शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील जलतरण तलाव बंद करा

By admin | Updated: March 19, 2016 00:10 IST

अहमदनगर : जिल्ह्यात दुष्काळाची स्थिती भीषण आहे. पिण्याच्या पाण्यासाठी शहरातील काही भागात नागरिकांना वणवण करावी लागते आहे.

अहमदनगर : जिल्ह्यात दुष्काळाची स्थिती भीषण आहे. पिण्याच्या पाण्यासाठी शहरातील काही भागात नागरिकांना वणवण करावी लागते आहे. अशा स्थितीत जलतरण तलाव सुरू करून महापालिका दुष्काळग्रस्तांच्या जखमांवर मीठ चोळत आहे. पावसाळा सुरू होईपर्यंत जलतरण तलाव बंद ठेवावेत, अशी मागणी मनसेने महापालिका उपायुक्तांकडे केली आहे.मनसेचे जिल्हा संघटक सचिन डफळ यांनी उपायुक्त भालचंद्र बेहरे यांना शुक्रवारी निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे की, दुष्काळाची झळ नगर शहराला बसत आहे. नागरिक पिण्याच्या पाण्यावाचून वंचित असताना शहरात मात्र जलतरण तलावातून लाखो लिटर पाण्याची नासाडी होते आहे. नगर शहरातील सर्व जलतरण तलाव तातडीने बंद करावेत. एकीकडे नगर शहरात दिवसा आड पाणी येते. केडगाव, शिवाजीनगर या भागात आठ ते दहा दिवसांनी पाणी मिळते. शहरात पाण्याची स्थिती गंभीर असताना जलतरण तलावांना मोठ्या दाबाने पाणी पुरवठा केला जातो. महापालिकेने हे तलाव बंद केले नाहीत, तर मनसे आक्रमक पद्धतीने तलाव बंद करण्यासाठी आंदोलन करणार असल्याचा इशारा डफळ यांनी दिला. यावेळी शहराध्यक्ष गिरीश जाधव, नितीन भुतारे, सुरज वाणे, अभिषेक मोरे, परेश पुरोहित आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)