शहरं
Join us  
Trending Stories
1
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
5
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
6
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
7
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
10
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
11
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
13
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
14
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
15
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
16
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
17
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
18
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
19
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
20
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच

काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र?

By admin | Updated: January 12, 2015 13:44 IST

जिल्हा परिषदेच्या तीन गटासाठी येत्या २८ तारखेला मतदान होणार आहे. या निवडणुकीचा जिल्हा परिषदेच्या सत्तेवर कोणताच परिणाम होणार नसला तरी राजकीय पक्षासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची राहणार आहे.

अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या तीन गटासाठी येत्या २८ तारखेला मतदान होणार आहे. या निवडणुकीचा जिल्हा परिषदेच्या सत्तेवर कोणताच परिणाम होणार नसला तरी राजकीय पक्षासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची राहणार आहे. विशेष करून यात राष्ट्रवादीचे दोन तर काँग्रेसचा एक सदस्य होता. निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सोमवारी राष्ट्रवादीने बैठक बोलवली आहे. जिल्हा परिषदेचे तीन सदस्य विधानसभा निवडणुकीत आमदार म्हणून विजयी झाले होते. त्यांच्या रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवडणूक होणार आहे. यात मिरी (पाथर्डी) राजूर (अकोले) तर कोळगाव (श्रीगोंदा) या जागांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेत काँग्रेस-राष्ट्रवादी सत्तेत आहेत. अध्यक्षपदासह दोन विषय समित्या राष्ट्रवादीच्या ताब्यात तर उपाध्यक्षपदासह दोन विषय समित्या काँग्रेसच्या ताब्यात आहे. तीन गटाच्या निवडणुकीसाठी पक्षीय पातळीवर बैठका सुरू झाल्या आहेत. ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीची बैठक होणार आहे. यात स्थानिक आमदार आणि इच्छुकांना बोलविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष पांडुरंग अभंग यांनी दिली. काँग्रेसच्या गोटातून राष्ट्रवादी सोबत चर्चा केल्यानंतर एकत्रित निवडणूक लढविण्याचा विचार सुरू आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत चर्चा झाली असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, मिरी जिल्हा परिषद गटातून शिवसेनेचे पारंपरिक उमेदवार मोहन पालवे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असल्याचे जिल्हाध्यक्ष शशिकांत गाडे यांनी स्पष्ट केले. पालवे चारवेळा या गटातून विजयी झालेले आहेत. मात्र, अडीच वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तत्कालीन उमेदवार मोनिका राजळे यांनी पालवे यांच्या पत्नीचा पराभव केला होता. आता राजळे भाजपाच्या तिकिटावर आमदार झाल्याने पुन्हा पालवे यांना संधी मिळालेली आहे. या तीन जागांवर भाजपा उमेदवारांची चाचपणी करण्याचे आदेश त्या त्या तालुकाध्यक्षांना देण्यात आलेले आहेत. असे असले तरी उमेदवारीचा अंतिम निर्णय गृहराज्य मंत्री तथा पालकमंत्री राम शिंदेच घेणार असल्याची माहिती सरचिटणीस भानुदास बेरड यांनी दिली आहे. येत्या आठवड्यात या निवडणुकीत सर्व पक्षाचे उमेदवार जाहीर होणार आहेत.