शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

वांबाेरी चारी टप्पा दोन पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:20 IST

करंजी : अनेक वर्षांपासून आपल्या हक्काच्या पाण्यासाठी पाथर्डी तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकऱ्यांच्या ५० वर्षांच्या लढ्याला अखेर यश आले आणि ...

करंजी : अनेक वर्षांपासून आपल्या हक्काच्या पाण्यासाठी पाथर्डी तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकऱ्यांच्या ५० वर्षांच्या लढ्याला अखेर यश आले आणि वांबोरी चारीचे पाईपलाईनद्वारे या भागास पाणी मिळाले. मात्र या योजनेपासून वंचित असलेल्या गावांसाठी वांबोरी चारी टप्पा दोनचे काम लवकर पूर्ण व्हावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

पाथर्डी तालुक्याच्या पश्चिम भागातील गावांसाठी वरदान ठरलेली वांबोरी चारी गेल्या दोन वर्षापासून कार्यान्वित झाली. यासाठी या भागातील शेतकऱ्यांनी ५० वर्षांहून अधिक काळ लढा दिला. वांबोरी चारीचे रूपांतर वांबोरी चारी पाईपलाईन योजनेत करण्यात येऊन ही योजना पूर्ण करण्यात आली. ‘लोकमत’ने वर्षभर विविध वृत्तांच्या माध्यमातून प्रकाश टाकून अधिकारी व पदाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.

गेल्या २ वर्षापासून वांबोरी पाईपलाईन योजनेद्वारे या भागातील पाझर तलावात मुळा धरणाचे पाणी सोडले जात आहे. वांबोरी चारी पाईपलाईन योजनेत अनेक त्रुटी व उणिवा राहिल्याने डोंगराच्या कडेला असणारी गावे मात्र या योजनेत समाविष्ट होऊ शकली नाहीत. या भागातील दुष्काळ कायमचा संपवायचा असेल तर वांबोरी चारी टप्पा दोनचे काम व्हायला हवे. हे काम व्हावे अशी मागणी येथील शेतकऱ्यांमधून केली जात आहे.

९० कोटी रूपये खर्चाची वांबोरी चारी टप्पा २ ही योजना म्हणजे थेट मुळा धरणातून लोखंडी पाईपलाईनद्वारे डोंगराच्या कडेकडेने या भागातील वंचित गावांना पाणी देणे होय. पाथर्डी तालुक्यातील कोल्हार, चिचोंडी, लोहसर ते करंजीपर्यतच्या तलावात या योजनेद्वारे पाणी सोडण्यात येणार आहे. ही योजना पूर्ण झाल्यास या भागाचा कायापालट होईल.

--

वांबोरी चारी टप्पा दोनचा प्रश्न मार्गी लागल्यास या भागाचा कायापालट होऊन वंचित असलेल्या गावांना न्याय मिळेल.

-अरूण आठरे,

अध्यक्ष, वांबोरी चारी कृती समिती