शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
5
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
6
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
7
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
8
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
9
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
10
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
11
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
12
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
13
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
14
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
15
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
16
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
17
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
18
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
19
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
20
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
Daily Top 2Weekly Top 5

संगमनेरात टपरीधारकांचा पालिकेत ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2016 23:51 IST

संगमनेर : शहरातील अतिक्रमणे हटविल्याने विस्थापित झालेल्या टपरीधारकांनी गाळे उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी मंगळवारी नगरपरिषद सभागृहाच्या प्रवेशद्वारात ठिय्या आंदोलन केले.

संगमनेर : शहरातील अतिक्रमणे हटविल्याने विस्थापित झालेल्या टपरीधारकांनी गाळे उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी मंगळवारी नगरपरिषद सभागृहाच्या प्रवेशद्वारात ठिय्या आंदोलन केले. आंदोलक व मुख्याधिकारी यांच्यात चांगलीच खडाजंगी उडाल्याने काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. नगरपरिषद व पोलिसांनी संयुक्तपणे मोहीम राबवत शहरातील नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्ग, नवीन नगररोड, दिल्ली नाका, जोर्वे नाका, बसस्थानक परिसरातील अतिक्रमणे हटविली. या कारवाईमुळे नवीननगर रोडवरील अतिक्रमणधारक रस्त्यावर आले. हातगाडी व टपऱ्यांमधील छोट्या व्यावसायिकांची उपासमार होऊ लागली. त्यामुळे संतप्त झालेल्या टपरीधारकांनी मंगळवारी दुपारी बारा वाजता नगरपरिषदेत जाऊन मासिक सभा सुरू असताना रामकृष्णदास महाराज सभागृहात घुसण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, नगरसेवक कैलास वाकचौरे, जावेद जहागीरदार, किशोर पवार, ज्ञानेश्वर कर्पे, अ‍ॅड. श्रीराम गणपुले, नितीन अभंग, सोमेश्वर दिवटे व मुख्याधिकारी डॉ. श्रीनिवास कुरे यांनी बाहेर येऊन चर्चा केली. आंदोलकांनी पालिका पदाधिकाऱ्यांना सभागृहातून बाहेर पडण्यास मज्जाव करीत जोरदार घोषणा दिल्या. सर्वांनी प्रवेशद्वाराच्या पायऱ्यांवर बसकन मांडून ठिय्या दिला. सचिन साळुंके व दीपक साळुंके यांनी आंदोलकांची भूमिका मांडली. पालिकेने नवीन नगररोडवरील भास्करराव दुर्वे शॉपींग सेंटरमधील गाळेधारकांचे नूतनीकरण गेल्या ९ वर्षांपासून केले नसल्याचा आरोप केला. अशा बेकायदा ३४ गाळेधारकांवर कारवाई करून ते भाडेतत्वावर आम्हाला द्या, अशी मागणी करण्यात आली. यावेळी मुख्याधिकारी कुरे व साळुंके यांच्यात जोरदार खडाजंगी उडाली. तांबे यांनी समजूत घालत मागण्यांसंदर्भात ठराव करण्याचे आश्वासन दिले. मात्र, आंदोलक पायऱ्यांवर ठाण मांडून होते. आंदोलनात कासीम शेख, विशाल पोकळे, अजहर शेख, पप्पू तांबोळी, कैलास फटांगरे, प्रमोद गणोरे, शंकर भारती, फईम बागवान, नाजीम बागवान, कैलास दसरे, विजय दसरे, बाबुराव गवांदे, अनिल महाराज, सोमनाथ वडेवाले, गौरव मिसाळ, नंदू भोईर आदी सहकुटुंब सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)नगरपरिषद मालकीचे गाळे भाडेतत्वावर देण्याकरिता आधी ठराव होतो, मग निविदा काढून लिलाव घेतले जातात. याला काही काळ जावू द्यावा लागेल. एकाएकी कुठलाही निर्णय होत नसतो. -डॉ. श्रीनिवास कुरे, मुख्याधिकारी