आमदार डॉ. सुधीर तांबे, ज्येष्ठ नेते मधुकर नवले, तालुकाध्यक्ष दादा पाटील वाकचौरे, महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा शोभा निर्गुडे, विक्रम नवले, अमोल नाईकवाडी, वनिता शेटे यांच्या नेतृत्वाखालील रॅली काढण्यात आली होती.
आमदार डॉ. सुधीर तांबे म्हणाले, नोटाबंदीच्या वेळीच देशाच्या अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले होते. आता इंधन दरवाढीने सामान्य जनता मेटाकुटीस आली असून हुकुमशहा मोदी सरकारने दरवाढीला आळा घालावा. नवे तीन शेतकरीविरोधी काळे कायदे अंमलात आणू नयेत. राफेलचे पाप उघड होताच मोदी सरकारचा भ्रष्टाचारी चेहरा जनतेसमोर येईल. मोदी सरकार पदोपदी शेतकरी व सामान्य जनतेला अवमानित करत आहे. धर्म-जात, बुध्दिभेद करून सत्तेत आलेल्या सरकारचा राफेल घोटाळा लवकरच बाहेर येईल. भाजप सरकारचा भ्रष्टाचारी चेहरा जनतेसमोर आणण्यासाठी युवकांना गावोगावी, घराघरात जाऊन जनजागृती करावी. भांडवलदारधार्जिणे भाजप सरकार असून ते शेतकरीविरोधी तीन कायदे आणून शेतकरी उद्ध्वस्त करू पाहात आहे. शेतमालकास शेतमजूर करून येथील शेती अदानी-अंबानीच्या घशात घालायचा भाजप सरकारचा डाव असून हे काळे कायदे रद्द न केल्यास भाजपला सामान्य शेतकरी कधीच माफ करणार नाही.
केंद्र सरकारने इंधन दरवाढीला आळा घातला नाही तर झेंडा बाजूला करून दांडे हातात घेऊन अधिक तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा ज्येष्ठ नेते मधुकर नवले यांनी दिला.
उत्कर्षा रूपवते यांनी मोदी सरकारला महिला काँग्रेसच्या वतीने गोवऱ्या भेट पाठवल्या असल्याचे सांगितले. ज्येष्ठ नेते सोन्याबापू वाकचौरे, मीनानाथ पांडे, वकील भाऊसाहेब नवले, शिवाजी नेहे, बाळासाहेब नाईकवाडी, आरिफ तांबोळी, रमेश जगताप, उमेद शेख, अनिल वैद्य, मंदाबाई नवले, संगीता सापीके, जया झोळेकर, राधिका नवले, स्वाती नवले, सुजीत नवले, साईनाथ नवले, संपत कानवडे, दामोधर सहाणे, शंकरराव वाळुंज, पाटीलबुवा सावंत, ज्ञानेश्वर झडे, चंद्रमोहन निर्गुडे, भास्कर दराडे, शिवाजी आरोटे, भास्कर मंडलिक, रामदास धुमाळ आदी उपस्थित होते.
फोटो - १४ अकोले बैलगाडी रॅली, १४ अकोले गोवऱ्या