शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
2
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
3
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
4
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
5
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
6
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
7
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
8
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
9
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
10
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
11
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
12
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
13
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
14
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
15
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
16
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
17
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
18
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
19
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
20
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?

बाजार समितीबाहेर भाजी विक्रेत्यांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:23 IST

अहमदनगर : येथील कृषी उत्पन्न बाजार समिती किरकोळ विक्रेत्यांना बंदी घातल्याने बाजार समिती बाहेर महात्मा फुले चौकात किरकोळ विक्रेत्यांची ...

अहमदनगर : येथील कृषी उत्पन्न बाजार समिती किरकोळ विक्रेत्यांना बंदी घातल्याने बाजार समिती बाहेर महात्मा फुले चौकात किरकोळ विक्रेत्यांची गर्दी होत असून, ही गर्दी परिसरातील नागरिकांच्या चिंतेचा विषय बनली आहे.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्या आहेत. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत किरकोळ विक्रेत्यांना बंदी घालण्यात आली आहे. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी ही बंदी घालण्यात आली. परंतु, शेतकरी भाजीपाला घेऊन बाजार समितीच्या मागील बाजूस असलेल्या कोठी रस्त्यावर बसतात. शहरातील किरकोळ विक्रेतेही भाजी घेण्यासाठी रस्त्यावर गर्दी करत असून, महापालिकेच्या भरारी पथकाने कारवाई करत विक्रेत्यांना उठविले. त्यामुळे शेतकरी व खरेदीसाठी गेलेल्या किरकोळ विक्रेत्यांची चांगलीच धावपळ उडाली. भाजी विक्रेत्यांना इतर ठिकाणी बसून दिले जात नसल्याने आम्ही भाजी विकायची कुठे, असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.

प्रशासनाने बाजार समितीत किरकोळ विक्रेत्यांना बंदी घातली. शेतकऱ्यांना त्यांचा माल थेट विकता येत नाही. त्यामुळे शेतकरी जिथे जागा मिळेल, तिथे काहीवेळ थांबून भाजीपाल्याची विक्री करतात. प्रशासनाने परिसरातून भाजीपाला विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना बसण्यासाठी काही वेळ मुदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. किरकोळ विक्रेत्यांना घरी जाऊन भाजीपाला विक्री करण्यास परवानगी दिली गेली आहे. परंतु, भाजी आणायची कुठून, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.

...

घरोघरी जाऊन विक्री करणाऱ्यांची संख्या घटली

शासनाने भाजी विक्रेत्यांना घरोघरी जाऊन विक्री करण्यास परवानगी दिली आहे. परंतु, कोरोनाच्या भीतीने घरोघरी विक्री करणाऱ्यांची संख्या रोडावल्याने नागरिकांना भाजीपाला मिळत नाही. त्यामुळे भाजी घेण्यासाठी नागरिक रस्त्यावर फिरत असल्याचे चित्र आहे.

..

सूचना फोटो आहे