शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसमुळेच शेतकऱ्यांना सव्वा कोटी विमा

By admin | Updated: June 15, 2016 23:44 IST

लोणी : नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कॉँग्रेस आघाडी सरकारनेच हवामानावर आधारित पीक विमा योजना सुरू केली.

लोणी : नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कॉँग्रेस आघाडी सरकारनेच हवामानावर आधारित पीक विमा योजना सुरू केली. या योजनेची व्याप्ती आपण कृषिमंत्री असताना वाढविल्यामुळेच दोन वर्षांत सव्वा कोटी शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाल्याचे समाधान आहे, असे प्रतिपादन विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी केले.प्रवरानगर येथील डॉ. धनंजयराव गाडगीळ सभागृहात राधाकृष्ण विखे यांच्या ५७ व्या वाढदिवसानिमित्त जलक्रांती अभियानाचा लोकार्पण सोहळा आणि कार्यकर्त्यांना ५ रोपे देवून वनक्रांती अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.विविध योजनांच्या लाभार्थींना प्रमाणपत्र, कृषी औजारे आणि इतर साहित्यांचे वाटप केले. शिर्डी मतदारसंघातील मोफत अपघात विमा योजनेतील लाभार्थींना धनादेशाचे वितरण यावेळी केले. दुष्काळी पार्श्वभूमीवर वाढदिवसाचा सत्कार विखे यांनी स्वीकारला नाही. यावेळी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, माजी जि. प. अध्यक्षा शालिनी विखे, अण्णासाहेब शेलार, डॉ. विखे कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे, उपाध्यक्ष पोपटराव लाटे, जि.प.सदस्य डॉ.भास्करराव खर्डे, जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा कांचन मांढरे, प्रवरा बँकेचे अध्यक्ष बाळासाहेब भवर, शिर्डीचे माजी नगराध्यक्ष कैलास कोते, बाजार समितीचे सभापती बापूसाहेब आहेर, बाबासाहेब डांगे उपस्थित होते.राधाकृष्ण विखे म्हणाले, काँग्रेस आघाडी सरकारने पीक विमा योजना सुरू केली. या विमा योजनेचा सन २०१४ साली ४० लाख व २०१५ साली ८० लाख शेतकऱ्यांना ४५०० कोटी रुपयांचा लाभ मिळाला. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांची दिंडी कार्यक्रमस्थळी आली होती़ शेतकऱ्यांनो घाबरु नका, हिमतीने जीवनाला सामोरे जा, असा संदेश या मुलांनी दिला़ (वार्ताहर)डॉ. सुजय विखे यांनी जलक्रांती अभियानाचे महत्व विषद केले. लोकांच्या सहभागाने यशस्वी झालेले अभियान आता वनक्रांतीच्या माध्यमातून पुढे नेण्याचा आपला विचार आहे. पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे यांच्या वाढदिवसानिमित्त या अभियानाचा संकल्प आपण केला होता. आज या अभियानाचा लोकार्पण सोहळा होत असल्याचे मोठे समाधान असल्याचे त्यांनी नमूद केले. या अभियानात सहभागी झालेल्या २० ही गावांतील कार्यकर्त्यांचा प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला.राज्यात विरोधी पक्षनेता म्हणून काम करताना सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करावेच लागते. २९ जिल्ह्यांमधील विविध प्रश्न आणि समस्या आपण जाणून घेतल्यानंतर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना शासनाने दत्तक घ्यावे, ही आपली मागणी राज्य सरकारने मान्य केली आहे, अशी माहिती विखे यांनी या कार्यक्रमात दिली़