शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

शहरातील जलतरण तलाव बंद करा

By admin | Updated: March 19, 2016 00:10 IST

अहमदनगर : जिल्ह्यात दुष्काळाची स्थिती भीषण आहे. पिण्याच्या पाण्यासाठी शहरातील काही भागात नागरिकांना वणवण करावी लागते आहे.

अहमदनगर : जिल्ह्यात दुष्काळाची स्थिती भीषण आहे. पिण्याच्या पाण्यासाठी शहरातील काही भागात नागरिकांना वणवण करावी लागते आहे. अशा स्थितीत जलतरण तलाव सुरू करून महापालिका दुष्काळग्रस्तांच्या जखमांवर मीठ चोळत आहे. पावसाळा सुरू होईपर्यंत जलतरण तलाव बंद ठेवावेत, अशी मागणी मनसेने महापालिका उपायुक्तांकडे केली आहे.मनसेचे जिल्हा संघटक सचिन डफळ यांनी उपायुक्त भालचंद्र बेहरे यांना शुक्रवारी निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे की, दुष्काळाची झळ नगर शहराला बसत आहे. नागरिक पिण्याच्या पाण्यावाचून वंचित असताना शहरात मात्र जलतरण तलावातून लाखो लिटर पाण्याची नासाडी होते आहे. नगर शहरातील सर्व जलतरण तलाव तातडीने बंद करावेत. एकीकडे नगर शहरात दिवसा आड पाणी येते. केडगाव, शिवाजीनगर या भागात आठ ते दहा दिवसांनी पाणी मिळते. शहरात पाण्याची स्थिती गंभीर असताना जलतरण तलावांना मोठ्या दाबाने पाणी पुरवठा केला जातो. महापालिकेने हे तलाव बंद केले नाहीत, तर मनसे आक्रमक पद्धतीने तलाव बंद करण्यासाठी आंदोलन करणार असल्याचा इशारा डफळ यांनी दिला. यावेळी शहराध्यक्ष गिरीश जाधव, नितीन भुतारे, सुरज वाणे, अभिषेक मोरे, परेश पुरोहित आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)