शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

पोलिसांवरील टीकेचा कामगिरीवर परिणाम नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:20 IST

श्रीरामपूर : जिल्ह्यातील रेखा जरे व गौतम हिरण यांच्या हत्या प्रकरणावरून पोलीस प्रशासनावर टीकेची झोड उठली. मात्र हा आमच्या ...

श्रीरामपूर : जिल्ह्यातील रेखा जरे व गौतम हिरण यांच्या हत्या प्रकरणावरून पोलीस प्रशासनावर टीकेची झोड उठली. मात्र हा आमच्या कामकाजाचा भाग असून अंगावर वर्दी घातल्यापासूनच या गोष्टी स्वीकारण्याची तयारी असते. टीकेमुळे अनेकदा वाईट वाटते. मात्र त्यामुळे मूळ कामगिरीवर विपरीत परिणाम होऊ देत नाही, अशी माहिती जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांनी दिली.

पाटील हे हिरण हत्याकांडाची माहिती देण्यासाठी येथे आले असता पत्रकारांशी बोलत होते. गेली अनेक महिने पसार असलेला रेखा जरे खुनातील सूत्रधार बाळ बोठे तसेच गौतम हिरण हत्येप्रकरणी पोलीस प्रशासनाला टीकेला सामोरे जावे लागले. विधानसभेच्या अधिवेशनातही भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसेच इतर नेत्यांनी नेत्यांनी पोलिसांच्या कामकाजावर आरोप केले होते. गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही त्यात लक्ष्य करण्यात आले. शनिवारी बाळ बोठे यांना करण्यात आलेली अटक व हिरण हत्याकांडाचा पर्दाफाश झाल्यानंतर या टीकेबाबत पाटील यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. त्यावर ते मनमोकळेपणाने बोलले.

पाटील म्हणाले, सेवेत रुजू झाल्यापासूनच एक प्रशासकीय अधिकारी म्हणून टीकेला सामोरे जावे लागेल याची जाणीव आहे. कारण पोलिसांकडे पाहण्याची समाजाकडे एक पद्धती असते. प्रत्येक जण एखाद्या गुन्ह्याविषयी काही तर्क मांडत असतो. काही निष्कर्ष काढले जातात. मात्र या सर्व बाबींचा कामगिरीवर परिणाम होतो कामा नये, याची खबरदारी घेतली जाते.

अनेकदा गुन्हा घडल्यानंतर काही तासांत छडा लावला जावा, अशी मानसिकता असते. तपास लागला नाही तर त्यावर आंदोलनांच्या रूपाने प्रतिक्रिया दिल्या जातात. मात्र काही गुन्ह्यांमध्ये पोलिसांना कोणतेही धागेदोरे मिळत नाही. प्रत्यक्षदर्शी अथवा साक्षीदार नसतात. त्यामुळे गुन्ह्याची तातडीने उकल होत नाही. त्यासाठी काही अवधी खर्च होतो, असे मनोज पाटील म्हणाले.

बेलापूर येथील गौतम हिरण यांचे अपहरण व हत्या प्रकरण हे आव्हानात्मक होते. सीसी चित्रण अथवा इतर ठोस असे पुरावे प्रथमदर्शनी हाती नव्हते. या गुन्ह्याची स्पष्टता नव्हती, असे पाटील यांनी सांगितले.

----------