शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

प्रवासाची परवानगी असतानाही नायब तहसीलदारांवर गुन्हा, कर्मचारी संघटना सरसावल्या : गुन्हा मागे घेण्याचे मुख्यमंत्र्यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 17:40 IST

अहमदनगर : संगमनेरचे नायब तहसीलदार सुभाष कदम यांनी रितसर आंतरजिल्हा प्रवासाची परवानगी घेतली असतानाही त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने आश्चर्य व्यक्त होत असून, त्वरित हा गुन्हा मागे घ्यावा, अशी मागणी राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

अहमदनगर : संगमनेरचे नायब तहसीलदार सुभाष कदम यांनी रितसर आंतरजिल्हा प्रवासाची परवानगी घेतली असतानाही त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने आश्चर्य व्यक्त होत असून, त्वरित हा गुन्हा मागे घ्यावा, अशी मागणी राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.संगमनेरचे नायब तहसीलदार मूळचे पुणे जिल्ह्यातील रहिवासी असून त्यांचे पूर्ण कुटुंबीय पुण्याला राहते. ते सध्या संगमनेर तहसील कार्यालयात कोरोना योद्धा म्हणून कोरोनासंबंधित सर्व कामे करण्यासाठी कार्यरत होते. त्यांना मधुमेह व इतर व्याधी असतानाही त्यांनी कोरोनाच्या संकटात कर्तव्याला प्राधान्य दिले. आतापर्यंत संगमनेर अनेकदा हॉटस्पॉट झाले, अशा कठिण काळातही इतर अधिकाऱ्यांसह कदम यांनीही चोख कामगिरी बजावली.दरम्यान, आपल्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी विश्रांतवाडी (ता. हवेली, जि. पुणे) येथे जाण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी त्यांनी दि. २८ मे रोजी रिसतर अर्ज करून तहसीलदारांकडे केली होती. त्यासाठी त्यांनी संगमनेर ग्रामीण रूग्णालयातून आरोग्य प्रमाणपत्रही अर्जासोबत जोडले होते. या अर्जावर नायब तहसीलदार कदम यांच्यासह त्यांचा कारचालक व इतर एक असे तिघे प्रवास करणार होते. दि. २८ मे ते १ जून असा प्रवासाचा कालावधी होता. त्यावर संगमनेर तहसीलदारांनी हा अर्ज मंजूर करत कदम यांना प्रवासाची रितसर परवानगी दिलेली होती.दरम्यान, कदम पुणे येथे जाऊन पुन्हा संगमनेरला आले. परंतु त्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटल्यामुळे त्यांनी पुन्हा पुणे गाठले. त्यानंतर त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आढळला. दरम्यान, त्यांच्या पासचा कालावधी शिल्लक असताना ते पुण्याला गेले की नंतर गेले, याबाबत माहिती पोलिसांकडेही नाही. पोलिसांनी फिर्यादीत ३१ मे ते ६ जून या दरम्यान त्यांनी प्रवास केला, असे मोघम म्हटले आहे.---------महसूल संघटना आक्रमकआता यावर महसूल संघटना आक्रमक झाल्या असून कदम यांच्यावरील गुन्हा मागे घेण्याची मागणी त्यांनी केली आहे. कदम हे अनियंत्रित मधुमेही रूग्ण असतानाही ते चोवीस तास कार्यालयात राहून योगदान देत होते. त्यांच्यावर आधीचे उपचार पुणे येथे झालेले आहेत. प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना तातडीने पुणे येथे जावे लागले. दरम्यान कोरोना योद्ध्यांना जिल्हा बंदीतून शिथिलता देण्याबाबत आरोग्य विभागाने परिपत्रक काढलेले आहे. असे असतानाही कोरोना योद्ध्यांवर व तेही आजारी असताना गुन्हे दाखल होत असतील तर इतर कार्यरत कर्मचाऱ्यांचेही मनोबल घसरणार आहे, असे संघटनांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे.---------कोणाच्या आदेशावरून गुन्हानायब तहसीलदार कदम यांनी रिसतर परवानगी घेऊन आंतरजिल्हा प्रवास केलेला आहे. तरीही त्यांच्यावर जिल्हाबंदीचे उल्लंघन केल्याचा गुन्हा संगमनेर पोलिसांनी दाखल केला. जिल्ह्यात आतापर्यंत शेकडो लोक जिल्हाबंदीचे उल्लंघन करून दाखल झालेले आहेत. त्यात पुणे, मुंबईतून येणाºयांची संख्या मोठी आहे. त्यातील अनेकजण जिल्ह्यात आल्यावर पॉझिटिव्ह आढळले व त्यांच्यामुळे हा संसर्ग अनेकांपर्यंत फैलावला. मग पोलिसांनी या सर्वांवर गुन्हे का दाखल नाही केले. उलट ज्यांनी कोरोना जिल्ह्यात पसरवला त्यांचे टाळ्यांच्या गजरात अनेक ठिकाणी स्वागत झाले. मग नायब तहसीलदारांवरच पोलिसांनी कोणाच्या आदेशाने गुन्हा दाखल केला, असा प्रश्न उपस्थित होत आहे.