शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
2
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
3
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
4
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
5
राज ठाकरे यांच्या मविआमधील समावेशाबाबत काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांचं मोठं विधान, म्हणाले... 
6
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
7
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
8
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
9
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
10
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
11
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
12
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
13
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
14
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
15
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
16
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
17
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
18
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत
19
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
20
टाटा मोटर्सचा ऐतिहासिक निर्णय! 'या' दिवशी कंपनीचे होणार विभाजन; तुम्हाला काय फायदा?

चक्रीवादळाने संगमनेर तालुक्यात सर्वाधिक घरांची पडझड, पारनेर तालुक्यात पिकांची हानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 18:13 IST

अहमदनगर : जिल्ह्यात ७६४ घरांची हानी झाली. अकोले तालुक्यात ४५ कच्च्या घरांचे अंशत: नुकसान झाले. संगमनेर तालुक्यात सर्वाधित ५३१ घरांचे नुकसान झाले. तेथे कच्ची दहा घरे पूर्णपणे जमीनदोस्त झाली. पारनेर (४४), राहुरी (१७),कोपरगाव (१०), श्रीरामपूर (१८) श्रीगोंदा (१३), कर्जत (३), नेवासा (८), राहाता (६) येथील घरांचे अंशत: नुकसान झाले. संगमनेर (६), राहुरी (७) आणि अकोले (८) येथे पक्क्या घरांचीही पडझड झाली आहे.  अकोले तालुक्यात १५ झोपड्या वादळात उडाल्या. इतरही तालुक्यात कमी-जास्त नुकसान झाले.

अहमदनगर : जिल्ह्यात ७६४ घरांची हानी झाली. अकोले तालुक्यात ४५ कच्च्या घरांचे अंशत: नुकसान झाले. संगमनेर तालुक्यात सर्वाधित ५३१ घरांचे नुकसान झाले. तेथे कच्ची दहा घरे पूर्णपणे जमीनदोस्त झाली. पारनेर (४४), राहुरी (१७),कोपरगाव (१०), श्रीरामपूर (१८) श्रीगोंदा (१३), कर्जत (३), नेवासा (८), राहाता (६) येथील घरांचे अंशत: नुकसान झाले. संगमनेर (६), राहुरी (७) आणि अकोले (८) येथे पक्क्या घरांचीही पडझड झाली आहे.  अकोले तालुक्यात १५ झोपड्या वादळात उडाल्या. इतरही तालुक्यात कमी-जास्त नुकसान झाले.निसर्ग चक्रीवादळाने जिल्ह्यात अकोले तालुक्यात एकाचा मृत्यू झाला, तर २३ जनावरे दगावली आहेत. साडेसातशेपेक्षा जास्त घरांना हानी पोहोचली आहे, तर ६३२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली. चक्रीवादळामुळे बुधवारी नगर जिल्ह्यात दिवसभर वादळ, वारे आणि रिमझिम पाऊस होता. जिल्ह्याच्या पारनेर, श्रीगोंदा, अहमदनगर, संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर या भागात सायंकाळनंतर जोरदार वादळ व मुसळधार पाऊस झाला. अकोले तालुक्यातील लहित येथे वादळी वाºयाने अंगावर भिंत कोसळून सागर पांडुरंग चौधरी (वय ३२) हा गंभीर जखमी झाला. उपचार सुरू असताना गुरुवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला. तो संगमनेर येथील भाजीपाला मार्केटमध्ये माथाडी कामगार म्हणून काम करीत होता. वादळी वाºयाने २३ जनावरे दगावली आहेत. अकोले (४), कोपरगाव (१),नेवासा (१),पारनेर (५),संगमनेर (७),श्रीरामपूर (२),राहाता (३) अशा सात तालुक्यात २३ जनावरे दगावली. नगर तालुक्यात एक, संगमनेर तालुक्यात एक, शेवगाव तालुक्यात दोन जण जखमी झाला आहे.-------पारनेर तालुक्यात सर्वाधिक पिकांचे नुकसाननिसर्ग चक्रीवादळाने पारनेर तालुक्यात सर्वाधिक पिकांचे नुकसान झाले.  या तालुक्यात ५४० हेक्टरवरील पिकांची हानी झाली. पाथर्डी तालुक्यातील ७६ हेक्टरवरील पिकांना फटका बसला. कोपरगाव, नेवासा, श्रीगोंदा, श्रीरामपूर या तालुक्यातील पिकांचेही नुकसान झाले.