शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे लग्नासाठीच्या अपेक्षाही बदलल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:45 IST

संगमनेर : कोरोनामुळे नियोजित वधू आणि वराच्या अपेक्षांमध्ये बदल झाला आहे. आपला मुलगा अथवा मुलीला आयुष्याचा चांगला जोडीदार मिळण्यासाठी ...

संगमनेर : कोरोनामुळे नियोजित वधू आणि वराच्या अपेक्षांमध्ये बदल झाला आहे. आपला मुलगा अथवा मुलीला आयुष्याचा चांगला जोडीदार मिळण्यासाठी सर्वच पालक प्रयत्न करत असतात. या प्रयत्नांना यश आल्यास ते आनंदी होतात, त्यांना धन्यता वाटते. मात्र, अपयश आल्यास ते दु:खी होतात. आपण जी कृती करतो, त्यात सहजता नसते, अट्टाहास असतो. आनंद नसतो, अपेक्षा असते. त्यामुळे आपला विरस होतो.

संगमनेरातील विवाह सल्लागार संदीप शेळके यांनी सांगितले की, सर्वच पालक त्यांच्या पाल्यांच्या आयुष्याचा चांगला जोडीदार मिळण्यासाठी सतत प्रयत्न करत असतात, सतत धडपड करीत असतात. मुलगा अथवा मुलीला चांगला जोडीदार शोधण्यासाठी प्रयत्न करताना, तो आनंदाने करायला हवा. अनेक पालक प्रत्येकक्षणी बेचैन राहतात. त्यामुळे आपले पाल्य सुद्धा सतत बैचेन राहतात. ‘मुलगा, मुलीला खूप स्थळे येतात. पण सगळे पाहुणे घरी पाहून गेले की, त्यांचा नकार येतो.’ असे काही पालक सांगतात. मात्र, त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर लक्षात आले की, त्यांच्याकडे जेव्हा पाहुणे येतात, तेव्हा ते एक पालक आहोत हे विसरून गेले.

आपण अभियंता, डॉक्टर, मोठे व्यावसायिक यापेक्षाही आपण लग्नासाठीच्या मुला, मुलीचे पालक आहोत. ही भूमिका महत्त्वपूर्ण आहे. फोनवर संभाषण करत असताना समोरील व्यक्तीचा आदर ठेवूनच बोलावे. आपल्याला आपल्या स्थळासाठी इतर पालकांचे फोन येतात, तेव्हा आपण त्यांच्याशी पालक म्हणून बोलले पाहिजे. आपण आपल्या घरी किती मोठे आहात, आपण कोणत्या मोठ्या पदावर आहात, हा अहंभाव बोलताना असू नये. आपण ज्या पदावर असतो, त्याच पदांमध्ये सगळीकडे वावरत असतो. आपण पालक आहोत, हे आपण विसरून जातो.

-----------

नंतरही होऊ शकते चौकशी

कोरोनामुळे सध्या काही मर्यादा आल्या आहेत. लग्नासाठी एखाद्या स्थळाची माहिती घेत असताना, बोलणी करताना बरेच बोलणे हे फाेनवर, व्हिडीओ कॉलवर होते. मुलाला किती पगार आहे, शेती किती आहे, फ्लॅट आहे का, इतर काही प्रॉपर्टी आहे का, असे प्रश्न फोनवरूनच लगेचच विचारले जातात. मुळात या गोष्टी तुम्ही नंतरही चौकशी करून माहिती करून घेऊ शकता.

-------------

बोलताना, आम्ही खूप मोठे आहोत, असा अहंभाव बोलण्यातून दाखवू नये. अनेक पालक आमच्या मुलीच्या लग्नाला आम्ही एवढा खर्च केला, तिचे लग्न अमुक-अमुक कार्यालयात केले होते, पुण्यात बस्ता बांधला होता... अशा अनेक गोष्टींची फोनवरच चर्चा करतात. यातून आम्ही किती मोठे आहोत, हे बोलताना दाखवत असतात. त्यामुळे समोरचा पुन्हा त्या स्थळासाठी फोन करत नाही. मुळात इतरांकडे काय आहे यापेक्षा आपल्या पाल्याला अनुरूप चांगला जोडीदार मिळणे हे महत्त्वाचे आहे. त्याच्याकडे किती प्रॉपर्टी आहे, यावर लग्न यशस्वी होत नाही.

- संदीप शेळके, विवाह सल्लागार, संगमनेर

..................

star 1125