शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीचे प्रदूषण रोखण्यासाठी चीनचा 'धक्कादायक' सल्ला! ३००० मोठे उद्योग बंद करण्याची सूचना; बीजिंगच्या धर्तीवर प्लॅन तयार?
2
Short Term Investment: केवळ एका वर्षासाठी गुंतवणूक करायचीये? 'हे' ५ पर्याय देऊ शकतात तुम्हाला जबरदस्त रिटर्न, जाणून घ्या
3
गृहकर्जावर होईल १८ लाख रुपयांपर्यंतची बचत! EMI कमी करण्यापेक्षा वापरावा लागेल 'हा' पर्याय
4
कोल्हापूर हादरलं! मुलानेच केली आई-वडिलांची हत्या; धक्कादायक कारण आले समोर
5
ICICI Prudential AMC IPO Listing: आयसीआयसीआय प्रूडेंशियल एएमसीच्या आयपीओनं केलं मालामाल; प्रत्येक शेअरवर मिळाला 'इतका' नफा
6
बांगलादेशात ISI सक्रीय, कंटरपंथींकडून जाळपोळ, हिंसाचार सुरू; भारताविरोधात पाकिस्तानचं षडयंत्र?
7
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
8
Dolphin in Mumbai: मुंबईकरांना सुखद धक्का! वरळी सी फेसच्या समुद्रकिनाऱ्यावर डॉल्फिनची मस्ती, व्हिडीओ व्हायरल
9
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
10
VIDEO: दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
11
Stock Market Today: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; Sensex ची ३३० अंकांनी उसळी; IT Stocks सुस्साट
12
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त
13
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
14
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
15
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
16
मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
17
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
18
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
19
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
20
राज्यातील पहिले 'जेन झी टपाल' आयआयटी मुंबईत; कार्यालयामध्ये नवीन सुविधांसह डिजिटल सेवा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यावर कोरोनासह अवकाळी पावसाचेही संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:21 IST

अहमदनगर : सध्या जिल्ह्यात कोरोना कहर सुरू असतानाच शनिवारी सायंकाळी अवकाळी पावसाचेही संकट आले. नगर शहरासह श्रीगोंदा, राहाता, पारनेर, ...

अहमदनगर : सध्या जिल्ह्यात कोरोना कहर सुरू असतानाच शनिवारी सायंकाळी अवकाळी पावसाचेही संकट आले. नगर शहरासह श्रीगोंदा, राहाता, पारनेर, कोपरगाव तालुक्यांत वादळासह पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसाने काही ठिकाणी कांदा भिजला, तर आंब्याच्या कैऱ्यांचा सडा पडला. महिनाभरात अवकाळीचा शेतकऱ्यांना दुसऱ्यांदा तडाखा बसला.

जवळपास महिनाभरापासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे व्यवसायांवर अनेक निर्बंध आले आहेत. त्यातच गेल्या दोन ते तीन दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल झाला आहे. सकाळी व सायंकाळी काहीसे ढगाळ वातावरण राहत होते. हवामान विभागानेही १०, ११ एप्रिलला अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला होता.

वातावरणातील उष्माही प्रचंड वाढला होता. शनिवारी दुपारपासूनच उष्मा अधिक जाणवत होता. ढगाळ वातावरण व वाराही वाहू लागला. सायंकाळी चार ते पाचच्या दरम्यान नगर शहरासह जिल्ह्यातील कोपरगाव, श्रीगोंदा, राहाता, पारनेर तालुक्यांतील काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊसही झाला. सध्या जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी कांदा काढणी सुरू आहे. अचानक आलेल्या पावसाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची धांदल उडाली. काहींचा कांदाही भिजला. आंब्याच्या कैऱ्याही गळाल्या. यामळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

महिनाभरापूर्वीच अवकाळी पावसासह वादळ, गारपिटीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. शेवगाव, पाथर्डी तालुक्यात त्यावेळी कांदा, गहू, हरभरा, आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यातून बाहेेर पडत असतानाच पुन्हा एकदा अवकाळी पावसाने तडाखा दिल्याने शेतकऱ्यांमागील शुक्लकाष्ट काही केल्या थांबायचे नाव घेईना.

---

सलग दुसऱ्या वर्षी रब्बीला फटका..

गेल्या वर्षी रब्बी हंगामातील गहू, हरभरा, कांदा अशा पिकांना कोरोनामुळे अपेक्षित भाव मिळाला नव्हता. त्यानंतर खरीप हंगामही अतिवृष्टीने हिरावून घेतला होता. त्यानंतर कांद्याच्या बियाणांमुळेही शेतकऱ्यांपुढे अडचणी होत्या. सोयाबीन, बाजरी अशी बियाणेही निकृष्ट प्रतीची मिळाल्याने शेतकरी हैराण झाले होते. त्यात आता रब्बी हंगामातही सलग दुसऱ्यांना अवकाळीचा फटका बसला. त्यामुळे सलग दुसऱ्या वर्षी शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.