शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

काँग्रेस व शिवसेनेची राजकीय मैैत्री जुनीच-बाळासाहेब थोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 12:49 IST

दिवंगत इंदिरा गांधी यांना आणिबाणीच्या काळात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी समर्थनार्थ भूमिका घेतली. काँग्रेसच्या ए.आर.अंतुले यांना मुख्यमंत्री करण्यातही ठाकरे यांनी सहकार्य केले. त्यामुळे काँग्रेस व शिवसेनेच्या मैत्रीचे नाते जुनेच असल्याचे प्रतिपादन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

श्रीरामपूर : दिवंगत इंदिरा गांधी यांना आणिबाणीच्या काळात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी समर्थनार्थ भूमिका घेतली. काँग्रेसच्या ए.आर.अंतुले यांना मुख्यमंत्री करण्यातही ठाकरे यांनी सहकार्य केले. त्यामुळे काँग्रेस व शिवसेनेच्या मैत्रीचे नाते जुनेच असल्याचे प्रतिपादन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. त्यामुळेच महाविकास आघाडीचे सरकार स्थापण्यासाठी शिवसेनेने पुढाकार घेतला. आम्ही दिल्ली काँग्रेसकडून सहमती घेण्यासाठी मन वळविले, असा खुलासा त्यांनी केला.श्रीरामपूरयेथील आझाद मैदानावर दिवंगत नेते जयंत ससाणे यांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त शनिवारी (दि.७ मार्च) आयोजित कार्यक्रमात मंत्री थोरात बोलत होते. खासदार सदाशिव लोखंडे, आमदार सुधीर तांबे, आमदार लहू कानडे, उपनगराध्यक्ष करण ससाणे, सचिन गुजर, अनिल कांबळे, ज्ञानेश्वर मुरकुटे, राजश्री ससाण उपस्थित होते. थोरात पुढे म्हणाले, भाजपचे राजकारण देशाला चुकीच्या वळणावर नेणारे आहे.  लोकशाहीला ते धोक्याचे होते. त्यामुळे शिवसेनेने पुढाकार घेत महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आणण्यासाठी पुढाकार घेतला. राज्यातील काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना दिल्लीतील हायकमांडशी चर्चा करण्याची मागणी केली. त्याला यश आले व  राज्यात नवे सरकार अस्तित्वात आले. महाविकास आघाडी सरकारने शंभर दिवसांंचा यशस्वी कार्यकाळ पूर्ण केला आहे. मागील सरकारने ३५ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी करण्याची घोषणा केली. मात्र केवळ भाषणाने शेतकºयांचे पोट भरले. बायकामुलांना रात्री अर्ज भरण्यासाठी रांगेत उभे केले. शेतकºयांना त्यांनी पिंजून पिंजून काढले. शेतकºयांना सतावण्याची त्यांची भूमिका होती. आमच्या सरकारने मात्र शेतकºयांना सन्मानाने कर्जमाफी दिली. थोरात आणि मी एकाच सरकारमध्ये..खासदार सदाशिव लोखंडे यांनी ससाणे व त्यांच्या मैत्रीचे अनेक किस्से सांगितले. ससाणे यांच्या मदतीमुळे जिल्हा सहकारी बँकेत काम करण्याची संधी मिळाली. लोकसभा निवडणुकीत महसूलमंत्री थोरात यांनी माझ्या विरोधात भाऊसाहेब कांबळे यांना मदत केली. आता मात्र थोरात व मी एका सरकारमध्ये आलो आहे. कांबळे हे मात्र दुस-या पक्षात गेले असे सांगताच उपस्थितांमध्ये हशा पिकला....

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrirampurश्रीरामपूरBalasaheb Thoratबाळासाहेब थोरातPoliticsराजकारण