शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

नाचगाण्यांची थेरपी अन् लसीकरणाचा गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : राज्यातील काही जिल्ह्यांनी वेगवेगळे उपाय करून कोरोना आटोक्यात आणला. या जिल्ह्यांची चर्चा कमी, पण, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर : राज्यातील काही जिल्ह्यांनी वेगवेगळे उपाय करून कोरोना आटोक्यात आणला. या जिल्ह्यांची चर्चा कमी, पण, अहमदनगर जिल्ह्याचीच चर्चा अधिक झाली. त्यामागे कारणही तसेच आहे. कोविड केअर सेंटरमधील नाचगाणे आणि लसीकरणाचा गोंधळ, यामुळे जिल्ह्याची प्रतिमा राज्यात मलीन झाली असून, आता तरी गोंधळ थांबवा, असे म्हणण्याची वेळ सर्वसामान्यांवर आली आहे.

शेजारच्या औरंगाबाद, नाशिक आणि पुणे जिल्ह्यातील रुग्णसंख्या घटली आहे. नगर जिल्ह्यात मात्र ‘ब्रेक द चेन’चा परिणाम दिसेनासा झाला आहे. दररोज एक हजारांहून अधिक नव्या रुग्णांची भर पडत आहे. संकटाचा सामना करण्यासाठी लोकप्रतिनिधींमध्ये एकजुटीचा अभाव असल्याचे प्रकर्षाने जाणवते आहे. जिल्हा भीतीच्या सावटाखाली असताना नाचगाण्याच्या मैफली मात्र रंगात आल्या आहेत. अर्थात या मैफली रुग्णांची भीती घालविण्यासाठी आयोजित केल्या गेल्या आहेत. परंतु, त्यावरून जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. जामखेडच्या कोविड केअर सेंटरमध्ये राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी झिंगाट गाण्यावर ठेका धरला. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. आमदार पवार यांची कोविड सेंटरमधील नाचगाण्याची थेरपी खासदार डॉ. सुजय विखे यांना चांगलीच भावली. तसे त्यांनी एका पत्रकार परिषदेत बोलूनही दाखविले. त्यांचे समर्थक जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी तर कोविड केअर सेंटरमध्ये विश्वशांती महायज्ञ घातला. त्यांचा हा महायज्ञ अंनिसच्या तक्रारीमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला. अंनिसच्या तक्रारीचा खुलासा करताना त्यांनी आमदार नीलेश लंके यांच्या कोविड केअर सेंटरमधील नाचगाण्याकडे लक्ष वेधले. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात नाचगाण्यांचे फड रंगात आले असतानाच शहरात लसीकरणाचा गोंधळ उडाला. शहरात ढीगभर केंद्र आणि चिमूटभर लस, अशी अवस्था आहे. शहरातील कोरोनाची जबाबदारी असलेल्या वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांनी तर वाढदिवस साजरा करत धमाल उडवून दिली. कर्तव्यावर असताना दालनातच सोशल डिस्टन्सिंगचे नियम धाब्यावर बसवून वाढदिवस साजरा केला गेला. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. मनपा आयुक्तांनी शहरात कठोर निर्बंध लागू केले आहे. त्यांचेच अधिकारी हे नियम कसे पायदळी तुडवितात, हे नगरकरांनी ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवले. त्यांना गाण्यांची मैफल चांगलीच भावली. आयुक्तांनी त्यांना नोटीस धाडत जाब विचारला असून, आपत्तीची आठवण करून दिली आहे.

.....

जिल्हाधिकाऱ्यांची बॅटिंग मुख्यमंत्र्यांना भावली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधलेल्या ऑनलाइन संवादामुळे जिल्ह्याचे जिल्हाधिकारीही चांगलेच चर्चेत आले. जिलह्यात कोरोनाची दयनीय अवस्था असताना त्यांचे झालेले कौतुक जिल्ह्यातील चर्चेचा विषय ठरला आहे. भोसले यांनी ऑनलाइन बैठकीत केलेल्या सादरीकरणाची मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनीही दखल घेतली. त्यांनी फोनवरून संवाद साधत भोसले यांचे कौतुक केले.