शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
2
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
3
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
4
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
5
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
6
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
7
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
8
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
9
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
10
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
11
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
12
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
13
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
14
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
15
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
16
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
17
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
18
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
19
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
20
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?

संगमनेरात टपरीधारकांचा पालिकेत ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2016 23:51 IST

संगमनेर : शहरातील अतिक्रमणे हटविल्याने विस्थापित झालेल्या टपरीधारकांनी गाळे उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी मंगळवारी नगरपरिषद सभागृहाच्या प्रवेशद्वारात ठिय्या आंदोलन केले.

संगमनेर : शहरातील अतिक्रमणे हटविल्याने विस्थापित झालेल्या टपरीधारकांनी गाळे उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी मंगळवारी नगरपरिषद सभागृहाच्या प्रवेशद्वारात ठिय्या आंदोलन केले. आंदोलक व मुख्याधिकारी यांच्यात चांगलीच खडाजंगी उडाल्याने काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. नगरपरिषद व पोलिसांनी संयुक्तपणे मोहीम राबवत शहरातील नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्ग, नवीन नगररोड, दिल्ली नाका, जोर्वे नाका, बसस्थानक परिसरातील अतिक्रमणे हटविली. या कारवाईमुळे नवीननगर रोडवरील अतिक्रमणधारक रस्त्यावर आले. हातगाडी व टपऱ्यांमधील छोट्या व्यावसायिकांची उपासमार होऊ लागली. त्यामुळे संतप्त झालेल्या टपरीधारकांनी मंगळवारी दुपारी बारा वाजता नगरपरिषदेत जाऊन मासिक सभा सुरू असताना रामकृष्णदास महाराज सभागृहात घुसण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, नगरसेवक कैलास वाकचौरे, जावेद जहागीरदार, किशोर पवार, ज्ञानेश्वर कर्पे, अ‍ॅड. श्रीराम गणपुले, नितीन अभंग, सोमेश्वर दिवटे व मुख्याधिकारी डॉ. श्रीनिवास कुरे यांनी बाहेर येऊन चर्चा केली. आंदोलकांनी पालिका पदाधिकाऱ्यांना सभागृहातून बाहेर पडण्यास मज्जाव करीत जोरदार घोषणा दिल्या. सर्वांनी प्रवेशद्वाराच्या पायऱ्यांवर बसकन मांडून ठिय्या दिला. सचिन साळुंके व दीपक साळुंके यांनी आंदोलकांची भूमिका मांडली. पालिकेने नवीन नगररोडवरील भास्करराव दुर्वे शॉपींग सेंटरमधील गाळेधारकांचे नूतनीकरण गेल्या ९ वर्षांपासून केले नसल्याचा आरोप केला. अशा बेकायदा ३४ गाळेधारकांवर कारवाई करून ते भाडेतत्वावर आम्हाला द्या, अशी मागणी करण्यात आली. यावेळी मुख्याधिकारी कुरे व साळुंके यांच्यात जोरदार खडाजंगी उडाली. तांबे यांनी समजूत घालत मागण्यांसंदर्भात ठराव करण्याचे आश्वासन दिले. मात्र, आंदोलक पायऱ्यांवर ठाण मांडून होते. आंदोलनात कासीम शेख, विशाल पोकळे, अजहर शेख, पप्पू तांबोळी, कैलास फटांगरे, प्रमोद गणोरे, शंकर भारती, फईम बागवान, नाजीम बागवान, कैलास दसरे, विजय दसरे, बाबुराव गवांदे, अनिल महाराज, सोमनाथ वडेवाले, गौरव मिसाळ, नंदू भोईर आदी सहकुटुंब सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)नगरपरिषद मालकीचे गाळे भाडेतत्वावर देण्याकरिता आधी ठराव होतो, मग निविदा काढून लिलाव घेतले जातात. याला काही काळ जावू द्यावा लागेल. एकाएकी कुठलाही निर्णय होत नसतो. -डॉ. श्रीनिवास कुरे, मुख्याधिकारी