शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

जिल्ह्यावर कोरोनासह अवकाळी पावसाचेही संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:21 IST

अहमदनगर : सध्या जिल्ह्यात कोरोना कहर सुरू असतानाच शनिवारी सायंकाळी अवकाळी पावसाचेही संकट आले. नगर शहरासह श्रीगोंदा, राहाता, पारनेर, ...

अहमदनगर : सध्या जिल्ह्यात कोरोना कहर सुरू असतानाच शनिवारी सायंकाळी अवकाळी पावसाचेही संकट आले. नगर शहरासह श्रीगोंदा, राहाता, पारनेर, कोपरगाव तालुक्यांत वादळासह पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसाने काही ठिकाणी कांदा भिजला, तर आंब्याच्या कैऱ्यांचा सडा पडला. महिनाभरात अवकाळीचा शेतकऱ्यांना दुसऱ्यांदा तडाखा बसला.

जवळपास महिनाभरापासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे व्यवसायांवर अनेक निर्बंध आले आहेत. त्यातच गेल्या दोन ते तीन दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल झाला आहे. सकाळी व सायंकाळी काहीसे ढगाळ वातावरण राहत होते. हवामान विभागानेही १०, ११ एप्रिलला अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला होता.

वातावरणातील उष्माही प्रचंड वाढला होता. शनिवारी दुपारपासूनच उष्मा अधिक जाणवत होता. ढगाळ वातावरण व वाराही वाहू लागला. सायंकाळी चार ते पाचच्या दरम्यान नगर शहरासह जिल्ह्यातील कोपरगाव, श्रीगोंदा, राहाता, पारनेर तालुक्यांतील काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊसही झाला. सध्या जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी कांदा काढणी सुरू आहे. अचानक आलेल्या पावसाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची धांदल उडाली. काहींचा कांदाही भिजला. आंब्याच्या कैऱ्याही गळाल्या. यामळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

महिनाभरापूर्वीच अवकाळी पावसासह वादळ, गारपिटीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. शेवगाव, पाथर्डी तालुक्यात त्यावेळी कांदा, गहू, हरभरा, आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यातून बाहेेर पडत असतानाच पुन्हा एकदा अवकाळी पावसाने तडाखा दिल्याने शेतकऱ्यांमागील शुक्लकाष्ट काही केल्या थांबायचे नाव घेईना.

---

सलग दुसऱ्या वर्षी रब्बीला फटका..

गेल्या वर्षी रब्बी हंगामातील गहू, हरभरा, कांदा अशा पिकांना कोरोनामुळे अपेक्षित भाव मिळाला नव्हता. त्यानंतर खरीप हंगामही अतिवृष्टीने हिरावून घेतला होता. त्यानंतर कांद्याच्या बियाणांमुळेही शेतकऱ्यांपुढे अडचणी होत्या. सोयाबीन, बाजरी अशी बियाणेही निकृष्ट प्रतीची मिळाल्याने शेतकरी हैराण झाले होते. त्यात आता रब्बी हंगामातही सलग दुसऱ्यांना अवकाळीचा फटका बसला. त्यामुळे सलग दुसऱ्या वर्षी शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.