शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
अर्चना तिवारी चतुर निघाली!ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
3
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
4
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
5
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
6
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
8
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
9
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
10
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
11
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
12
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
13
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
14
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
15
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
16
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!
17
२२ रुपयांच्या 'या' शेअरचा ४२४०% परतावा! १ लाख रुपयांचे झाले तब्बल ४२.४० लाख; अजूनही संधी?
18
कोट्यधीश बनण्याचं स्वप्न असेल तर 'या' सरकारी स्कीमचा विचार करू शकता; मिळेल १ कोटींचा फंड
19
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
20
“राज्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार तातडीची मदत द्या, ओला दुष्काळ जाहीर करा”: सपकाळ

कुकडीपट्ट्यात असंतोष

By admin | Updated: August 3, 2014 01:10 IST

पारनेर : आमच्यासमोर पलिकडील गावाच्या बाजुने पुणे जिल्ह्यातील गावांमध्ये कुकडीच्या कालव्यात मोटारी सुरू आहेत. परंतु आमच्या मोटारीवर कारवाई होते.

पारनेर : आमच्यासमोर पलिकडील गावाच्या बाजुने पुणे जिल्ह्यातील गावांमध्ये कुकडीच्या कालव्यात मोटारी सुरू आहेत. परंतु आमच्या मोटारीवर कारवाई होते. ही सापत्नभावाची वागणूक कशासाठी? असा संतप्त सवाल पारनेर तालुक्यातील कुकडी लाभपट्ट्यातील शेतकऱ्यांनी केला आहे.कुकडी कालव्यात दोन दिवसापूर्र्वी पाणी सोडण्यात आले. पारनेर तालुक्यासह जिल्ह्यात श्रीगोंदा, कर्जत व इतर परिसरात सध्या पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. कुकडीचे आवर्तन पिण्याच्या पाण्यासाठी सोडल्याने कुकडी लाभक्षेत्रातील पारनेर तालुक्यातील निघोज, जवळा, शिरापूर, वडगाव गुंड, म्हस्केवाडी, अळकुटीचा काही परिसर यासह वाडेगव्हाणपर्यंत असलेल्या चौदा गावांमधील शेतकऱ्यांनी विद्युत मोटारींनी पाणी उपसा करू नये यासाठी पारनेर तालुक्यात दोन अधिकारी, दहा पोलीस यांचे भरारी पथक नेमले होते. या भागात जाऊन कुकडी कालव्यात शेतकऱ्यांच्या मोटारी असल्यास त्या जप्तची कारवाई करण्यात येते किंवा पाईप कापून टाकले जातात, असे महेश शिरोळे, रवींद्र गोरडे यांनी सांगितले. प्रांताधिकारी संतोष भोर यांच्या पथकाने दोन दिवसापूर्र्वी निघोज भागात सहा विद्युत मोटारी जप्त करण्यात आल्या. तरीही कुकडीचे अधिकारी काही ठिकाणी कारवाई करीत आहेत, अशा शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. (तालुका प्रतिनिधी)धनदांडग्यांवर कारवाई करावीपाऊस गायब झाल्याने पारनेर तालुक्यात दुष्काळी स्थिती आहे. कुकडी कालव्याच्या आवर्तनामुळे अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना चांगला पाऊस पडेपर्यंत सुरू राहून अनेक गावांना पिण्याचे पाणी मिळेल मग शेतीसाठी धनदांडगे शेतकरीच मोठ्या मोटारी लावून पाणी उपसा करतात. सामान्य शेतकरी थोड्या प्रमाणावर मोटार लावतात. मग धनदांडग्यांच्या मोटारींवर कारवाई केली तर स्वागतच आहे.- संतोष खोडदे, तालुका सरचिटणीस, भारतीय कम्युनिस्ट पक्षपिके नाहीत तरीही कारवाई कुकडीचे उशिरा आवर्तन व पावसाअभावी शेतात पिके नाहीत. कॅनॉलला पाणी आल्यानंतरच विहिरींनाही पाणी येते. मग अधिकाऱ्यांनी कारवाई कशाला करायची?- ताराचंद काळे, शेतकरी,पठारवाडीआमच्यावर अन्याय का?पारनेर तालुक्यातील वडनेर, चोंभूतसह परिसरातील गावांच्या शेजारीच पुणे जिल्ह्यातील गावे आहेत.कालव्याच्या पलिकडील गावे या कालव्यातून सर्रास मोटारी लावून पाणी उपसा करीत आहेत. निघोजजवळील टाकळी हाजी परिसरातही मोटारी सुरू आहेत. मग आमच्यावर अन्याय का?- किसन पानमंद, आदिनाथ म्हस्के, सुरेश गोरडे, संतोष म्हस्के, शेतकरीपिण्यासाठीच आवर्तन पारनेरसह नगर जिल्ह्यातील दुष्काळी भागांना पिण्याचे पाणी मिळावे यासाठीच कुकडीचे आवर्तन सोडण्यात आले आहे. त्यामुळे शेतीसाठी पाणी वापरणारांवर कारवाई सुरू आहे. पुणे जिल्ह्यातील गावांमध्ये कालव्याजवळ मोटारी सुरू असल्यातरी कार्यक्षेत्र दुसरे असल्याने आम्ही काही करू शकत नाही. आम्हाला वरिष्ठांकडून आलेल्या निर्देशाप्रमाणे कारवाई सुरू आहे. - संतोष भोर, प्रांताधिकारी,पारनेर,श्रीगोंदा