शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

संगमनेरात टपरीधारकांचा पालिकेत ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2016 23:51 IST

संगमनेर : शहरातील अतिक्रमणे हटविल्याने विस्थापित झालेल्या टपरीधारकांनी गाळे उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी मंगळवारी नगरपरिषद सभागृहाच्या प्रवेशद्वारात ठिय्या आंदोलन केले.

संगमनेर : शहरातील अतिक्रमणे हटविल्याने विस्थापित झालेल्या टपरीधारकांनी गाळे उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी मंगळवारी नगरपरिषद सभागृहाच्या प्रवेशद्वारात ठिय्या आंदोलन केले. आंदोलक व मुख्याधिकारी यांच्यात चांगलीच खडाजंगी उडाल्याने काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. नगरपरिषद व पोलिसांनी संयुक्तपणे मोहीम राबवत शहरातील नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्ग, नवीन नगररोड, दिल्ली नाका, जोर्वे नाका, बसस्थानक परिसरातील अतिक्रमणे हटविली. या कारवाईमुळे नवीननगर रोडवरील अतिक्रमणधारक रस्त्यावर आले. हातगाडी व टपऱ्यांमधील छोट्या व्यावसायिकांची उपासमार होऊ लागली. त्यामुळे संतप्त झालेल्या टपरीधारकांनी मंगळवारी दुपारी बारा वाजता नगरपरिषदेत जाऊन मासिक सभा सुरू असताना रामकृष्णदास महाराज सभागृहात घुसण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, नगरसेवक कैलास वाकचौरे, जावेद जहागीरदार, किशोर पवार, ज्ञानेश्वर कर्पे, अ‍ॅड. श्रीराम गणपुले, नितीन अभंग, सोमेश्वर दिवटे व मुख्याधिकारी डॉ. श्रीनिवास कुरे यांनी बाहेर येऊन चर्चा केली. आंदोलकांनी पालिका पदाधिकाऱ्यांना सभागृहातून बाहेर पडण्यास मज्जाव करीत जोरदार घोषणा दिल्या. सर्वांनी प्रवेशद्वाराच्या पायऱ्यांवर बसकन मांडून ठिय्या दिला. सचिन साळुंके व दीपक साळुंके यांनी आंदोलकांची भूमिका मांडली. पालिकेने नवीन नगररोडवरील भास्करराव दुर्वे शॉपींग सेंटरमधील गाळेधारकांचे नूतनीकरण गेल्या ९ वर्षांपासून केले नसल्याचा आरोप केला. अशा बेकायदा ३४ गाळेधारकांवर कारवाई करून ते भाडेतत्वावर आम्हाला द्या, अशी मागणी करण्यात आली. यावेळी मुख्याधिकारी कुरे व साळुंके यांच्यात जोरदार खडाजंगी उडाली. तांबे यांनी समजूत घालत मागण्यांसंदर्भात ठराव करण्याचे आश्वासन दिले. मात्र, आंदोलक पायऱ्यांवर ठाण मांडून होते. आंदोलनात कासीम शेख, विशाल पोकळे, अजहर शेख, पप्पू तांबोळी, कैलास फटांगरे, प्रमोद गणोरे, शंकर भारती, फईम बागवान, नाजीम बागवान, कैलास दसरे, विजय दसरे, बाबुराव गवांदे, अनिल महाराज, सोमनाथ वडेवाले, गौरव मिसाळ, नंदू भोईर आदी सहकुटुंब सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)नगरपरिषद मालकीचे गाळे भाडेतत्वावर देण्याकरिता आधी ठराव होतो, मग निविदा काढून लिलाव घेतले जातात. याला काही काळ जावू द्यावा लागेल. एकाएकी कुठलाही निर्णय होत नसतो. -डॉ. श्रीनिवास कुरे, मुख्याधिकारी