शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

कोरोनाबाधित रुग्णाचा मृतदेह नगरहून श्रीरामपूरला पाठविला, अंत्यविधीनंतर जिल्हा रुग्णालयाला आली जाग 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 13:21 IST

श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : एका ६० वर्षीय कोरोना बाधित व्यक्तीचा मृतदेह नगर येथील जिल्हा रुग्णालय प्रशासनाने चक्क श्रीरामपूरला नेऊन कुटुंबियाच्या ताब्यात दिला. ही गंभीर चूक लक्षात येताच जिल्हा रुग्णालयाने कुटुंबीयांना मृतदेह परत नगर येथे पाठवण्यास सांगितले. मात्र तोपर्यंत श्रीरामपूर येथे अंत्यविधी पार पडला होता. 

श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : एका ६० वर्षीय कोरोना बाधित व्यक्तीचा मृतदेह नगर येथील जिल्हा रुग्णालय प्रशासनाने चक्क श्रीरामपूरला नेऊन कुटुंबियाच्या ताब्यात दिला. ही गंभीर चूक लक्षात येताच जिल्हा रुग्णालयाने कुटुंबीयांना मृतदेह परत नगर येथे पाठवण्यास सांगितले. मात्र तोपर्यंत श्रीरामपूर येथे अंत्यविधी पार पडला होता. 

शनिवारी सकाळी साडे आठ वाजेच्या दरम्यान हा प्रकार घडला. घडलेल्या या गंभीर चुकीमुळे कोरोनाचा फैलाव होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रशासनाकडून आता सारवासारव केली जात असून प्रकरणावर पडदा टाकण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

श्रीरामपूर येथील एका ६० वर्षीय रुग्णाला बुधवारी छातीत दुखू लागल्याने शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचाराकरिता नेण्यात आले. मात्र त्यास न्यूमोनियाची लक्षणे आढळल्याने नगर येथे जाण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. बुधवारी रात्री अकरा वाजेच्या दरम्यान रुग्णाला सिविलमध्ये भरती करण्यात आले. गुरुवारी सकाळी त्यांची कोरोनाची चाचणी घेण्यात आली.

शनिवारी पहाटे या रुग्णाचा सिव्हिल रुग्णालयात मृत्यू झाला. मृतदेह रुग्णवाहिकेतून श्रीरामपूरला नेण्यात आला. हृदयक्रिया बंद पडल्याने मृत्यू झाल्याचा अहवाल देण्यात आला आहे. सकाळी कुटुंबीय व मोजक्या लोकांच्या उपस्थितीत रुग्णावर अंत्यसंस्कार सुरू असताना जिल्हा रुग्णालयातील एका कर्मचाºयाने कुटुंबीयांना फोन करत मृतदेह पुन्हा नगरला पाठवण्याची विनंती केली. रुग्णाला कोरोनाची बाधा झाली असल्यामुळे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करू नयेत, अशी सूचना केली. मात्र तोपर्यंत अंत्यसंस्कार पूर्ण झाले.

जिल्हा रुग्णालयामधील महिला कर्मचाºयाने आपण रुग्णाच्या वार्डाची प्रमुख आहोत. सकाळी मृतदेह ताब्यात देणाºया कर्मचाºयाला तो कोरोनाचा रुग्ण असल्याची माहिती नव्हती, असे कुटुंबियांना सांगितले. नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी रुग्णाचा मृतदेह परत नगरला पाठवण्याचे मला सांगितले आहे, असेही कर्मचाºयांनी स्पष्ट केले.

अधिकाºयांनी काय केला खुलासा?दरम्यान, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता ते सारवासारव करताना दिसले. रुग्णावर कोरोना प्रतिबंधक उपाययोजनेनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. अंत्यसंस्कारावेळी दहा ते बारा लोक उपस्थित होते व त्यांनी पीपीई कीट परिधान केले होते. तसेच मृतदेह संपूर्णपणे झाकण्यात आलेला होता ,असा बचाव केला. मात्र मृतदेह नगरहून येथे आणता येत नाही अशी कबुली दिली. रुग्णाच्या कुटुंबातील नऊ जणांना विलगीकरण कक्षात पाठवण्यात आले असून त्यांचे स्वॅब तपासले जाणार असल्याचे डॉ. शिंदे यांनी सांगितले. प्रत्यक्षात मात्र कुटुंबियांना शुक्रवारी रात्रीच विलगीकरण कक्षात हलवण्यात आले होते.

कोरोनाच्या रुग्णाचा मृत्यू झाल्यास मृतदेह इतर ठिकाणी हलवला जात नाही तसेच तो कुटुंबीयांच्या ताब्यात देता येत नाही. जिल्हा रुग्णालयाने गंभीर हलगर्जीपणा केल्याचे दिसते आहे. श्रीरामपूर येथील प्रशासनानेदेखील हा धोका ओळखला नाही. रुग्णाचा मृतदेह शहरात आणण्यात आला. तेथे सर्व धार्मिक क्रिया पार पडल्या. आसपासच्या लोकांची गदीर्ही जमली होती. येथील सामाजिक कार्यकर्ते एड समीन बागवान यांनी याप्रकरणी प्रशासनाविरोधात जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे म्हटले आहे.