शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

परिवर्तन केले तरच कुकडीचे पाणी

By admin | Updated: June 2, 2014 00:37 IST

श्रीगोंदा : विधानसभा निवडणुकीत जनता चुकीचा कौल देते आणि पुन्हा आम्हाला पाणी नाही, वीज नाही, रस्ते खराब म्हणून टाहो!

श्रीगोंदा : विधानसभा निवडणुकीत जनता चुकीचा कौल देते आणि पुन्हा आम्हाला पाणी नाही, वीज नाही, रस्ते खराब म्हणून टाहो! अगोदर आमदार बदला तर कुकडीचे पाणी शेतकर्‍यांच्या शेतात येईल, असे प्रतिपादन माजी आमदार शिवाजीराव नागवडे यांनी बेलवंडी येथे बोलताना केले. जि.प.चे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या सोहळ्यात शिवाजीराव नागवडे बोलत होते. अध्यक्षस्थानी पोपट माने होते. नागवडे पुढे म्हणाले की, अण्णासाहेब शेलार यांनी कर्तृत्व आणि विश्वासाच्या बळावर राजकारणात झेप घेतली आहे. भविष्यात सर्वांचा एकत्रीत निर्णय घेऊन राजकारण, समाजकारणात काम करावे लागणार आहे. कुकडीचे अध्यक्ष राहुल जगताप म्हणाले की, अण्णासाहेब शेलार मन जिंकणारा नेता आहे, असून त्यांची लोकप्रियतेची वेगळी खुबी आहे. बाळासाहेब नाहाटा म्हणाले की, राष्टÑवादीचे नेते कुकडीच्या पाणी प्रश्नावर जखमेवरचे मीठ चोळण्याचे काम करीत आहे. राजकारणात चुकीचे निर्णय घेतल्याचा हा परिणाम आहे.राजेंद्र नागवडे म्हणाले, कुकडीच्या पाण्यासाठी घेतलेल्या बैठका फार्स आहे. शेतकर्‍यांचे जीवन उद्ध्वस्त करण्यासाठी चाललेला हा पोरखेळ आहे. कैलासराव पाचपुते म्हणाले, कोणत्या तरी एकाच दगडाला शेंदूर लावा म्हणजे कार्यकर्त्यांना कामाला लागता येईल. अण्णासाहेब शेलार म्हणाले की, मी वाढदिवस साजरा करावा एवढा मोठा माणूस नाही, परंतु कार्यकर्त्यांनी कार्यक्रम आयोजित केला. आगामी निवडणुकीत एकास एक उमेदवार दिला तर सत्ता परिवर्तन अटळ आहे. परंतु नेत्यांना डोके ठिकाणावर ठेवून निर्णय घ्यावा लागेल. यावेळी डी.एम.भालेराव, सरस्वती डाके, विष्णू जठार, मच्छिंद्र नलगे, मनेष जगताप, सुभाष काळाणे, मनोज इथापे, अशोक काळाणे, सुधीर काळाणे, रमन मुनोत यांची शुभेच्छापर भाषणे झाली. पिंपळगाव पिसा येथे आर.जे. ग्रुप ने रक्तदान शिबिर आयोजित केले होते. शिबिराचे उद्घाटन कुंडलिकराव जगताप यांच्या हस्ते झाले.यावेळी बापुशेठ गोरे, मनोहर पोटे, महेंद्र वाखारे, मिलिंद दरेकर, जिजाबापू रोडे, सुदाम पवार, एम.डी. शिंदे आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)