शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
3
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
4
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
5
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
6
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
7
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
8
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
9
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
10
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
11
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
12
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
13
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
14
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
15
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
16
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
17
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
18
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
19
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
20
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना

चांदेकसारे परिसरात ढगफुटी; आनंदवाडी, दयानंदवाडी पाण्याखाली, नागरिकांनी घरावर बसून काढली रात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2022 11:14 IST

कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे परिसरात सोनेवाडी नागरवाडी अदी ठिकाणी अतिवृष्टी झाली ही अतिवृष्टी अतिशय मोठ्या प्रमाणात असल्याने परिसरातील ओढे नाले ओव्हर फ्लौ वाहु लागले.

शिवाजी जाधवचांदेकसारे  (जि. अहमदनगर ):  कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे परिसरात बुधवारी रात्री ढगफुटी झाली. पावसाची तीव्रता मोठ्या प्रमाणात असल्याने आनंदवाडी व दयानंदवाडी या परिसरात असलेले 250 कुटुंबांचे मोठे नुकसान झाले असून पूर्ण परिसर पाण्यात बुडाला आहे. नागरिकांनी रात्र घराच्या छतावर बसून काढली आहे. घरासमोर बांधलेले जनावरे व इतर गोष्टीचा अंदाज बचाव कार्यपथक आल्यानंतरच उघड होईल असे दिसते.

कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे परिसरात सोनेवाडी नागरवाडी अदी ठिकाणी अतिवृष्टी झाली ही अतिवृष्टी अतिशय मोठ्या प्रमाणात असल्याने परिसरातील ओढे नाले ओव्हर फ्लौ वाहु लागले. देव नदीला प्रचंड मोठ्या प्रमाणात पूर आला. आणि बघता बघता रात्रीच आनंदवाडी व दयानंदवाडी ही पाण्याखाली गेली. स्थानिक नागरिक केशवराव होन, सुधाकर होन, विलास चव्हाण, संजयलाला होन, दादासाहेब होन, सचिन होन, दिलिप होन अदीसह परिसरातील नागरिकांना ही परिस्थिती समजतात पहाटेच त्यांनी मदतीसाठी कोपरगाव चे तहसीलदार विजय बोरुडे यांना माहिती दिली.

आमदाल आशुतोष काळे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, युवा नेते विवेक कोल्हे यांनाही ग्रामस्थांनी सदर घटनेची माहिती देत बचाव कार्य पथकांची मागणी केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तहसीलदार विजय बोरुडे यांनी पहाटेच बचाव कार्यपथक पाचारण केले आहे. पुरात अडकलेल्या या नागरिकांची सुटका करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न चालू आहे. गेल्या पाच वर्षांपूर्वी देखील आनंदवाडी दयानंदवाडी या परिसराला अतिवृष्टीचा फटका बसला होता. 

अडीचशे ते तीनशे कुटुंब पाण्याखाली गेली होते. या परिसरात आदिवासी बांधवांची संख्या जास्त आहे. हातावर पोट असल्याने हा फटका त्यांना खूप मोठे संकट देऊन जाणारा आहे. या पुरामध्ये या परिसरातील नागरिकांच्या सर्व संसार वाहून गेल्याची माहिती समोर येते आहे. मागच्या पुरामध्ये नाशिक शिर्डी हायवे च्या दोन्ही ओढ्यावर छोटे पूल असल्यामुळे पूर परिस्थिती ओढवली होती मात्र आता तर या ओढ्यावरील पुलांची उंची वाढली असतानाही पुन्हा आनंदवाडी दयानंदवाडी  पाण्याखाली गेली आहे. प्रशासनाकडून मदत कार्य व बचाव कार्य सुरू असून लवकरच नुसकनीचा आणणारा समोरील येईल.