शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
2
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
3
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
4
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
5
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
6
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
7
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
8
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
9
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
10
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
11
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
12
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
13
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
14
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
15
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
16
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
17
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?
18
दादर रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार! तरुणाने स्वत:वरच केला चाकूहल्ला.. घटना CCTVमध्ये कैद
19
'आपण मोठी चूक करतोय', भारतावर कर लादल्यामुळे माजी अमेरिकन मंत्र्यांची ट्रम्प सरकारवर टीका
20
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ

चक्रीवादळाने संगमनेर तालुक्यात सर्वाधिक घरांची पडझड, पारनेर तालुक्यात पिकांची हानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 18:13 IST

अहमदनगर : जिल्ह्यात ७६४ घरांची हानी झाली. अकोले तालुक्यात ४५ कच्च्या घरांचे अंशत: नुकसान झाले. संगमनेर तालुक्यात सर्वाधित ५३१ घरांचे नुकसान झाले. तेथे कच्ची दहा घरे पूर्णपणे जमीनदोस्त झाली. पारनेर (४४), राहुरी (१७),कोपरगाव (१०), श्रीरामपूर (१८) श्रीगोंदा (१३), कर्जत (३), नेवासा (८), राहाता (६) येथील घरांचे अंशत: नुकसान झाले. संगमनेर (६), राहुरी (७) आणि अकोले (८) येथे पक्क्या घरांचीही पडझड झाली आहे.  अकोले तालुक्यात १५ झोपड्या वादळात उडाल्या. इतरही तालुक्यात कमी-जास्त नुकसान झाले.

अहमदनगर : जिल्ह्यात ७६४ घरांची हानी झाली. अकोले तालुक्यात ४५ कच्च्या घरांचे अंशत: नुकसान झाले. संगमनेर तालुक्यात सर्वाधित ५३१ घरांचे नुकसान झाले. तेथे कच्ची दहा घरे पूर्णपणे जमीनदोस्त झाली. पारनेर (४४), राहुरी (१७),कोपरगाव (१०), श्रीरामपूर (१८) श्रीगोंदा (१३), कर्जत (३), नेवासा (८), राहाता (६) येथील घरांचे अंशत: नुकसान झाले. संगमनेर (६), राहुरी (७) आणि अकोले (८) येथे पक्क्या घरांचीही पडझड झाली आहे.  अकोले तालुक्यात १५ झोपड्या वादळात उडाल्या. इतरही तालुक्यात कमी-जास्त नुकसान झाले.निसर्ग चक्रीवादळाने जिल्ह्यात अकोले तालुक्यात एकाचा मृत्यू झाला, तर २३ जनावरे दगावली आहेत. साडेसातशेपेक्षा जास्त घरांना हानी पोहोचली आहे, तर ६३२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली. चक्रीवादळामुळे बुधवारी नगर जिल्ह्यात दिवसभर वादळ, वारे आणि रिमझिम पाऊस होता. जिल्ह्याच्या पारनेर, श्रीगोंदा, अहमदनगर, संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर या भागात सायंकाळनंतर जोरदार वादळ व मुसळधार पाऊस झाला. अकोले तालुक्यातील लहित येथे वादळी वाºयाने अंगावर भिंत कोसळून सागर पांडुरंग चौधरी (वय ३२) हा गंभीर जखमी झाला. उपचार सुरू असताना गुरुवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला. तो संगमनेर येथील भाजीपाला मार्केटमध्ये माथाडी कामगार म्हणून काम करीत होता. वादळी वाºयाने २३ जनावरे दगावली आहेत. अकोले (४), कोपरगाव (१),नेवासा (१),पारनेर (५),संगमनेर (७),श्रीरामपूर (२),राहाता (३) अशा सात तालुक्यात २३ जनावरे दगावली. नगर तालुक्यात एक, संगमनेर तालुक्यात एक, शेवगाव तालुक्यात दोन जण जखमी झाला आहे.-------पारनेर तालुक्यात सर्वाधिक पिकांचे नुकसाननिसर्ग चक्रीवादळाने पारनेर तालुक्यात सर्वाधिक पिकांचे नुकसान झाले.  या तालुक्यात ५४० हेक्टरवरील पिकांची हानी झाली. पाथर्डी तालुक्यातील ७६ हेक्टरवरील पिकांना फटका बसला. कोपरगाव, नेवासा, श्रीगोंदा, श्रीरामपूर या तालुक्यातील पिकांचेही नुकसान झाले.