शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भगूर नगरपरिषदेत शिवसेनेची २५ वर्षांची सत्ता अजितदादांच्या राष्ट्रवादीने उलथवली; पहा लेटेस्ट अपडेट
2
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
3
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
4
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
5
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
6
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
7
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
8
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
9
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
10
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
11
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
12
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
13
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
14
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
15
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
16
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
17
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
18
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
19
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
20
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
Daily Top 2Weekly Top 5

कोपरगाव तालुक्यातील पिकांना मिळाले जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोपरगाव : यंदाच्या पावसाळ्यात कोपरगाव तालुक्यात सुरुवातीपासून पावसाचे प्रमाण कमी राहिले. त्यातच जुलैच्या शेवटी व ऑगस्टच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोपरगाव : यंदाच्या पावसाळ्यात कोपरगाव तालुक्यात सुरुवातीपासून पावसाचे प्रमाण कमी राहिले. त्यातच जुलैच्या शेवटी व ऑगस्टच्या सुरुवातीचा पंधरवडा असा एक महिना पावसाने पूर्णतः विश्रांती घेतली होती. त्यामुळे पेरणी केलेली पिके सुकू लागली होती. मात्र, १६ ऑगस्टपासून सर्वत्र पाऊस पडण्यास सुरुवात झाल्याने खरिपातील सर्वच पिकांना जीवदान मिळाल्याने पिके जोमात उभी आहेत. त्यामुळे शेतकरी सुखावला आहे.

कोपरगाव कृषी विभागाकडे चालू आठवड्याच्या व खरीप हंगामाचा अंतिम पीक पेरणी अहवालानुसार तालुक्यातील ७९ गावात यंदा सरासरीच्या १९२.९ टक्के खरिपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहे. त्यात संपूर्ण तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र हेक्टरमध्ये ७० हजार ६१३ आहे. त्यामध्ये लागवडीस योग्य असलेले ६० हजार ७९४ इतके असून बागायती ३८ हजार ३७७ तर जिरायती २२ हजार ४१७ इतके आहे. खरीप हंगामासाठी सरासरी ३३ हजार ६१७ इतके हेक्टर क्षेत्र आहे. त्यामध्ये सर्व क्षेत्र हेक्टरमध्ये बाजरी १४३८,कपाशी २०७५, सोयाबीन २४ हजार ३९१, मका १६ हजार ३०५, उडीद ५०, तूर ८१, मूग ३७८.५०, भुईमूग ४२३, फळबागा २४१९, चारापिके २८३१, भाजीपाला ६४०.१, मसाला पिके ८३.६० व ऊस ६०६५.८० हेक्टर नोंद आहे.

तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीला ब्रिटिशांनी शाश्वत सिंचनाची सोय करत शेतीला प्रथम प्राधान्य होते. परंतु, अलीकडच्या काळात कालवा सिंचनाचे शेतीसाठीचे नियोजन हे पूर्णतः कोलमडले आहे. गेल्या महिनाभरात लाभक्षेत्रातील पिके जळू लागल्याने गोदावरीच्या दोनही कालव्यांना पाणी सोडण्याच्या मागणीने जोर धरला होता. जेणेकरून कालव्याच्या भरवशावर असलेल्या शेतातील पिके जगतील, अशी आशा होती. मात्र, कालव्यांना पाणी सोडण्यासाठी पाटबंधारे विभागही सकारत्मक नव्हता. तर सत्ताधारी राजकीय गोटातूनही कोणत्याच हालचाली झाल्या नाही. कालव्याना पाणी आलेच नाही. परंतु, पुन्हा एकदा वरुण राजाच शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आला. गेली पाच दिवस सुरू राहिलेल्या संततधार पावसामुळे सर्वच पिकांची आबादानी झाली. त्यामुळे लाखोंचा खर्च करून धोक्यात आलेला खरीप हंगाम बचावला आहे.

.............

या आठवड्यात संततधार पाऊस पडल्यामुळे खरिपाची पिके वाचली आहे. मात्र, या पावसामुळे पिकांबरोबर तण वाढणार आहे. त्यामुळे ते वाढू न देणे तसेच आता कपाशी पिकावर बॊंडअळी व मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यासाठी पिकामध्ये फिरून पाहणी करावी. तसेच काही आढळल्यास तत्काळ कीटकनाशकांची फवारणी करावी.

- अशोक आढाव, तालुका कृषी अधिकारी, कोपरगाव

.............

फोटो ओळी -

कोपरगाव तालुक्यात पावसाने हजेरी लावल्याने सोयाबीन पीक जोमात उभी आहे.(छायाचित्र : गणेश देवकर)