शहरं
Join us  
Trending Stories
1
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
2
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
3
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
4
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
5
'या' १६ देशांमध्ये चिकनगुनियाचा कहर, चीनमध्ये ७००० रुग्ण; अमेरिकेतही अलर्ट जारी
6
तेल, टॅरिफ अन् S-400..; डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर अजित डोवाल रशियात दाखल
7
शाळेच्या गेटमधून आत शिरली, अचानक चक्कर येऊन कोसळली; सहावीतील विद्यार्थिनीचा हृदयविकाराने मृत्यू
8
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
9
दुसरा श्रावण गुरुवार: १० मिनिटांत होणारे प्रभावी ‘गुरुस्तोत्र’ म्हणा; दत्तगुरूंची कृपा मिळवा
10
डोळ्यांवर काकडी ठेवल्याने खरंच रिलॅक्स वाटतं की फक्त ब्यूटी ट्रेंड? सत्य समजल्यावर वाटेल आश्चर्य
11
शेतकऱ्यांसाठी १ दिवस मुंबई बंदचा आवाज उठवावा; 'शिवतीर्थ'वर बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट
12
अपेक्षाभंग! RBI च्या निर्णयानंतर बाजार गडगडला; २.१३ लाख कोटींचा फटका! 'या' क्षेत्रात सर्वाधिक घसरण
13
...अन् धूर्त कोल्होबानं क्रिकेटच्या पंढरीतील Live मॅच थांबवली, नेमकं काय घडलं?
14
नवा ट्विस्ट! "तू ये, नाहीतर तो मला मारून टाकेल"; लेकीचा 'तो' ऑडिओ ऐकून कुटुंबाला मोठा धक्का
15
इम्रान खान समर्थकांचा पाकिस्तानात मोठा राडा, ५००हून अधिक लोकांना अटक! झालं काय?
16
RBI Repo Rate: रेपो रेट म्हणजे काय रे भाऊ? तो वाढल्यानं का वाढतो तुमचा EMI? जाणून घ्या
17
Video : दुचाकीवर हेल्मेट घालणं टाळता? हा व्हिडीओ बघाल तर पुढच्यावेळी घरातूनच हेल्मेट घालून बाहेर पडाल! 
18
"घरं गाडली गेली, फक्त छप्पर बाहेर; आम्ही शिट्ट्या वाजवत होतो जेणेकरून लोकांना पळता येईल"
19
दुसरा श्रावण गुरुवार: फक्त १० मिनिटे ‘अशी’ स्वामी सेवा करा; चिंतामुक्त व्हा, पुण्यच लाभेल!
20
ट्रम्प यांनी जपानला फसवलंय, आता भारताची पाळी..; चिनी एक्सपर्टनं अमेरिकेचा असा केला पर्दाफाश

आठ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:23 IST

अहमदनगर : जिल्ह्यात शनिवारी आणि रविवारी झालेल्या वादळ-गारपिटीने तब्बल आठ हजारांपेक्षा जास्त हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये जवळपास ...

अहमदनगर : जिल्ह्यात शनिवारी आणि रविवारी झालेल्या वादळ-गारपिटीने तब्बल आठ हजारांपेक्षा जास्त हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये जवळपास दहा हजार शेतकऱ्यांना या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. अवकाळीने सात तालुक्यांमधील ५८ च्यावर गावे बाधित झाली आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

जिल्ह्यात २० आणि २१ मार्चला वादळ, वारा, मेघगर्जनेसह गारपीट झाली. यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. श्रीरामपूर, शेवगाव, संगमनेर, पाथर्डी, राहुरी, नेवासा, कोपरगाव आणि श्रीरामपूर या सात तालुक्यांमधील ५८ च्यावर गावांना फटका बसला आहे. त्यामध्ये शेवगाव तालुक्यातील १६ गावांमधील १ हजार १५३ शेतकऱ्यांच्या ८५४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. संगमनेर तालुक्यात पाच गावांमधील ८७८ शेतकऱ्यांच्या १ हजार ३५७ हेक्टरवरील, पाथर्डी तालुक्यातील २४ गावांमधील ३०५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. राहुरी तालुक्यात ४ गावांमधील ६ हजार ५० शेतकऱ्यांच्या ३ हजार ७३० हेक्टरवरील, नेवासा तालुक्यातील ९ गावांमधील ५६६ हेक्टरवरील, कोपरगाव तालुक्यातील ७९० शेतकऱ्यांच्या ४९४ हेक्टरवरील, तर श्रीरामपूर तालुक्यातील २१८ शेतकऱ्यांच्या ११० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले.

नुकसान झालेल्या पिकांमध्ये गहू, हरभरा, कांदा, मका, भुईमूग या पिकांचे नुकसान झाले. फळांमध्ये डाळिंब, अंबा, चिक्कू, पपई, खरबूज, टरबूज, द्राक्षे, केळी, पेरू या फळांचे व भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

दोन्ही दिवशी पिकांचे, फळांचे नुकसान झाल्यानंतर कृषी विभाग, महसूल विभाग आणि जिल्हा परिषद यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली असून, पंचनामेही करण्यात आली आहेत.