शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार
2
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
3
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
4
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
5
"विमान टेकऑफ होण्यापूर्वी तरुण म्हणाला माझ्या खिशात बॉम्ब"; प्रवाशांना फुटला घाम, प्रचंड गोंधळ
6
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
7
'हा' माणूस फक्त कुत्र्यांना फिरवून महिन्याला कमावतोय ४.५ लाख रुपये, बिझनेस आयडिया व्हायरल!
8
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
9
वाद झाला अन् मध्यरात्री... दापोलीत लहान भावाची धारदार शस्त्राने हत्या; उन्हवरे गाव हादरलं
10
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
11
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
12
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
13
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
14
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 
15
ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क
16
धक्कादायक: शिक्षकांना नियमित केले, परंतु आदेश तात्पुरते राहिले, तासिका व रोजंदारीवरच दिल्या नियुक्त्या
17
वनविभागात ‘आयएफएस’ पदांचा खेळ; आता ८ पीसीसीएफ, वनसंरक्षक पदाला कात्री आणि बदल्यांमध्ये सोय
18
"राणे कुटुंबाने खून केलेले लोक हिंदूंच होते, नितेश राणेंनी वडिलांना..."; मनसे नेत्यांचे खळबळजनक आरोप
19
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
20
'डॉन ३' मधून विक्रांत मेस्सी बाहेर, 'बिग बॉस' विजेता अभिनेता बनणार व्हिलेन? नवी अपडेट समोर

काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र?

By admin | Updated: January 12, 2015 13:44 IST

जिल्हा परिषदेच्या तीन गटासाठी येत्या २८ तारखेला मतदान होणार आहे. या निवडणुकीचा जिल्हा परिषदेच्या सत्तेवर कोणताच परिणाम होणार नसला तरी राजकीय पक्षासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची राहणार आहे.

अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या तीन गटासाठी येत्या २८ तारखेला मतदान होणार आहे. या निवडणुकीचा जिल्हा परिषदेच्या सत्तेवर कोणताच परिणाम होणार नसला तरी राजकीय पक्षासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची राहणार आहे. विशेष करून यात राष्ट्रवादीचे दोन तर काँग्रेसचा एक सदस्य होता. निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सोमवारी राष्ट्रवादीने बैठक बोलवली आहे. जिल्हा परिषदेचे तीन सदस्य विधानसभा निवडणुकीत आमदार म्हणून विजयी झाले होते. त्यांच्या रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवडणूक होणार आहे. यात मिरी (पाथर्डी) राजूर (अकोले) तर कोळगाव (श्रीगोंदा) या जागांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेत काँग्रेस-राष्ट्रवादी सत्तेत आहेत. अध्यक्षपदासह दोन विषय समित्या राष्ट्रवादीच्या ताब्यात तर उपाध्यक्षपदासह दोन विषय समित्या काँग्रेसच्या ताब्यात आहे. तीन गटाच्या निवडणुकीसाठी पक्षीय पातळीवर बैठका सुरू झाल्या आहेत. ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीची बैठक होणार आहे. यात स्थानिक आमदार आणि इच्छुकांना बोलविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष पांडुरंग अभंग यांनी दिली. काँग्रेसच्या गोटातून राष्ट्रवादी सोबत चर्चा केल्यानंतर एकत्रित निवडणूक लढविण्याचा विचार सुरू आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत चर्चा झाली असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, मिरी जिल्हा परिषद गटातून शिवसेनेचे पारंपरिक उमेदवार मोहन पालवे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असल्याचे जिल्हाध्यक्ष शशिकांत गाडे यांनी स्पष्ट केले. पालवे चारवेळा या गटातून विजयी झालेले आहेत. मात्र, अडीच वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तत्कालीन उमेदवार मोनिका राजळे यांनी पालवे यांच्या पत्नीचा पराभव केला होता. आता राजळे भाजपाच्या तिकिटावर आमदार झाल्याने पुन्हा पालवे यांना संधी मिळालेली आहे. या तीन जागांवर भाजपा उमेदवारांची चाचपणी करण्याचे आदेश त्या त्या तालुकाध्यक्षांना देण्यात आलेले आहेत. असे असले तरी उमेदवारीचा अंतिम निर्णय गृहराज्य मंत्री तथा पालकमंत्री राम शिंदेच घेणार असल्याची माहिती सरचिटणीस भानुदास बेरड यांनी दिली आहे. येत्या आठवड्यात या निवडणुकीत सर्व पक्षाचे उमेदवार जाहीर होणार आहेत.