शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

धर्मगुरू, चर्चेसला लक्ष्य केले तर खपवून घेणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:50 IST

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, ख्रिस्ती धर्माचा पाया प्रेम, दया, शांती त्याग व बलिदानातून उभारलेला आहे. केवळ प्रेमावर ...

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, ख्रिस्ती धर्माचा पाया प्रेम, दया, शांती त्याग व बलिदानातून उभारलेला आहे. केवळ प्रेमावर आधारलेल्या ख्रिस्ती धर्मीयांचा छळ करणे म्हणजे, समाजात दहशत निर्माण करणे असे आहे. जाणूनबुजून ख्रिश्चनांच्या धार्मिक भावना दुखवून समाजामध्ये शांतता भंग करण्याचा काही समाजकंटकांचा हेतू दिसतो. राजकारणविरहित सेवा करणाऱ्या ख्रिश्चनांवर अनेकदा खोटे-नाटे आरोप करण्यात आले; परंतु शांतताप्रिय ख्रिश्चनांनी आजपर्यंत सर्व निमूटपणे सहन केले.

ख्रिस्ती मिशनरी ग्रॅहम स्टेन्स. फादर स्टॅन स्वामी, वसईतील सांडोरा भागातील बांभोळी येथील निराश्रित माता आश्रमातील धर्मगुरू फादर पिटर बोंबाचा यांची हत्या. त्यानंतर अनेक प्रकरणांत सेविकांवर बलात्कार, प्रार्थनास्थळांची मोडतोड, ते कालपरवा झालेला कोल्हापूर जिल्ह्यातील कोवाड (चांदगड) येथील चर्चमधील हल्ला, बीड व अकोले तालुक्यातील घटना आणि आता रत्नागिरी येथील सेवकांना झालेली मारहाण, अशा अनेक घटना सतत घडत आहेत. यापुढे जाऊन मदर तेरेसा यांच्या कार्यावर संशय व्यक्त करणे, मिशनरी आणि त्यांचे कार्य याबाबत उपरोधिक वक्तव्य करणे, वाहिन्यांवरील कार्यक्रमातून ख्रिस्ती धर्म आणि धर्मग्रंथाचा उपहास करणारे अवमानकारक प्रसंग घडत आहेत. या घटनांवरून ख्रिस्ती धर्म संपविण्याचा कट तर नाही ना, अशी शंका वाटत आहे. अवघे सव्वा दोन टक्के लोकसंख्या असलेले ख्रिस्ती लोक देशावर कोणतेही संकट आले तर त्यासाठी प्रार्थनापूर्वक प्रत्यक्ष मदतीसाठी तत्पर असतात; परंतु या शांतताप्रिय समाजाला नेहमीच लक्ष्य करून विचलित करण्याचा होणारा प्रयत्न अतिशय निंदनीय आहे. या पुढील काळामध्ये अशा घटना घडू नये व घडलेल्या घटनेत जे दोषी आहेत त्या समाजकंटकांवर कठोर कार्यवाही व्हावी, अशी मागणी भोसले यांनी केली आहे.