शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

काँग्रेसमुळेच शेतकऱ्यांना सव्वा कोटी विमा

By admin | Updated: June 15, 2016 23:44 IST

लोणी : नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कॉँग्रेस आघाडी सरकारनेच हवामानावर आधारित पीक विमा योजना सुरू केली.

लोणी : नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कॉँग्रेस आघाडी सरकारनेच हवामानावर आधारित पीक विमा योजना सुरू केली. या योजनेची व्याप्ती आपण कृषिमंत्री असताना वाढविल्यामुळेच दोन वर्षांत सव्वा कोटी शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाल्याचे समाधान आहे, असे प्रतिपादन विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी केले.प्रवरानगर येथील डॉ. धनंजयराव गाडगीळ सभागृहात राधाकृष्ण विखे यांच्या ५७ व्या वाढदिवसानिमित्त जलक्रांती अभियानाचा लोकार्पण सोहळा आणि कार्यकर्त्यांना ५ रोपे देवून वनक्रांती अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.विविध योजनांच्या लाभार्थींना प्रमाणपत्र, कृषी औजारे आणि इतर साहित्यांचे वाटप केले. शिर्डी मतदारसंघातील मोफत अपघात विमा योजनेतील लाभार्थींना धनादेशाचे वितरण यावेळी केले. दुष्काळी पार्श्वभूमीवर वाढदिवसाचा सत्कार विखे यांनी स्वीकारला नाही. यावेळी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, माजी जि. प. अध्यक्षा शालिनी विखे, अण्णासाहेब शेलार, डॉ. विखे कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे, उपाध्यक्ष पोपटराव लाटे, जि.प.सदस्य डॉ.भास्करराव खर्डे, जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा कांचन मांढरे, प्रवरा बँकेचे अध्यक्ष बाळासाहेब भवर, शिर्डीचे माजी नगराध्यक्ष कैलास कोते, बाजार समितीचे सभापती बापूसाहेब आहेर, बाबासाहेब डांगे उपस्थित होते.राधाकृष्ण विखे म्हणाले, काँग्रेस आघाडी सरकारने पीक विमा योजना सुरू केली. या विमा योजनेचा सन २०१४ साली ४० लाख व २०१५ साली ८० लाख शेतकऱ्यांना ४५०० कोटी रुपयांचा लाभ मिळाला. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांची दिंडी कार्यक्रमस्थळी आली होती़ शेतकऱ्यांनो घाबरु नका, हिमतीने जीवनाला सामोरे जा, असा संदेश या मुलांनी दिला़ (वार्ताहर)डॉ. सुजय विखे यांनी जलक्रांती अभियानाचे महत्व विषद केले. लोकांच्या सहभागाने यशस्वी झालेले अभियान आता वनक्रांतीच्या माध्यमातून पुढे नेण्याचा आपला विचार आहे. पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे यांच्या वाढदिवसानिमित्त या अभियानाचा संकल्प आपण केला होता. आज या अभियानाचा लोकार्पण सोहळा होत असल्याचे मोठे समाधान असल्याचे त्यांनी नमूद केले. या अभियानात सहभागी झालेल्या २० ही गावांतील कार्यकर्त्यांचा प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला.राज्यात विरोधी पक्षनेता म्हणून काम करताना सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करावेच लागते. २९ जिल्ह्यांमधील विविध प्रश्न आणि समस्या आपण जाणून घेतल्यानंतर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना शासनाने दत्तक घ्यावे, ही आपली मागणी राज्य सरकारने मान्य केली आहे, अशी माहिती विखे यांनी या कार्यक्रमात दिली़