शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

शेतात जाणारे रस्ते रोखल्यास फौजदारी कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:34 IST

अहमदनगर : शेतात जाणारा रस्ता, पाण्याचा मार्ग अडवला, तो मोकळा करून दिला नाही; तर त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली जाईल, ...

अहमदनगर : शेतात जाणारा रस्ता, पाण्याचा मार्ग अडवला, तो मोकळा करून दिला नाही; तर त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली जाईल, असा सज्जड इशारा जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिला आहे. यासह शेतजमीन, तुकडेबंदी, गाव स्मशानभूमी, पोट खराब जमिनी, घरकुल, पाणंद रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी ७ फेब्रुवारी ते ३१ मार्च या कालावधीत अहमदनगर जिल्हा महसूल विजय सप्तपदी अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी गुरुवारी पत्रकारांना दिली.

जिल्ह्यातील जमिनी, रस्ते, सातबारा उतारा, स्मशानभूमीची जागा, आदींबाबत सातत्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी येतात. त्या तक्रारींचा, तसेच तालुकानिहाय आढावा घेतल्यानंतर कोणत्या प्रश्नांना प्राधान्य द्यायचे, याबाबत नियोजन करण्यात आले. त्यातून ‘अहमदनगर जिल्हा महसूल विजय सप्तपदी अभियान’ राबविण्याचे निश्चित करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी सांगितले. या अभियानाचा श्रीरामपूर येथून प्रारंभ करण्यात येणार आहे.

ते म्हणाले, मामलेदार कोर्ट ॲक्टअंतर्गत शेतात जाणारे रस्ते, पाण्याचे मार्ग अडविल्यास त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली जाईल. तुकडेबंदी, तुकडेतोड असलेल्या जागांच्या बाजारभावाच्या २५ टक्के रक्कम भरून त्या नियमित केल्या जाणार आहेत. अनेक गावांमध्ये स्मशानभूमी नाही. त्या गावांना स्मशानभूमीसाठी शासकीय जमिनी उपलब्ध करून देणे, ज्या गावात शासकीय जमिनी नाहीत, अशा गावांमध्ये स्मशानभूमीसाठी जमीन संपादित करण्यात येणार आहेत. पोट खराब जमिनी लागवडीखाली आणणे, तशी नोंद करणे, परंपरागत किंवा पाणंद रस्ते अतिक्रमणमुक्त करणे, खंडकऱ्यांचे प्रश्न सोडविणे, स्वत:ची जागा नसलेल्या नागरिकांना शासकीय जागेवर घरकुल देणे याबाबत या अभियानात विशेष काम केले जाणार आहे. या अभियानासाठी प्रत्येक तालुक्यात उपजिल्हाधिकारी स्तरावरील दोन अधिकारी नियुक्त करण्यात येणार आहेत. या पत्रकार परिषदेला निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, उपजिल्हाधिकारी ऊर्मिला पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यात साधारपणे मामलेदार ॲक्टअंतर्गत २२३, तुकडेबंदीची २२३, स्मशानभूमीसाठीच्या जागेची २८९, पोट खराब जमिनीची ३०० प्रकरणे असून त्यांचा या विशेष अभियानात निपटारा करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

----

अभियानातील सप्तपदी

१) मामलेदार कोर्ट ॲक्ट (शेतात जाणारे रस्ते मोकळे करणे)

२) तुकडेतोड, तुकडेबंदी प्रकरणे

३) गावातील स्मशानभूमीसाठी जागा देणे

४) पोटखराब जमिनी लागवडीसाठी घेणे

५) खंडकऱ्यांच्या जमिनीचे प्रश्न

६) वंचितांना घरे देणारी महाआवास योजना

७) पाणंद रस्ते अतिक्रमणमुक्त करणे

----

फोटो - राजेंद्र भोसले