शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
3
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
4
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
5
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून विहिरीत फेकलं
6
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
7
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
8
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
9
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
10
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
11
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
12
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
13
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
14
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
15
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
16
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
17
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
18
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
19
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
20
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!

जिल्ह्यात आजपासून कोरोना लसीकरण मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:24 IST

अहमदनगर : कोरोना लसीकरण मोहिमेसाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार १६ जानेवारी ...

अहमदनगर : कोरोना लसीकरण मोहिमेसाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार १६ जानेवारी रोजी ही मोहीम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यात एकूण १२ केंद्रांवर पहिल्या टप्प्यात लसीकरण होणार असून, यात जिल्हा रुग्णालय, जिल्ह्यातील आठ ग्रामीण रुग्णालये आणि महानगरपालिका क्षेत्रातील ४ नागरी आरोग्य केंद्रांचा समावेश आहे.

कोरोना लसीकरणासंदर्भातील सर्व तयारी आरोग्य विभागाने पूर्ण केली आहे. १३ जानेवारी रोजी पुण्याहून लसीचे डोस अहमदनगर येथे आणण्यात आले. तेथून जिल्हा परिषदेच्या केंद्रात त्याची साठवणूक करण्यात आली. तेथून १४ जानेवारीला या लसीचे वितरण संबंधित लसीकरण केंद्रांना करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, महानगरपालिका आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी दिली. लसटोचक आणि पर्यवेक्षक यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. पहिल्या टप्प्यात केवळ आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. जिल्हा रुग्णालयात शनिवारी सकाळी प्रत्यक्ष लसीकरण मोहिमेला प्रारंभ होणार आहे.

........................

येथे होणार लसीकरण

शनिवारी जिल्हा सामान्य रुग्णालयासह पाथर्डी उपजिल्हा रुग्णालय, कर्जत उपजिल्हा रुग्णालय, शेवगाव ग्रामीण रुग्णालय, श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालय, राहाता ग्रामीण रुग्णालय, संगमनेर ग्रामीण रुग्णालय, अकोले ग्रामीण रुग्णालय येथे लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. याचबरोबर, महानगरपालिका क्षेत्रातील तोफखाना नागरी आरोग्य केंद्र, जिजामाता नागरी आरोग्य केंद्र, केडगाव नागरी आरोग्य केंद्र आणि नागापूर नागरी आरोग्य केंद्र येथे लसीकरण करण्यात येणार आहे.

.............

लसीकरणासाठी ३१ हजार कर्मचाऱ्यांची नोंदणी

जिल्ह्यात ३१ हजार १९६ आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीकरणासाठी पोर्टलवर नोंदणी केली आहे. त्यात सुरुवातीच्या टप्प्यात या १२ केंद्रांतर्गत येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण केले जाणार आहे. जिल्ह्यासाठी ३९ हजार लसींचे डोस प्राप्त झाले आहेत. दरदिवशी १०० जणांना प्रत्येक केंद्रांवर लस दिली जाणार आहे.

.................

ओळख पटली तरच लस

लसीकरणासाठीचा प्रोटोकॉल ठरवून देण्यात आला असून, पोर्टलवर नोंदणी केलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांची ओळख पटविली जाणार आहे. ओळख पटली तरच त्यांना प्रतीक्षा कक्षात बसविले जाईल. नंतर त्यांना लस टोचली जाणार आहे. लस दिलेल्या कर्मचाऱ्यांना अर्धा तास विश्रांती घेण्यासाठी सांगितले जाईल. कोणताच त्रास होत नाही, असे निदर्शनास आल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात येणार आहे.