शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

‘कोरोना’ हाच बनला गुरू, जाणकारांना काय वाटते?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2020 12:45 IST

अहमदनगर : कोरोनाने प्रत्येकाच्या जीवनात अभूतपूर्व बदल झाला आहे. अनेक ग्रंथ, तत्त्वज्ञ आणि अनुभवातून जीवन जगण्याची प्रेरणा अनेकांना मिळत ...

अहमदनगर : कोरोनाने प्रत्येकाच्या जीवनात अभूतपूर्व बदल झाला आहे. अनेक ग्रंथ, तत्त्वज्ञ आणि अनुभवातून जीवन जगण्याची प्रेरणा अनेकांना मिळत असते. कोरोनाने मात्र सर्वांचेच जगणे बदलून टाकले आहे. कोरोनाने भल्याभल्यांना जमिनीवरही आणले आहे, तर अनेकांना जगण्याची नवी प्रेरणाही दिली आहे. माणसाची धडपड काही काळ शांत झाली आणि पुन्हा नव्या उमेदीसह सुरू झाली. माणसाला सर्व काही शिकविणारा ‘कोरोना’ हाच सर्वांचा गुरू बनला आहे. याबाबत जाणकारांना काय वाटते? गुरुपौर्णिमेनिमित्त ‘लोकमत’ने तज्ज्ञांशी साधलेला हा आॅनलाईन संवाद.

-------------

निसर्गला गृहित धरू नका, निसर्गाची काळजी घ्यानाती जपा, घरातल्याशी संवाद साधास्वच्छता असेल तर आजार जवळ येत नाहीतप्रत्येकाने स्वत:च्या तब्येतीची काळजी घ्यावीप्राणीमात्रांवर प्रेम करासंकट मोठे असले तरी मात करता येतेजीवनशैलीमध्ये बदल करता येतोजगात राहणारे सर्व समान आहेतजगण्याची मर्यादा शिकवली

---------

श्रीमद्भगवतगीतेचा संदेश प्रत्येकाच्या जीवनात महत्त्वाचा आहे.  गीतेतील ‘करुण’ रसापेक्षा ‘विरह’ रस शिकविण्याची गरज आहे.  पृथ्वीवर असलेले आततायी संपविणे ही काळाची गरज आहे. कोरोनाने अनेकांना जमिनीवर आणले, अनेकांचा अहंकार गळाला. श्रीमंत असो की गरीब सर्वच घरात बसून होते. प्रत्येकाने आपल्या पायरीने आणि निसर्ग नियमाने जगावे, असा संदेश यातून मिळाला. एकांताशिवाय सुख आणि ज्ञान मिळू शकत नाही, हे कोरोनानेच शिकवले आहे.    -अशोकानंद महाराज कर्डिले, निरुपणकार

-------------

कोरोना हे नैसर्गिक संकट नाही. कृत्रिम बॉम्बप्रमाणे हा विषाणू चीनने पसरविला. त्यामुळे हबकून जाण्याची गरज नाही. जमेल तसा या कोरोनाशी मुकाबला करणे, सदैव लढण्यासाठी सिद्ध राहणे गरज बनली आहे. चीनने कोरोना हा विस्तारवादाचे हत्यार म्हणून जगावर सोडले. मात्र भौतिक साधनांचा वापर करून त्याचा बिमोड करण्यासाठी तयार राहणे ही खरी ताकद कोरोनामुळे तयार झाली आहे. माणसाने इतर प्राण्यांचा संभाळ करण्यासाठी सिद्ध राहिले पाहिजे, याची शिकवण या संकटातून मिळाली आहे. जमिनीवर आणले, अहंकार गळाला या नकारात्मक बाजू सोडून घाबरून जाण्यात अर्थ नाही.  

 -डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे, निवृत्त प्राचार्य 

-------------

कोरोनाने माणसाला खूप काही नवीन गोष्टी शिकवल्या आहेत. प्रत्येकाने स्वयंशिस्तीत जगणे आवश्यक झाले आहे. स्वत:ची काळजी घेऊन जगले पाहिजे. कोरोनाने आर्थिक नियोजन कोलमडले आले. त्यामुळे उत्पन्नाचा पर्यायी स्त्रोत जवळ असला पाहिजे, याची जाणीव कोरोनाने करून दिली आहे. आर्थिक नियोजन कोलमडले असल्याने प्रत्येकाच्या मनावर ताण आला आहे. आपल्यावर निसर्गासारखी एक शक्ती आहे, हेच माणूस विसरला होता. त्याची जाणीव झाली आहे. कोरोनाचे संकट अचानक आल्याने त्याला पेलण्यासाठी भारत देश सुसज्ज नव्हता, हेही आता उघड झाले आहे. जगण्यासाठी सदैव सज्ज पाहिजे, हेही कोरोनाने शिकवले.    

- डॉ. अमित सपकाळ, मानसोपचार तज्ज्ञ