शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

कोरोना रुग्णांना घेऊन दररोज भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:25 IST

श्रीरामपूर शहरामध्ये ग्रामीण रुग्णालयासह १४ खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. एकूण ५०० बेड्स उपलब्ध असले तरी त्यात ...

श्रीरामपूर शहरामध्ये ग्रामीण रुग्णालयासह १४ खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. एकूण ५०० बेड्स उपलब्ध असले तरी त्यात ऑक्सिजन बेड्सचा मात्र तुटवडा आहे.

अशा संकटकाळात शहरातील रुग्णांना नगर, नाशिक, औरंगाबाद व पुणे येथील रुग्णालयांमध्ये घेऊन जावे लागत आहे, अशी माहिती रुग्णवाहिका चालकांनी लोकमतला दिली.

-----------

औरंगाबादला अधिक फेऱ्या

श्रीरामपूर व नगरमध्ये ऑक्सिजन बेड्स मिळत नाहीत. त्यामुळे औरंगाबाद येथील घाटी व हेडगेवार रुग्णालयांमध्ये रुग्णांना घेऊन जात आहे. मात्र, तेथेही बेड मिळेल याची कोणतीही खात्री नाही. तिथे पोहोचण्यापूर्वीच वजनदार मंडळी बेड्स मिळवतात. त्यामुळे रुग्णांना शहरभर घेऊन फिरावे लागते. त्यामुळे दिवसभरात एक किंवा दोनच फेऱ्या होतात, अशी माहिती शाम हेळकुटे यांनी दिली.

-------------

रुग्णवाहिकेतच रुग्ण अडकतात

संशयितांची एचआरसी चाचणी केल्यानंतर कोरोनाची तीव्रता समजते. त्यानंतर बेड्सची शोधाशोध सुरू होते. ऑक्सिजन किंवा आयसीयू बेड तर मिळतच नाही. तोपर्यंत रुग्ण मात्र रुग्णवाहिकेतच बसून राहतो. मानवतेच्या भूमिकेतून त्यांना गाडीतून उतरून देता येत नाही. मात्र, स्वत: बाधित होण्याची भीती बळावते अशी माहिती चंद्रकांत कदम या चालकाने दिली.

----------

कुटुंबीय काळजीत

रुग्णवाहिकेच्या सेवेमुळे कुटुंबीय काळजीत पडतात. संपूर्ण कुटुंब बाधित होण्याची शक्यता असते. त्यामुळे काम बंद करून घरीच थांबण्याचा आग्रह कुटुंबीय धरतात. मात्र, घरी थांबलो तर उपजीविकेचे काय? हा प्रश्न आहे. रात्री-अपरात्री रुग्णाच्या कुटुंबीयांचे रुग्णवाहिकेसाठी फोन येतात. स्थिती हाताबाहेर गेलेली आहे, असा अनुभव या चालकांनी कथन केला.

----------