शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
4
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
5
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
6
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
7
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
8
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय
9
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
Bengaluru Stampede : हृदयद्रावक! "मलाही इथेच राहायचंय..."; मुलाच्या कबरीला मिठी मारून ढसाढसा रडले वडील
11
Vat Purnima Vrat 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
12
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
13
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
14
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
15
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
16
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
17
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
18
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
19
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
20
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश

नगरसेवकांच्या नाराजी नाट्यावर पडदा पडेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:31 IST

राहुरी : देवळाली प्रवरा नगरपालिकेची निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. सत्ताधारी गटातील नाराज नगरसेवक एकापाठोपाठ एक राजीनामा देण्याची ...

राहुरी : देवळाली प्रवरा नगरपालिकेची निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. सत्ताधारी गटातील नाराज नगरसेवक एकापाठोपाठ एक राजीनामा देण्याची भाषा करीत आहेत. या नगरसेवकांची शनिवारी (दि. २०) सकाळी बैठक घेण्यात आली. या बैठकीत तीन तास नाराज नगरसेवकांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यास यश आले नाही.

नगरपालिकेत चार दिवसांपूर्वी नगरसेवक ज्ञानेश्वर वाणी यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा गटनेते सचिन दुस यांच्याकडे दिला. परंतु त्यांनी राजीनामा स्वीकारला नाही. मुख्याधिकारी अजित निकत यांच्या दालनात गटनेते सचिन दुस, मुख्याधिकारी निकत व एक पत्रकार यांनी नगरसेवक ज्ञानेश्वर वाणी यांची समजूत काढली. राजीनामा देऊ नका. शांत मनाने एकदा विचार करा, असे सांगितले. यावर वाणी तावातावाने निघून गेले. दोन दिवसांनी पुन्हा येईन. राजीनामा देईल, असा इशारा त्यांनी जाता जाता दिला. काही महिन्यांपूर्वी आदिनाथ कराळे यांनी राजीनामा दिला होता. परंतु तो मंजूर करण्यात आला नाही.

नगरसेवकांची नाराजी व राजीनामा नाट्य एकापाठोपाठ घटना घडल्यामुळे नगराध्यक्ष सत्यजित कदम, उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे, गटनेते सचिन दुस यांनी शनिवारी सकाळी बागायत पीक सोसायटीच्या सभागृहात सत्ताधारी गटातील सर्व नगरसेवकांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत राजीनामा देणारे नगरसेवक या विषयावर प्रथम चर्चा करण्यात आली. राजीनामा देण्याची कारणे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. समोर आलेली कारणे यावर विचार विनिमय करू. यापुढे असे घडणार नाही, याची दक्षता घेण्याचे ठरले. नगरसेवकांची नाराजी काय आहे हे जाणून घेण्यासाठी नगरसेवकांना कोणाची काय नाराजी आहे हे याच बैठकीत स्पष्ट सांगा असे नगराध्यक्ष कदम यांनी फर्मान सोडले. नाराज नगरसेवकांनी आपली नाराजी बोलून दाखविली आहे. त्यामध्ये बहुतांशी नगरसेवकांच्या नगरपालिकेत व पालिकेशी संबंधित कार्यक्रमात मानसन्मान मिळत नाही. आम्ही नावालाच नगरसेवक आहोत. आमचे पालिका अधिकारी सुद्धा ऐकत नाहीत. अशा अनेक तक्रारी नगरसेवकांनी मांडल्या. महिला नगरसेवकांनीही त्यात सुरात सूर मिसळला अशी माहिती आहे.

......

नाराज नगरसेवकांनी वेळच्यावेळी समस्या मांडल्या तर त्यावर मार्ग काढता येऊ शकतो. नगरसेवक जर वेळीच बोलणार नसतील नगरसेवकांच्या समस्या कशा समजणार? नगरसेवकांशी चर्चा केली पाहिजे. चर्चेतून मार्ग निघतो. शांत राहून राजीनाम्याची भाषा करणे म्हणजे समस्यांचे उत्तर नाही, असे नगराध्यक्ष सत्यजित कदम, उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे, गटनेते सचिन दुस यांनी या नगरसेवकांना सांगितल्याची माहिती आहे.

....