शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुंबईतील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर
2
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
3
किरकोळ तेजीसह शेअर बाजार उघडला, 'या' स्टॉक्सनं तेजीसह केली कामकाजाला सुरुवात
4
Shocking! विवाहबाह्य संबंधातून आमिर खानला आहे एक मुलगा, भावाचा धक्कादायक खुलासा
5
१००पेक्षा जास्त लोकल रद्द, नाेकरदारांचे मेगा हाल! मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या!
6
FD-RD सर्व विसरा! हा आहे LIC चा जबरदस्त प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल 'The End'
7
रील्स बनवण्याचा नाद, घरमालकाच्या मुलाशी जवळीक, पतीची हत्या करून फरार झालेल्या पत्नीला बॉयफ्रेंडसह अटक 
8
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
9
युद्ध थांबणार...! "खूप आनंद वाटतोय, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना फोन केला..."; झेलेन्स्की यांच्या सोबतच्या बैठकीनंतर, काय म्हणाले ट्रम्प? 
10
वाचवा म्हणत तरुणीची कारमधून उडी, पाठलाग सुरु असतानाच थारची रिक्षाला धडक, ५ जणांचा मृत्यू
11
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
12
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
13
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
14
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
15
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
16
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
17
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
18
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
19
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
20
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले

अखंड वाचन... खडतर परिश्रम!

By admin | Updated: June 13, 2014 01:15 IST

अहमदनगर : आठवी-नववीपासूनच अवांतर आणि पुस्तकांच्या वाचनामध्ये गढून जात होतो. तेव्हापासूनच लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देऊन देशसेवेची संधी घ्यायची, असा निर्धार केला होता.

अहमदनगर : आठवी-नववीपासूनच अवांतर आणि पुस्तकांच्या वाचनामध्ये गढून जात होतो. तेव्हापासूनच लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देऊन देशसेवेची संधी घ्यायची, असा निर्धार केला होता. खडतर परिश्रम आणि जॉब करताना वेळ काढत केलेल्या अभ्यासामुळेच हे यश मिळाले. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत १५३ वा आलेल्या नगरच्या ऋषिकेश हेमंतप्रसाद पत्की याने ‘लोकमत’शी दूरध्वनीवरून बोलताना आपले यशाचे रहस्य उलगडले.ऋषिकेश याने माध्यमिक शिक्षण फिरोदिया हायस्कूलमध्ये पूर्ण केले. पेमराज सारडा महाविद्यालयातून तो बारावी उत्तीर्ण झाला. पुणे येथील पीव्हीजी अभियांत्रिकी कॉलेजमधून त्याने अभियांत्रिकी शाखेची पदवी घेतली. तो सध्या एम.ई. प्रथम वर्षात शिकत आहे. तसेच त्याला इन्फोसीसमध्येही नोकरीची संधी मिळाली होती. मात्र त्याने ती धुडकावली आणि पुण्याच्या ट्रिनीटी कॉलेजमध्ये प्राध्यापकाची नोकरी पत्करली. नोकरी, एम.ई.चा अभ्यास आणि त्याचवेळी युपीएससीचा अभ्यास अशा तीन पातळ््यांवर तो दिवसरात्र परिश्रम करीत होता. त्याचे वडील हेमंतप्रसाद पत्की हे क्रॉम्प्टन कंपनीमधून निवृत्त झाले आहेत, तर आई वैजयंती पत्की या बँक आॅफ इंडियाच्या तेलीखुंट येथील शाखेत कार्यरत आहेत.ऋषिकेश म्हणाला, माझं यश हे शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठावर्धक होतं. निकाल जाहीर झाल्यानंतर खूप छान वाटलं. अर्थात त्यासाठी खडतर परिश्रम करावे लागले. खूप कष्ट आणि संयम फार महत्त्वाचा होता. खूप तयारी केली होती. जॉब करीत करीत अभ्यास केला. जेवढा जास्त वेळ मिळायचा, तेवढा जास्त वेळ अभ्यासासाठी काढला. लहानपणापासूनच अभ्यासाची, वाचनाची आवड होती. आठवीत असल्यापासून वर्तमानपत्र वाचनाची आवड होती. यातूनच समाजाकडे बघण्याची दृष्टी मिळाली. त्याचवेळी देशसेवा करण्याचं स्वप्न उराशी बाळगलं. नेहमीपेक्षा वेगळे करण्याची उर्मी होती. युपीएससी परीक्षा दिल्यामुळे व्यक्तिमत्त्व विकास होतो. त्याचा फायदा स्वत:ला आणि देशाला होतो. गेल्या दोन वर्षांपासून युपीएससीचा अभ्यास सुरू केला होता. शालेय जीवनापासून केलेले भरपूर वाचन मला कामी आले. पुण्यातील मराठी विषयाचे प्रवीण चव्हाण यांचे मार्गदर्शन मिळाले. इंडियन फॉरेन सर्व्हिसमध्ये जायचे आहे. त्यामध्येच मी जास्त खूश राहील. आयोगाच्या परीक्षा दिल्यामुळे व्यक्तिमत्त्वाची जडण-घडण होते. हे घडणं स्वत:च्या आणि देशाच्या विकासासाठी कारणीभूत ठरते, असाच या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना सांगायचं आहे. (प्रतिनिधी)‘लोकमत’शी स्नेहऋषिकेशचा लोकमतशी पूर्वीपासूनच स्नेह आहे. शालेय जीवनापासूनच ‘लोकमत’ वाचायचो. २००६-०७ मध्ये लोकमतधून ऋषिकेशी या नावाने त्याने वात्रटिका लिहिल्या आहेत. त्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना खूप आवडायच्या. लोकमतमध्ये त्याचे नेहमीच येणे-जाणे असायचे.