शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
5
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
6
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
7
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
8
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
9
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
10
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
11
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
12
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
13
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
14
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
15
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
16
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
17
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
18
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
19
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
20
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर

करंडी बनले ग्रीन अँड क्लिन व्हिलेज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 13:09 IST

कोतूळ-ब्राह्मणवाडा रस्त्यालगत करंडी हे आदिवासी गाव सध्या स्वच्छता, वृक्ष संवर्धन, व्यसनमुक्तीने एखाद्या दाक्षिणात्य चित्रपटातील वाटावे असे ‘द ग्रीन अ‍ॅन्ड क्लीन व्हिलेज’ बनले आहे.

मच्छिंद्र देशमुखकोतूळ : कोतूळ-ब्राह्मणवाडा रस्त्यालगत करंडी हे आदिवासी गाव सध्या स्वच्छता, वृक्ष संवर्धन, व्यसनमुक्तीने एखाद्या दाक्षिणात्य चित्रपटातील वाटावे असे ‘द ग्रीन अ‍ॅन्ड क्लीन व्हिलेज’ बनले आहे. महात्मा गांधींच्या स्वप्नातील खेडे म्हणून करंडी गाव अकोले तालुक्यात प्रत्यक्षात अवतरले आहे.करंडी गावची लोकसंख्या ११७५ आहे. अनुसूचित क्षेत्र (पेसा) तील गाव. गावात २४७ घरे, २४० वैयक्तिक, दोन सार्वजनिक शौचालये वापरात. तर चार शौचालयांचे बांधकाम सुरू आहे. करंडी येथील तेवीस वर्षे वयाचा झोपडीवजा घरात राहणाऱ्या सरपंच चंद्रकांत गोंदके यांनी व त्यांचा मित्र परिवार आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने ही किमया साधली आहे.करंडी गावात सात वर्षांपूर्वी पिण्याच्या पाण्यासाठी मार्च महिन्यातच टँकर सुरू व्हायचे. गावात दोन सार्वजनिक व पाच सहा खासगी शौचालये. गावाला पाणी पुरवठा करणारा आनंददरा तलाव मार्चमध्ये कोरडा व्हायचा.गावातील निम्मे लोक गवंडी व बांधकाम मजुरी करणारे. गावात उन्हाळ्यात गुंठाभरही बागायत नाही. त्यामुळे गाव उजाड वाटायचे, मात्र गावातील सर्व तरुण व गावकºयांनी एकत्र येऊन २०१४ पासून हागणदारीमुक्त गाव व गावातील मुख्य रस्त्यावर झाडे लावणे, गावाला व्यसनमुक्ती करणे हा संकल्प केला. स्वच्छ भारत मिशन या योजनेचे बारा हजार व स्वनिधीचे दोन हजार टाकून व गावातील गवंड्यांनी प्लास्टर, तीव्र उताराचे भांडे, पत्रा, शोषखड्डा, असे २०१८ पर्यंत चार वर्षांत एकशे पन्नास शौचालये पूर्ण केली आहेत. तर गावातील मुख्य रस्त्याला वड, पिंपळ, आशोका, बकुळ, कडूनिंब, शिसव, चिंच असे पाचशे वृक्ष पाच ते सात फुटांपर्यंत वाढले आहेत. त्यांना शंभर लोखंडी संरक्षक जाळ्या, झाडांसाठी अंडरग्राउंड ड्रीपची सोय केली आहे.साथीच्या आजाराला आळागावातील मुख्य ठिकाणी सहा कचरा कुंड्या आहेत. गावात गुटखा , दारू, मटका, जुगार यांचा मागमूसही नाही. गावात पाच भजनी मंडळे, दहा महिला बचत गट ही मोहीम यशस्वी करण्यासाठी गावातील ग्रामसेवक के. बी. इंगळे, पांडुरंग मराडे, दीपक गोंदके, बाबाजी गोंदके, भाऊसाहेब गायकर, दत्ता गोंदके, विजय गोंदके या उच्चशिक्षित तरूणांचे तसेच गावातील दहा महिला बचतगटाच्या अध्यक्ष मंगल गोंदके, छबुबाई ऊंडे, सोनाबाई गोंदके, मंदा गोंदके, आशा गोंदके, कविता गोंदके, उर्मिला गोंदके, कांता गोंदके यांचे मोठे योगदान आहे. गावात शौचालये झाल्यापासून साथीचे आजार खूप कमी झाल्याचे आरोग्य सेविका झुंबर उंबरे यांनी सांगितले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर