शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
2
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
3
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
4
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
5
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
6
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
7
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
8
केस कलर करण्याची हौस बेतली जीवावर; तरुणीसोबत घडलं भयंकर, अवस्था पाहून बसेल धक्का
9
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
10
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
11
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
12
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा
13
अमेरिकन लढाऊ विमानाला हवेतच आग लागली, अलास्कामध्ये F-35 विमान कोसळले
14
प्रेमासाठी काय पण...! क्वांटम डेटिंग म्हणजे काय, नव्या पिढीमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
15
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
16
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
17
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
18
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा गंभीर आरोप
19
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
20
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!

शाखा अभियंत्यांचे बांधकाम पक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : महापालिकेत शाखा अभियंत्यांची वानवा आहे. बोटावर मोजण्याइतकेच शाखा अभियंते कार्यरत आहेत. त्यामुळे तेच ते ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर : महापालिकेत शाखा अभियंत्यांची वानवा आहे. बोटावर मोजण्याइतकेच शाखा अभियंते कार्यरत आहेत. त्यामुळे तेच ते अभियंते वर्षानुवर्षे एकाच विभागात काम करत आहेत. बांधकाम विभागात केवळ दोन अभियंते असल्याने त्यांचा मनमानी कारभार सुरू आहे. त्यांच्यावर अनेक आरोप झाले; मात्र हे दोन्ही अभियंते आपल्या जागेवर टिकून आहेत.

महापालिकेच्या बांधकाम विभागात शाखा अभियंत्यांची दहा पदे मंजूर आहेत. वाढीव भागात पायाभूत सुविधा पुरविण्याची महापालिकेची जबाबदारी आहे. परंतु, पुरेशा प्रमाणात अभियंते नाहीत. बांधकाम विभागाची धुरा केवळ दोन अभियंत्यांवर आहे. शहरात १७ प्रभाग आहेत. मध्यवर्ती शहराची जबाबदारी शाखा अभियंता श्रीकांत निंबाळकर यांच्याकडे, तर सावेडीसह बोल्हेगाव, नागापूर आदी उपनगरांसाठी शाखा अभियंता एम.एस. पारखे यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. या भागातील रस्ते, गटारींच्या कामांचे अंदाजपत्रक तयार, निविदा प्रक्रिया राबविणे, कार्यारंभ आदेश दिलेली कामे सुरू करणे, कामांची पाहणी करणे, कामाचा दर्जा राखणे, ही सर्व कामे या दोन शाखा अभियंत्यांनाच करावी लागतात. त्यांचा सर्वाधिक वेळ कामांची पाहणी करण्यात जातो. त्यात नगरसेवकांचे फोन, यामुळे त्यांना वेळच मिळत नाही. एकाच विभागात गेल्या अनेक वर्षांपासून हे दोन्ही अभियंते काम करत आहेत. त्यामुळे त्यांचे हितसंबंध तयार झाले आहेत. नगरसेवकांशीही त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत. नगरसेवकांशी असलेली मैत्री जपत काम करत आहेत. कामावर हजर झाल्यापासून ते बांधकाम विभागातच कार्यरत आहेत. शहर अभियंते बदलेले; परंतु, शाखा अभियंता तेच आहेत. त्यामुळे नवीन कल्पना शहराला मिळत नाहीत. रस्ते व गटारींची तीच ती कामे दरवर्षी होत असून, त्यावर लाखो रुपये खर्च होत आहेत. शहरातील कामांच्या दर्जाबाबत नगरसेवकांकडून तक्रारी केल्या जातात. परंतु, अभियंते नसल्याने कारवाई केल्यास काम करणार कोण, असा प्रश्न प्रशासनाकडून उपस्थित केला जातो.

.....

स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्याची बदली गाजली

स्वच्छता विभागातील एका कर्मचाऱ्यांच्या बदलीचा आदेश नुकताच काढण्यात आला. या बदलीवरून राजकीय नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली. काहीजण बदलीवर ठाम आहेत, तर काहींनी बदली रद्द करण्यासाठी प्रशासनावर दबाव आणण्यास सुरुवात केली आहे. एका कर्मचाऱ्याची जरी बदली केली तरी काय होते, याचा अनुभव सध्या प्रशासन घेत आहे.