शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील जलतरण तलाव बंद करा

By admin | Updated: March 19, 2016 00:10 IST

अहमदनगर : जिल्ह्यात दुष्काळाची स्थिती भीषण आहे. पिण्याच्या पाण्यासाठी शहरातील काही भागात नागरिकांना वणवण करावी लागते आहे.

अहमदनगर : जिल्ह्यात दुष्काळाची स्थिती भीषण आहे. पिण्याच्या पाण्यासाठी शहरातील काही भागात नागरिकांना वणवण करावी लागते आहे. अशा स्थितीत जलतरण तलाव सुरू करून महापालिका दुष्काळग्रस्तांच्या जखमांवर मीठ चोळत आहे. पावसाळा सुरू होईपर्यंत जलतरण तलाव बंद ठेवावेत, अशी मागणी मनसेने महापालिका उपायुक्तांकडे केली आहे.मनसेचे जिल्हा संघटक सचिन डफळ यांनी उपायुक्त भालचंद्र बेहरे यांना शुक्रवारी निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे की, दुष्काळाची झळ नगर शहराला बसत आहे. नागरिक पिण्याच्या पाण्यावाचून वंचित असताना शहरात मात्र जलतरण तलावातून लाखो लिटर पाण्याची नासाडी होते आहे. नगर शहरातील सर्व जलतरण तलाव तातडीने बंद करावेत. एकीकडे नगर शहरात दिवसा आड पाणी येते. केडगाव, शिवाजीनगर या भागात आठ ते दहा दिवसांनी पाणी मिळते. शहरात पाण्याची स्थिती गंभीर असताना जलतरण तलावांना मोठ्या दाबाने पाणी पुरवठा केला जातो. महापालिकेने हे तलाव बंद केले नाहीत, तर मनसे आक्रमक पद्धतीने तलाव बंद करण्यासाठी आंदोलन करणार असल्याचा इशारा डफळ यांनी दिला. यावेळी शहराध्यक्ष गिरीश जाधव, नितीन भुतारे, सुरज वाणे, अभिषेक मोरे, परेश पुरोहित आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)