शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

निळवंडे कालव्यांचा खर्च ६०० कोटींनी वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:38 IST

अहमदनगर : अकोेले तालुक्यातील निळवंडे धरणाचे काम पूर्ण होऊन बारा वर्षे उलटली आहेत. तरीही कालव्यांची कामे अपूणर्च आहेत. जमीन ...

अहमदनगर : अकोेले तालुक्यातील निळवंडे धरणाचे काम पूर्ण होऊन बारा वर्षे उलटली आहेत. तरीही कालव्यांची कामे अपूणर्च आहेत. जमीन अधिग्रहण, जलसेतू, महामार्गामुळे कालव्यांची कामे रखडली आहेत. यामुळे कालव्यांचा खर्च ६०० कोटी रुपयांनी वाढला आहे. तर श्रीगोंदा तालुक्यातील डिंबे-माणिकडोह बोगद्याचे काम गेल्या १५ वर्षापासून रखडले असून त्याचा खर्च २२५ कोटींनी वाढला आहे. रखडलेल्या या कामांमुळे ना सिंचनाचा लाभ, ना शेतीला फायदा.. अशीच काहीशी अवस्था आहे.

अकोले तालुक्यातील ऊर्ध्व प्रवरा निळवंडे डावा कालव्यांची कामे गेली अकरा महिन्यांपासून प्रगतीपथावर आहेत. जवळपास ६० टक्के कालव्यांची कामे पूर्ण झाली आहेत. तर उर्वरित ४० टक्के काम रखडले आहे. निळवंडे धरणाचे काम २००८ मध्ये पूर्ण झाले आहे. २००७ ला कालव्यांसाठी ७८२ कोटींचा खर्च प्रस्तावित होता. तो वाढत जाऊन कालव्यासाठी २०१७ मध्ये चौथी सुप्रिमा काढण्यात आली होती. त्यात कालव्यांसाठी २३५० कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित होता. आतापर्यंत या कालव्यांवर १५०० कोटी रुपयांचा खर्च केला आहे. तर उर्वरित कालव्यांसाठी अजून १३५० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. निधीची कमतरता, जमीन अधिग्रहण, जलसेतू, महामार्ग, शेती, भूमिगत कालवे आंदोलन यामुळे कालव्यांची कामे रखडली होती. यामुळे जवळपास ६०० कोटींनी कालव्यांच्या कामाचा खर्च वाढला आहे. आता पुन्हा या कामाला गती आली आहे.

डिंबे-माणिकडोह बोगद्याच्या कामाला राजकीय अडसर

श्रीगोंदा तालुक्यातील डिंबे-माणिकडोह बोगद्याचे काम गेल्या १५ वर्षांपासून रखडले आहे. २००५ मध्ये या बोगद्यासाठी ६० ते ६५ कोटींचा खर्च अपेक्षित होता. आता ३१० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. डिंबे-माणिकडोह या १६ किलोमीटरच्या बोगद्याला २००५ मध्ये प्रशासकीय मंजुरी मिळाली. परंतु, ती केंद्रीय जलआयोगाच्या मान्यतेमुळे रखडली होती. त्याला आता आयोगाने मंजुरी दिली आहे. तरीही राज्य सरकारकडून या कामाला गती देण्यासाठी उदासीनता आहे.

...

डिंबे-माणिकडोह बोगदा होणे गरजेचे आहे. नगर जिल्ह्यातील कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांकडे मानवतावादी दृष्टिकोनातून पहावे व राजकारण बाजूला ठेवावे. लवादाने दिलेल्या न्यायाप्रमाणे पाणी वाटप करून दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना न्याय द्यावा.

-मधुकर शेलार, शेतकरी, श्रीगोंदा.

....

निळवंडे धरणाच्या कालव्याचे काम सध्या जोरात सुरू आहे. जवळपास ६० टक्के काम पूर्ण झाले आहे. जमीन भूसंपादन, निधी, कोरोना साथरोगामुळे काम दीड वर्षे लांबले. आता भूसंपादनाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे २०२२ पर्यंत सर्व कालव्यांची कामे १०० टक्के पूर्ण होतील.

-प्रमोद माने, प्रभारी अभियंता, पाटबंधारे विभाग, अकोले.

.....