क राहावे: संरक्षण मंत्री राजनाथसिंह
7
“तेजस्वी मुख्यमंत्री म्हणजे बिहारचे लोक मुख्यमंत्री”; पहिल्या दिवसापासूनच प्रचार धडाका
8
“राजदचा लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर बिहारमध्ये खऱ्या अर्थाने दिवाळी”: अमित शाह
9
बिहार निवडणूक २०२५: दुसऱ्या टप्प्यात १२२ जागा, १३०२ जण रिंगणात; १३७२ उमेदवारांचे अर्ज वैध
10
भारतीय कंपन्या रशियन तेलाची खरेदी घटवणार; अमेरिकेकडून वाढवणार, तज्ज्ञांची माहिती
11
भारतातून ३०० कोटींच्या शेणाची निर्यात; आंतरराष्ट्रीय बाजारात गायीच्या शेणाला मागणी
12
अमेरिकन कामगारांवर अन्याय, एच-१बी व्हिसा शुल्क विरुद्धचे खटले लढू; ट्रम्प प्रशासनाचा निर्धार
13
२५० कोटी व्याजासह जमा करा तरच म्हणणे ऐकू! मुंबई मेट्रोची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
14
झुबीनचा मृत्यू कशामुळे? सिंगापूर पोलिस देणार पुरावे, CCTV फुटेज अन् जबाब दहा दिवसांत मिळणार
15
वायुप्रदूषणामुळे भारतात २०२३ मध्ये झाले २० लाख मृत्यू, संशोधन अहवालातील माहिती
16
इस्लामाबाद पोलीस एसपी होते भारताचे गुप्तहेर?; रहस्यमय मृत्यूनंतर सोशल मीडियात चर्चेला उधाण
17
२००२ मध्ये भारत-पाक युद्ध होणार होते?; माजी CIA एजेंटचा मुशर्रफ यांच्याबद्दल धक्कादायक खुलासा
18
राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंगनं बाजी पलटली; २८ आमदार असताना भाजपानं ३२ मते कशी मिळवली?
19
IND vs AUS 3rd ODI Live Streaming : टीम इंडियासमोर 'व्हाइट वॉश' टाळण्याचं आव्हान
20
'मोदीज मिशन' पुस्तकातील काही भाग शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करावा; एकनाथ शिंदेंची मागणी

दररोज होणाऱ्या पावसाने खरिपाची पिके धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:17 IST

शेवगाव : गत दहा-बारा दिवसांपासून तालुक्यातील आखेगाव परिसरात दररोज पाऊस कोसळत असल्याने शेतात पाणी साचून खरीप हंगामातील पिके धोक्यात ...

शेवगाव : गत दहा-बारा दिवसांपासून तालुक्यातील आखेगाव परिसरात दररोज पाऊस कोसळत असल्याने शेतात पाणी साचून खरीप हंगामातील पिके धोक्यात आली आहेत. पाणी साचून राहिल्याने शिवार जलमय झाला आहे. परिणामी शेकडो हेक्‍टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. अजूनही परिसरात पाऊस होत आहे. त्यामुळे नुकसानीचा आकडा वाढण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांना यंदाचा खरीप हंगाम पदरात पडेल, अशी अपेक्षा होती. मात्र अति पावसाने हातचे पीक वाया जात असल्याचे शेतकऱ्यांना पाहावे लागत आहे. आखेगाव परिसरात दहा ते बारा दिवसांपासून रोज पाऊस कोसळत आहे. त्यामुळे सखल भागात अति पावसाने शेतांमध्ये पाणी उफाळून आल्याने पिके पाण्याखाली गेली आहेत. पाणी साचून चिखल व पाण्यामुळे बहरलेल्या पिकांची मुळे सडून पिके वाया गेली आहेत. परिसरातील शेतकऱ्यांनी कापूस, बाजरी, तूर, मूग, भुईमूग आदी पिकांची पेरणी व लागवड मोठ्या प्रमाणात केली होती. जूनच्या सुरुवातीला व त्यानंतर झालेल्या पावसाने पिके बहारदार उगवून आली होती. मात्र दररोज होणाऱ्या पावसाने पीक वाया जाऊन मशागत, बी-बियाणांसाठी केलेली मेहनत व खर्च वाया गेला आहे.

परिसरात रोज होणाऱ्या पावसाने मोठ्या प्रमाणात शेतात पाणी साचून पिकांची मुळे कुजली आहेत. त्यामुळे मोठे नुकसान झाले असल्याचे आखेगावचे शेतकरी दादासाहेब डोंगरे यांनी सांगितले.

-----

खर्चाची जुळवाजुळव करताना अडचणी...

मशागत व झालेला खर्च वाया गेल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. शेतात साचलेल्या पाण्याचा निचरा होऊन वापसा मिळाल्यानंतरच रब्बी हंगामाची तयारी परिसरातील शेतकऱ्यांना करता येणार आहे. मात्र यासाठी लागणाऱ्या खर्चाची जुळवाजुळव करताना कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागणार असल्याचे उपसरपंच वृंदावनी डोंगरे यांनी सांगितले.

-----

१६ आखेगाव

आखेगाव येथे सततच्या पावसाने शेतात साचलेले पाणी.