शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

‘कोरोना’ हाच बनला गुरू, जाणकारांना काय वाटते?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2020 12:45 IST

अहमदनगर : कोरोनाने प्रत्येकाच्या जीवनात अभूतपूर्व बदल झाला आहे. अनेक ग्रंथ, तत्त्वज्ञ आणि अनुभवातून जीवन जगण्याची प्रेरणा अनेकांना मिळत ...

अहमदनगर : कोरोनाने प्रत्येकाच्या जीवनात अभूतपूर्व बदल झाला आहे. अनेक ग्रंथ, तत्त्वज्ञ आणि अनुभवातून जीवन जगण्याची प्रेरणा अनेकांना मिळत असते. कोरोनाने मात्र सर्वांचेच जगणे बदलून टाकले आहे. कोरोनाने भल्याभल्यांना जमिनीवरही आणले आहे, तर अनेकांना जगण्याची नवी प्रेरणाही दिली आहे. माणसाची धडपड काही काळ शांत झाली आणि पुन्हा नव्या उमेदीसह सुरू झाली. माणसाला सर्व काही शिकविणारा ‘कोरोना’ हाच सर्वांचा गुरू बनला आहे. याबाबत जाणकारांना काय वाटते? गुरुपौर्णिमेनिमित्त ‘लोकमत’ने तज्ज्ञांशी साधलेला हा आॅनलाईन संवाद.

-------------

निसर्गला गृहित धरू नका, निसर्गाची काळजी घ्यानाती जपा, घरातल्याशी संवाद साधास्वच्छता असेल तर आजार जवळ येत नाहीतप्रत्येकाने स्वत:च्या तब्येतीची काळजी घ्यावीप्राणीमात्रांवर प्रेम करासंकट मोठे असले तरी मात करता येतेजीवनशैलीमध्ये बदल करता येतोजगात राहणारे सर्व समान आहेतजगण्याची मर्यादा शिकवली

---------

श्रीमद्भगवतगीतेचा संदेश प्रत्येकाच्या जीवनात महत्त्वाचा आहे.  गीतेतील ‘करुण’ रसापेक्षा ‘विरह’ रस शिकविण्याची गरज आहे.  पृथ्वीवर असलेले आततायी संपविणे ही काळाची गरज आहे. कोरोनाने अनेकांना जमिनीवर आणले, अनेकांचा अहंकार गळाला. श्रीमंत असो की गरीब सर्वच घरात बसून होते. प्रत्येकाने आपल्या पायरीने आणि निसर्ग नियमाने जगावे, असा संदेश यातून मिळाला. एकांताशिवाय सुख आणि ज्ञान मिळू शकत नाही, हे कोरोनानेच शिकवले आहे.    -अशोकानंद महाराज कर्डिले, निरुपणकार

-------------

कोरोना हे नैसर्गिक संकट नाही. कृत्रिम बॉम्बप्रमाणे हा विषाणू चीनने पसरविला. त्यामुळे हबकून जाण्याची गरज नाही. जमेल तसा या कोरोनाशी मुकाबला करणे, सदैव लढण्यासाठी सिद्ध राहणे गरज बनली आहे. चीनने कोरोना हा विस्तारवादाचे हत्यार म्हणून जगावर सोडले. मात्र भौतिक साधनांचा वापर करून त्याचा बिमोड करण्यासाठी तयार राहणे ही खरी ताकद कोरोनामुळे तयार झाली आहे. माणसाने इतर प्राण्यांचा संभाळ करण्यासाठी सिद्ध राहिले पाहिजे, याची शिकवण या संकटातून मिळाली आहे. जमिनीवर आणले, अहंकार गळाला या नकारात्मक बाजू सोडून घाबरून जाण्यात अर्थ नाही.  

 -डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे, निवृत्त प्राचार्य 

-------------

कोरोनाने माणसाला खूप काही नवीन गोष्टी शिकवल्या आहेत. प्रत्येकाने स्वयंशिस्तीत जगणे आवश्यक झाले आहे. स्वत:ची काळजी घेऊन जगले पाहिजे. कोरोनाने आर्थिक नियोजन कोलमडले आले. त्यामुळे उत्पन्नाचा पर्यायी स्त्रोत जवळ असला पाहिजे, याची जाणीव कोरोनाने करून दिली आहे. आर्थिक नियोजन कोलमडले असल्याने प्रत्येकाच्या मनावर ताण आला आहे. आपल्यावर निसर्गासारखी एक शक्ती आहे, हेच माणूस विसरला होता. त्याची जाणीव झाली आहे. कोरोनाचे संकट अचानक आल्याने त्याला पेलण्यासाठी भारत देश सुसज्ज नव्हता, हेही आता उघड झाले आहे. जगण्यासाठी सदैव सज्ज पाहिजे, हेही कोरोनाने शिकवले.    

- डॉ. अमित सपकाळ, मानसोपचार तज्ज्ञ