शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
2
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
3
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
4
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
5
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
6
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
7
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
8
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
9
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
10
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
11
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
12
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
13
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
14
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
15
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
16
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
17
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
18
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
19
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
20
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!

निळवंडे कालव्यांचा खर्च ६०० कोटींनी वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:38 IST

अहमदनगर : अकोेले तालुक्यातील निळवंडे धरणाचे काम पूर्ण होऊन बारा वर्षे उलटली आहेत. तरीही कालव्यांची कामे अपूणर्च आहेत. जमीन ...

अहमदनगर : अकोेले तालुक्यातील निळवंडे धरणाचे काम पूर्ण होऊन बारा वर्षे उलटली आहेत. तरीही कालव्यांची कामे अपूणर्च आहेत. जमीन अधिग्रहण, जलसेतू, महामार्गामुळे कालव्यांची कामे रखडली आहेत. यामुळे कालव्यांचा खर्च ६०० कोटी रुपयांनी वाढला आहे. तर श्रीगोंदा तालुक्यातील डिंबे-माणिकडोह बोगद्याचे काम गेल्या १५ वर्षापासून रखडले असून त्याचा खर्च २२५ कोटींनी वाढला आहे. रखडलेल्या या कामांमुळे ना सिंचनाचा लाभ, ना शेतीला फायदा.. अशीच काहीशी अवस्था आहे.

अकोले तालुक्यातील ऊर्ध्व प्रवरा निळवंडे डावा कालव्यांची कामे गेली अकरा महिन्यांपासून प्रगतीपथावर आहेत. जवळपास ६० टक्के कालव्यांची कामे पूर्ण झाली आहेत. तर उर्वरित ४० टक्के काम रखडले आहे. निळवंडे धरणाचे काम २००८ मध्ये पूर्ण झाले आहे. २००७ ला कालव्यांसाठी ७८२ कोटींचा खर्च प्रस्तावित होता. तो वाढत जाऊन कालव्यासाठी २०१७ मध्ये चौथी सुप्रिमा काढण्यात आली होती. त्यात कालव्यांसाठी २३५० कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित होता. आतापर्यंत या कालव्यांवर १५०० कोटी रुपयांचा खर्च केला आहे. तर उर्वरित कालव्यांसाठी अजून १३५० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. निधीची कमतरता, जमीन अधिग्रहण, जलसेतू, महामार्ग, शेती, भूमिगत कालवे आंदोलन यामुळे कालव्यांची कामे रखडली होती. यामुळे जवळपास ६०० कोटींनी कालव्यांच्या कामाचा खर्च वाढला आहे. आता पुन्हा या कामाला गती आली आहे.

डिंबे-माणिकडोह बोगद्याच्या कामाला राजकीय अडसर

श्रीगोंदा तालुक्यातील डिंबे-माणिकडोह बोगद्याचे काम गेल्या १५ वर्षांपासून रखडले आहे. २००५ मध्ये या बोगद्यासाठी ६० ते ६५ कोटींचा खर्च अपेक्षित होता. आता ३१० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. डिंबे-माणिकडोह या १६ किलोमीटरच्या बोगद्याला २००५ मध्ये प्रशासकीय मंजुरी मिळाली. परंतु, ती केंद्रीय जलआयोगाच्या मान्यतेमुळे रखडली होती. त्याला आता आयोगाने मंजुरी दिली आहे. तरीही राज्य सरकारकडून या कामाला गती देण्यासाठी उदासीनता आहे.

...

डिंबे-माणिकडोह बोगदा होणे गरजेचे आहे. नगर जिल्ह्यातील कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांकडे मानवतावादी दृष्टिकोनातून पहावे व राजकारण बाजूला ठेवावे. लवादाने दिलेल्या न्यायाप्रमाणे पाणी वाटप करून दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना न्याय द्यावा.

-मधुकर शेलार, शेतकरी, श्रीगोंदा.

....

निळवंडे धरणाच्या कालव्याचे काम सध्या जोरात सुरू आहे. जवळपास ६० टक्के काम पूर्ण झाले आहे. जमीन भूसंपादन, निधी, कोरोना साथरोगामुळे काम दीड वर्षे लांबले. आता भूसंपादनाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे २०२२ पर्यंत सर्व कालव्यांची कामे १०० टक्के पूर्ण होतील.

-प्रमोद माने, प्रभारी अभियंता, पाटबंधारे विभाग, अकोले.

.....