शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

चक्रीवादळाने संगमनेर तालुक्यात सर्वाधिक घरांची पडझड, पारनेर तालुक्यात पिकांची हानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 18:13 IST

अहमदनगर : जिल्ह्यात ७६४ घरांची हानी झाली. अकोले तालुक्यात ४५ कच्च्या घरांचे अंशत: नुकसान झाले. संगमनेर तालुक्यात सर्वाधित ५३१ घरांचे नुकसान झाले. तेथे कच्ची दहा घरे पूर्णपणे जमीनदोस्त झाली. पारनेर (४४), राहुरी (१७),कोपरगाव (१०), श्रीरामपूर (१८) श्रीगोंदा (१३), कर्जत (३), नेवासा (८), राहाता (६) येथील घरांचे अंशत: नुकसान झाले. संगमनेर (६), राहुरी (७) आणि अकोले (८) येथे पक्क्या घरांचीही पडझड झाली आहे.  अकोले तालुक्यात १५ झोपड्या वादळात उडाल्या. इतरही तालुक्यात कमी-जास्त नुकसान झाले.

अहमदनगर : जिल्ह्यात ७६४ घरांची हानी झाली. अकोले तालुक्यात ४५ कच्च्या घरांचे अंशत: नुकसान झाले. संगमनेर तालुक्यात सर्वाधित ५३१ घरांचे नुकसान झाले. तेथे कच्ची दहा घरे पूर्णपणे जमीनदोस्त झाली. पारनेर (४४), राहुरी (१७),कोपरगाव (१०), श्रीरामपूर (१८) श्रीगोंदा (१३), कर्जत (३), नेवासा (८), राहाता (६) येथील घरांचे अंशत: नुकसान झाले. संगमनेर (६), राहुरी (७) आणि अकोले (८) येथे पक्क्या घरांचीही पडझड झाली आहे.  अकोले तालुक्यात १५ झोपड्या वादळात उडाल्या. इतरही तालुक्यात कमी-जास्त नुकसान झाले.निसर्ग चक्रीवादळाने जिल्ह्यात अकोले तालुक्यात एकाचा मृत्यू झाला, तर २३ जनावरे दगावली आहेत. साडेसातशेपेक्षा जास्त घरांना हानी पोहोचली आहे, तर ६३२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली. चक्रीवादळामुळे बुधवारी नगर जिल्ह्यात दिवसभर वादळ, वारे आणि रिमझिम पाऊस होता. जिल्ह्याच्या पारनेर, श्रीगोंदा, अहमदनगर, संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर या भागात सायंकाळनंतर जोरदार वादळ व मुसळधार पाऊस झाला. अकोले तालुक्यातील लहित येथे वादळी वाºयाने अंगावर भिंत कोसळून सागर पांडुरंग चौधरी (वय ३२) हा गंभीर जखमी झाला. उपचार सुरू असताना गुरुवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला. तो संगमनेर येथील भाजीपाला मार्केटमध्ये माथाडी कामगार म्हणून काम करीत होता. वादळी वाºयाने २३ जनावरे दगावली आहेत. अकोले (४), कोपरगाव (१),नेवासा (१),पारनेर (५),संगमनेर (७),श्रीरामपूर (२),राहाता (३) अशा सात तालुक्यात २३ जनावरे दगावली. नगर तालुक्यात एक, संगमनेर तालुक्यात एक, शेवगाव तालुक्यात दोन जण जखमी झाला आहे.-------पारनेर तालुक्यात सर्वाधिक पिकांचे नुकसाननिसर्ग चक्रीवादळाने पारनेर तालुक्यात सर्वाधिक पिकांचे नुकसान झाले.  या तालुक्यात ५४० हेक्टरवरील पिकांची हानी झाली. पाथर्डी तालुक्यातील ७६ हेक्टरवरील पिकांना फटका बसला. कोपरगाव, नेवासा, श्रीगोंदा, श्रीरामपूर या तालुक्यातील पिकांचेही नुकसान झाले.