शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
2
न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
3
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
4
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
5
‘मला उमेदवारी द्या, अन्यथा माझ्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास पक्ष जबाबदार राहील’, भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची धमकी
6
चांदीची 'पांढरी' लाट! सोन्याला मागे टाकत गाठला २ लाखांचा ऐतिहासिक टप्पा; काय आहेत भाववाढीची कारणे?
7
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक का वापरलं 'भारत मॉडेल'?; मिड टर्म निवडणुकीपूर्वी अमेरिकेत मोफत खैरात
8
'पुढे दरोडा पडलाय, दागिने काढून ठेवा'; पोलिसांच्या वेशातील टोळीचा पर्दाफाश, लोकांना घाबरवून लुटायचे
9
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
10
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे २९ महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
11
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
12
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
13
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
14
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
15
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
16
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
17
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
18
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
19
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
20
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र?

By admin | Updated: January 12, 2015 13:44 IST

जिल्हा परिषदेच्या तीन गटासाठी येत्या २८ तारखेला मतदान होणार आहे. या निवडणुकीचा जिल्हा परिषदेच्या सत्तेवर कोणताच परिणाम होणार नसला तरी राजकीय पक्षासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची राहणार आहे.

अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या तीन गटासाठी येत्या २८ तारखेला मतदान होणार आहे. या निवडणुकीचा जिल्हा परिषदेच्या सत्तेवर कोणताच परिणाम होणार नसला तरी राजकीय पक्षासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची राहणार आहे. विशेष करून यात राष्ट्रवादीचे दोन तर काँग्रेसचा एक सदस्य होता. निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सोमवारी राष्ट्रवादीने बैठक बोलवली आहे. जिल्हा परिषदेचे तीन सदस्य विधानसभा निवडणुकीत आमदार म्हणून विजयी झाले होते. त्यांच्या रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवडणूक होणार आहे. यात मिरी (पाथर्डी) राजूर (अकोले) तर कोळगाव (श्रीगोंदा) या जागांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेत काँग्रेस-राष्ट्रवादी सत्तेत आहेत. अध्यक्षपदासह दोन विषय समित्या राष्ट्रवादीच्या ताब्यात तर उपाध्यक्षपदासह दोन विषय समित्या काँग्रेसच्या ताब्यात आहे. तीन गटाच्या निवडणुकीसाठी पक्षीय पातळीवर बैठका सुरू झाल्या आहेत. ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीची बैठक होणार आहे. यात स्थानिक आमदार आणि इच्छुकांना बोलविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष पांडुरंग अभंग यांनी दिली. काँग्रेसच्या गोटातून राष्ट्रवादी सोबत चर्चा केल्यानंतर एकत्रित निवडणूक लढविण्याचा विचार सुरू आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत चर्चा झाली असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, मिरी जिल्हा परिषद गटातून शिवसेनेचे पारंपरिक उमेदवार मोहन पालवे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असल्याचे जिल्हाध्यक्ष शशिकांत गाडे यांनी स्पष्ट केले. पालवे चारवेळा या गटातून विजयी झालेले आहेत. मात्र, अडीच वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तत्कालीन उमेदवार मोनिका राजळे यांनी पालवे यांच्या पत्नीचा पराभव केला होता. आता राजळे भाजपाच्या तिकिटावर आमदार झाल्याने पुन्हा पालवे यांना संधी मिळालेली आहे. या तीन जागांवर भाजपा उमेदवारांची चाचपणी करण्याचे आदेश त्या त्या तालुकाध्यक्षांना देण्यात आलेले आहेत. असे असले तरी उमेदवारीचा अंतिम निर्णय गृहराज्य मंत्री तथा पालकमंत्री राम शिंदेच घेणार असल्याची माहिती सरचिटणीस भानुदास बेरड यांनी दिली आहे. येत्या आठवड्यात या निवडणुकीत सर्व पक्षाचे उमेदवार जाहीर होणार आहेत.