शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
2
बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी
3
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
4
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
5
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
6
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
7
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
8
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
9
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
10
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
11
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
12
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
13
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
14
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
15
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग
16
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
17
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?
18
Nagpur: संधी मिळताच प्रवाशांना लुटायचे, रेल्वे स्थानकांवर चोऱ्या करणारी टोळी अटकेत
19
Ganeshotsav 2025: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मूर्तिकारांसाठी बीएमसीची महत्त्वाची पोस्ट
20
"बॉलिवूडमध्ये मंदी आली आहे, छोट्या कलाकारांकडे तर...", कल्कि कोचलीनचा खुलासा

शाखा अभियंत्यांचे बांधकाम पक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : महापालिकेत शाखा अभियंत्यांची वानवा आहे. बोटावर मोजण्याइतकेच शाखा अभियंते कार्यरत आहेत. त्यामुळे तेच ते ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर : महापालिकेत शाखा अभियंत्यांची वानवा आहे. बोटावर मोजण्याइतकेच शाखा अभियंते कार्यरत आहेत. त्यामुळे तेच ते अभियंते वर्षानुवर्षे एकाच विभागात काम करत आहेत. बांधकाम विभागात केवळ दोन अभियंते असल्याने त्यांचा मनमानी कारभार सुरू आहे. त्यांच्यावर अनेक आरोप झाले; मात्र हे दोन्ही अभियंते आपल्या जागेवर टिकून आहेत.

महापालिकेच्या बांधकाम विभागात शाखा अभियंत्यांची दहा पदे मंजूर आहेत. वाढीव भागात पायाभूत सुविधा पुरविण्याची महापालिकेची जबाबदारी आहे. परंतु, पुरेशा प्रमाणात अभियंते नाहीत. बांधकाम विभागाची धुरा केवळ दोन अभियंत्यांवर आहे. शहरात १७ प्रभाग आहेत. मध्यवर्ती शहराची जबाबदारी शाखा अभियंता श्रीकांत निंबाळकर यांच्याकडे, तर सावेडीसह बोल्हेगाव, नागापूर आदी उपनगरांसाठी शाखा अभियंता एम.एस. पारखे यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. या भागातील रस्ते, गटारींच्या कामांचे अंदाजपत्रक तयार, निविदा प्रक्रिया राबविणे, कार्यारंभ आदेश दिलेली कामे सुरू करणे, कामांची पाहणी करणे, कामाचा दर्जा राखणे, ही सर्व कामे या दोन शाखा अभियंत्यांनाच करावी लागतात. त्यांचा सर्वाधिक वेळ कामांची पाहणी करण्यात जातो. त्यात नगरसेवकांचे फोन, यामुळे त्यांना वेळच मिळत नाही. एकाच विभागात गेल्या अनेक वर्षांपासून हे दोन्ही अभियंते काम करत आहेत. त्यामुळे त्यांचे हितसंबंध तयार झाले आहेत. नगरसेवकांशीही त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत. नगरसेवकांशी असलेली मैत्री जपत काम करत आहेत. कामावर हजर झाल्यापासून ते बांधकाम विभागातच कार्यरत आहेत. शहर अभियंते बदलेले; परंतु, शाखा अभियंता तेच आहेत. त्यामुळे नवीन कल्पना शहराला मिळत नाहीत. रस्ते व गटारींची तीच ती कामे दरवर्षी होत असून, त्यावर लाखो रुपये खर्च होत आहेत. शहरातील कामांच्या दर्जाबाबत नगरसेवकांकडून तक्रारी केल्या जातात. परंतु, अभियंते नसल्याने कारवाई केल्यास काम करणार कोण, असा प्रश्न प्रशासनाकडून उपस्थित केला जातो.

.....

स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्याची बदली गाजली

स्वच्छता विभागातील एका कर्मचाऱ्यांच्या बदलीचा आदेश नुकताच काढण्यात आला. या बदलीवरून राजकीय नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली. काहीजण बदलीवर ठाम आहेत, तर काहींनी बदली रद्द करण्यासाठी प्रशासनावर दबाव आणण्यास सुरुवात केली आहे. एका कर्मचाऱ्याची जरी बदली केली तरी काय होते, याचा अनुभव सध्या प्रशासन घेत आहे.