शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
5
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
6
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
7
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
8
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
9
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
10
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
11
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
12
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
13
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
14
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
15
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
16
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
17
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
18
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
19
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
20
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली

‘कोरोना’ हाच बनला गुरू, जाणकारांना काय वाटते?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2020 12:45 IST

अहमदनगर : कोरोनाने प्रत्येकाच्या जीवनात अभूतपूर्व बदल झाला आहे. अनेक ग्रंथ, तत्त्वज्ञ आणि अनुभवातून जीवन जगण्याची प्रेरणा अनेकांना मिळत ...

अहमदनगर : कोरोनाने प्रत्येकाच्या जीवनात अभूतपूर्व बदल झाला आहे. अनेक ग्रंथ, तत्त्वज्ञ आणि अनुभवातून जीवन जगण्याची प्रेरणा अनेकांना मिळत असते. कोरोनाने मात्र सर्वांचेच जगणे बदलून टाकले आहे. कोरोनाने भल्याभल्यांना जमिनीवरही आणले आहे, तर अनेकांना जगण्याची नवी प्रेरणाही दिली आहे. माणसाची धडपड काही काळ शांत झाली आणि पुन्हा नव्या उमेदीसह सुरू झाली. माणसाला सर्व काही शिकविणारा ‘कोरोना’ हाच सर्वांचा गुरू बनला आहे. याबाबत जाणकारांना काय वाटते? गुरुपौर्णिमेनिमित्त ‘लोकमत’ने तज्ज्ञांशी साधलेला हा आॅनलाईन संवाद.

-------------

निसर्गला गृहित धरू नका, निसर्गाची काळजी घ्यानाती जपा, घरातल्याशी संवाद साधास्वच्छता असेल तर आजार जवळ येत नाहीतप्रत्येकाने स्वत:च्या तब्येतीची काळजी घ्यावीप्राणीमात्रांवर प्रेम करासंकट मोठे असले तरी मात करता येतेजीवनशैलीमध्ये बदल करता येतोजगात राहणारे सर्व समान आहेतजगण्याची मर्यादा शिकवली

---------

श्रीमद्भगवतगीतेचा संदेश प्रत्येकाच्या जीवनात महत्त्वाचा आहे.  गीतेतील ‘करुण’ रसापेक्षा ‘विरह’ रस शिकविण्याची गरज आहे.  पृथ्वीवर असलेले आततायी संपविणे ही काळाची गरज आहे. कोरोनाने अनेकांना जमिनीवर आणले, अनेकांचा अहंकार गळाला. श्रीमंत असो की गरीब सर्वच घरात बसून होते. प्रत्येकाने आपल्या पायरीने आणि निसर्ग नियमाने जगावे, असा संदेश यातून मिळाला. एकांताशिवाय सुख आणि ज्ञान मिळू शकत नाही, हे कोरोनानेच शिकवले आहे.    -अशोकानंद महाराज कर्डिले, निरुपणकार

-------------

कोरोना हे नैसर्गिक संकट नाही. कृत्रिम बॉम्बप्रमाणे हा विषाणू चीनने पसरविला. त्यामुळे हबकून जाण्याची गरज नाही. जमेल तसा या कोरोनाशी मुकाबला करणे, सदैव लढण्यासाठी सिद्ध राहणे गरज बनली आहे. चीनने कोरोना हा विस्तारवादाचे हत्यार म्हणून जगावर सोडले. मात्र भौतिक साधनांचा वापर करून त्याचा बिमोड करण्यासाठी तयार राहणे ही खरी ताकद कोरोनामुळे तयार झाली आहे. माणसाने इतर प्राण्यांचा संभाळ करण्यासाठी सिद्ध राहिले पाहिजे, याची शिकवण या संकटातून मिळाली आहे. जमिनीवर आणले, अहंकार गळाला या नकारात्मक बाजू सोडून घाबरून जाण्यात अर्थ नाही.  

 -डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे, निवृत्त प्राचार्य 

-------------

कोरोनाने माणसाला खूप काही नवीन गोष्टी शिकवल्या आहेत. प्रत्येकाने स्वयंशिस्तीत जगणे आवश्यक झाले आहे. स्वत:ची काळजी घेऊन जगले पाहिजे. कोरोनाने आर्थिक नियोजन कोलमडले आले. त्यामुळे उत्पन्नाचा पर्यायी स्त्रोत जवळ असला पाहिजे, याची जाणीव कोरोनाने करून दिली आहे. आर्थिक नियोजन कोलमडले असल्याने प्रत्येकाच्या मनावर ताण आला आहे. आपल्यावर निसर्गासारखी एक शक्ती आहे, हेच माणूस विसरला होता. त्याची जाणीव झाली आहे. कोरोनाचे संकट अचानक आल्याने त्याला पेलण्यासाठी भारत देश सुसज्ज नव्हता, हेही आता उघड झाले आहे. जगण्यासाठी सदैव सज्ज पाहिजे, हेही कोरोनाने शिकवले.    

- डॉ. अमित सपकाळ, मानसोपचार तज्ज्ञ