शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

परिवर्तन केले तरच कुकडीचे पाणी

By admin | Updated: June 2, 2014 00:37 IST

श्रीगोंदा : विधानसभा निवडणुकीत जनता चुकीचा कौल देते आणि पुन्हा आम्हाला पाणी नाही, वीज नाही, रस्ते खराब म्हणून टाहो!

श्रीगोंदा : विधानसभा निवडणुकीत जनता चुकीचा कौल देते आणि पुन्हा आम्हाला पाणी नाही, वीज नाही, रस्ते खराब म्हणून टाहो! अगोदर आमदार बदला तर कुकडीचे पाणी शेतकर्‍यांच्या शेतात येईल, असे प्रतिपादन माजी आमदार शिवाजीराव नागवडे यांनी बेलवंडी येथे बोलताना केले. जि.प.चे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या सोहळ्यात शिवाजीराव नागवडे बोलत होते. अध्यक्षस्थानी पोपट माने होते. नागवडे पुढे म्हणाले की, अण्णासाहेब शेलार यांनी कर्तृत्व आणि विश्वासाच्या बळावर राजकारणात झेप घेतली आहे. भविष्यात सर्वांचा एकत्रीत निर्णय घेऊन राजकारण, समाजकारणात काम करावे लागणार आहे. कुकडीचे अध्यक्ष राहुल जगताप म्हणाले की, अण्णासाहेब शेलार मन जिंकणारा नेता आहे, असून त्यांची लोकप्रियतेची वेगळी खुबी आहे. बाळासाहेब नाहाटा म्हणाले की, राष्टÑवादीचे नेते कुकडीच्या पाणी प्रश्नावर जखमेवरचे मीठ चोळण्याचे काम करीत आहे. राजकारणात चुकीचे निर्णय घेतल्याचा हा परिणाम आहे.राजेंद्र नागवडे म्हणाले, कुकडीच्या पाण्यासाठी घेतलेल्या बैठका फार्स आहे. शेतकर्‍यांचे जीवन उद्ध्वस्त करण्यासाठी चाललेला हा पोरखेळ आहे. कैलासराव पाचपुते म्हणाले, कोणत्या तरी एकाच दगडाला शेंदूर लावा म्हणजे कार्यकर्त्यांना कामाला लागता येईल. अण्णासाहेब शेलार म्हणाले की, मी वाढदिवस साजरा करावा एवढा मोठा माणूस नाही, परंतु कार्यकर्त्यांनी कार्यक्रम आयोजित केला. आगामी निवडणुकीत एकास एक उमेदवार दिला तर सत्ता परिवर्तन अटळ आहे. परंतु नेत्यांना डोके ठिकाणावर ठेवून निर्णय घ्यावा लागेल. यावेळी डी.एम.भालेराव, सरस्वती डाके, विष्णू जठार, मच्छिंद्र नलगे, मनेष जगताप, सुभाष काळाणे, मनोज इथापे, अशोक काळाणे, सुधीर काळाणे, रमन मुनोत यांची शुभेच्छापर भाषणे झाली. पिंपळगाव पिसा येथे आर.जे. ग्रुप ने रक्तदान शिबिर आयोजित केले होते. शिबिराचे उद्घाटन कुंडलिकराव जगताप यांच्या हस्ते झाले.यावेळी बापुशेठ गोरे, मनोहर पोटे, महेंद्र वाखारे, मिलिंद दरेकर, जिजाबापू रोडे, सुदाम पवार, एम.डी. शिंदे आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)