अहमदनगर : जिल्ह्यात गुरुवारी ३२३ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली. त्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या आता १,८३५ इतकी झाली आहे. दरम्यान एका दिवसात पाच कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली.
जिल्ह्यात गुरुवारी ३०३ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७६ हजार १६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.२० टक्के इतके झाले आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये नगर शहर (१०२), कर्जत (८), कोपरगाव (१८), नगर ग्रामीण (१३), पारनेर (१२), पाथर्डी (४), राहाता (६०), संगमनेर (४२), कॅन्टोन्मेंट (१०), अकोले (६), नेवासा (७), राहुरी (१७), शेवगाव (६),श्रीगोंदा (३), श्रीरामपूर (७), इतर जिल्हा (७), जामखेड (१) येथील रुग्णांचा समावेश आहे.
जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या आकडेवारीनुसार बुधवारी एकूण मृत्यू झालेल्यांची संख्या १,१६३ इतकी होती, ती संख्या गुरुवारी १,१६८ इतकी झाली आहे. त्यामुळे पाच जणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.