शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारच ‘माळेगाव’चे नवे कारभारी; रंजनकुमार तावरे पराभूत, ९ उमेदवार विजयी घोषित
2
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण
3
ब्रेझाचे इंजिन, नवे नवे नाव...! स्पेसिअस केबिनची नवी मारुती SUV कार येतेय...
4
पाकिस्तान तयार करतंय अमेरिकेपर्यंत मारा करणारं अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्र, अमेरिकेच्या अहवालातून गौप्यस्फोट  
5
ब्रिटिश नेव्हीचे फायटर जेट अजूनही केरळमध्येच! घरवापसीसाठी का लागतोय इतका वेळ?
6
China Rare Earth Magnet: चीननं ठेंगा दाखवल्यानंतर सरकारला आली जाग; आता देशातच होणार रेअर अर्थ मॅग्नेटचं उत्पादन
7
स्लिपमध्ये अनुभवाची कमी! ढिसाळ क्षेत्ररक्षणामुळे टीम इंडियावर आली लाजिरवाणी वेळ
8
Viral News: काहीही न सांगता कर्मचाऱ्याने सोडला जॉब; एचआर झाली नाराज, लिंक्डइनवर केली 'अशी' पोस्ट!
9
इराणच्या मिसाईल हल्ल्यांनी इस्राइलमध्ये हाहाकार; ३० हजारांहून अधिक घरे झाली उद्ध्वस्त!
10
Ax-4 Mission: अवकाश भरारी घेण्यापूर्वी शुभांशू शुक्ला यांनी ऐकलं हृतिक रोशनचं गाणं, नेमकं काय आहे कनेक्शन?
11
एमबीए, नोकरी, मग संन्यास... पण, नशिबाने पुन्हा आणले संसारात; तरुणाने उभं केलं १२५ कोटींचं साम्राज्य!
12
१ जुलैपासून 'या' वाहनांना राजधानीत पेट्रोल, डिझेल, CNG मिळणे बंद; सरकारचा मोठा निर्णय
13
१२ लाख लोकसंख्या, भारतापासून ५ हजार किमी दूर...PM मोदी या छोट्या देशाला इतके महत्त्व का देताहेत?
14
अंतराळाच्या दिशेने रवाना झालेल्या शुभांशू शुक्ला यांनी पाठवला पहिला संदेश, म्हणाले, माझ्या देशवासियांनो...  
15
हेच पहायचे बाकी होते...! लॅपटॉपलाही चार्ज करणारा स्मार्टफोन भारतात लाँच; लेटेस्ट प्रोसेसर अन् किंमतही कमी, प्रश्नच मिटला...
16
राजा रघुवंशी हत्या प्रकरणात 'या' ५ गोष्टी अजूनही गायब! आरोपींपैकी कोणी केले महत्त्वाचे पुरावे नष्ट?
17
गाणी ऐकण्यापासून रोखताच मुलगा बनला राक्षस; जन्मदात्या आईलाच संपवले, त्यानंतर मृतदेह...
18
"सरकार येतील जातील पण...", हिंदी भाषा सक्तीवरुन सयाजी शिंदेंची प्रतिक्रिया चर्चेत
19
अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांची पत्नी आहे डॉक्टर, शाळेत शिकतानाच पडले प्रेमात, अशी आहे लव्हस्टोरी
20
दिग्गज फार्मा कंपनी १ शेअरवर देणार १६५ रुपयांचा बंपर डिविडेंड; कोणता आहे स्टॉक, काय आहे रेकॉर्ड डेट? चेक करा

अखंड वाचन... खडतर परिश्रम!

By admin | Updated: June 13, 2014 01:15 IST

अहमदनगर : आठवी-नववीपासूनच अवांतर आणि पुस्तकांच्या वाचनामध्ये गढून जात होतो. तेव्हापासूनच लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देऊन देशसेवेची संधी घ्यायची, असा निर्धार केला होता.

अहमदनगर : आठवी-नववीपासूनच अवांतर आणि पुस्तकांच्या वाचनामध्ये गढून जात होतो. तेव्हापासूनच लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देऊन देशसेवेची संधी घ्यायची, असा निर्धार केला होता. खडतर परिश्रम आणि जॉब करताना वेळ काढत केलेल्या अभ्यासामुळेच हे यश मिळाले. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत १५३ वा आलेल्या नगरच्या ऋषिकेश हेमंतप्रसाद पत्की याने ‘लोकमत’शी दूरध्वनीवरून बोलताना आपले यशाचे रहस्य उलगडले.ऋषिकेश याने माध्यमिक शिक्षण फिरोदिया हायस्कूलमध्ये पूर्ण केले. पेमराज सारडा महाविद्यालयातून तो बारावी उत्तीर्ण झाला. पुणे येथील पीव्हीजी अभियांत्रिकी कॉलेजमधून त्याने अभियांत्रिकी शाखेची पदवी घेतली. तो सध्या एम.ई. प्रथम वर्षात शिकत आहे. तसेच त्याला इन्फोसीसमध्येही नोकरीची संधी मिळाली होती. मात्र त्याने ती धुडकावली आणि पुण्याच्या ट्रिनीटी कॉलेजमध्ये प्राध्यापकाची नोकरी पत्करली. नोकरी, एम.ई.चा अभ्यास आणि त्याचवेळी युपीएससीचा अभ्यास अशा तीन पातळ््यांवर तो दिवसरात्र परिश्रम करीत होता. त्याचे वडील हेमंतप्रसाद पत्की हे क्रॉम्प्टन कंपनीमधून निवृत्त झाले आहेत, तर आई वैजयंती पत्की या बँक आॅफ इंडियाच्या तेलीखुंट येथील शाखेत कार्यरत आहेत.ऋषिकेश म्हणाला, माझं यश हे शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठावर्धक होतं. निकाल जाहीर झाल्यानंतर खूप छान वाटलं. अर्थात त्यासाठी खडतर परिश्रम करावे लागले. खूप कष्ट आणि संयम फार महत्त्वाचा होता. खूप तयारी केली होती. जॉब करीत करीत अभ्यास केला. जेवढा जास्त वेळ मिळायचा, तेवढा जास्त वेळ अभ्यासासाठी काढला. लहानपणापासूनच अभ्यासाची, वाचनाची आवड होती. आठवीत असल्यापासून वर्तमानपत्र वाचनाची आवड होती. यातूनच समाजाकडे बघण्याची दृष्टी मिळाली. त्याचवेळी देशसेवा करण्याचं स्वप्न उराशी बाळगलं. नेहमीपेक्षा वेगळे करण्याची उर्मी होती. युपीएससी परीक्षा दिल्यामुळे व्यक्तिमत्त्व विकास होतो. त्याचा फायदा स्वत:ला आणि देशाला होतो. गेल्या दोन वर्षांपासून युपीएससीचा अभ्यास सुरू केला होता. शालेय जीवनापासून केलेले भरपूर वाचन मला कामी आले. पुण्यातील मराठी विषयाचे प्रवीण चव्हाण यांचे मार्गदर्शन मिळाले. इंडियन फॉरेन सर्व्हिसमध्ये जायचे आहे. त्यामध्येच मी जास्त खूश राहील. आयोगाच्या परीक्षा दिल्यामुळे व्यक्तिमत्त्वाची जडण-घडण होते. हे घडणं स्वत:च्या आणि देशाच्या विकासासाठी कारणीभूत ठरते, असाच या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना सांगायचं आहे. (प्रतिनिधी)‘लोकमत’शी स्नेहऋषिकेशचा लोकमतशी पूर्वीपासूनच स्नेह आहे. शालेय जीवनापासूनच ‘लोकमत’ वाचायचो. २००६-०७ मध्ये लोकमतधून ऋषिकेशी या नावाने त्याने वात्रटिका लिहिल्या आहेत. त्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना खूप आवडायच्या. लोकमतमध्ये त्याचे नेहमीच येणे-जाणे असायचे.