शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

धर्मगुरू, चर्चेसला लक्ष्य केले तर खपवून घेणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:50 IST

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, ख्रिस्ती धर्माचा पाया प्रेम, दया, शांती त्याग व बलिदानातून उभारलेला आहे. केवळ प्रेमावर ...

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, ख्रिस्ती धर्माचा पाया प्रेम, दया, शांती त्याग व बलिदानातून उभारलेला आहे. केवळ प्रेमावर आधारलेल्या ख्रिस्ती धर्मीयांचा छळ करणे म्हणजे, समाजात दहशत निर्माण करणे असे आहे. जाणूनबुजून ख्रिश्चनांच्या धार्मिक भावना दुखवून समाजामध्ये शांतता भंग करण्याचा काही समाजकंटकांचा हेतू दिसतो. राजकारणविरहित सेवा करणाऱ्या ख्रिश्चनांवर अनेकदा खोटे-नाटे आरोप करण्यात आले; परंतु शांतताप्रिय ख्रिश्चनांनी आजपर्यंत सर्व निमूटपणे सहन केले.

ख्रिस्ती मिशनरी ग्रॅहम स्टेन्स. फादर स्टॅन स्वामी, वसईतील सांडोरा भागातील बांभोळी येथील निराश्रित माता आश्रमातील धर्मगुरू फादर पिटर बोंबाचा यांची हत्या. त्यानंतर अनेक प्रकरणांत सेविकांवर बलात्कार, प्रार्थनास्थळांची मोडतोड, ते कालपरवा झालेला कोल्हापूर जिल्ह्यातील कोवाड (चांदगड) येथील चर्चमधील हल्ला, बीड व अकोले तालुक्यातील घटना आणि आता रत्नागिरी येथील सेवकांना झालेली मारहाण, अशा अनेक घटना सतत घडत आहेत. यापुढे जाऊन मदर तेरेसा यांच्या कार्यावर संशय व्यक्त करणे, मिशनरी आणि त्यांचे कार्य याबाबत उपरोधिक वक्तव्य करणे, वाहिन्यांवरील कार्यक्रमातून ख्रिस्ती धर्म आणि धर्मग्रंथाचा उपहास करणारे अवमानकारक प्रसंग घडत आहेत. या घटनांवरून ख्रिस्ती धर्म संपविण्याचा कट तर नाही ना, अशी शंका वाटत आहे. अवघे सव्वा दोन टक्के लोकसंख्या असलेले ख्रिस्ती लोक देशावर कोणतेही संकट आले तर त्यासाठी प्रार्थनापूर्वक प्रत्यक्ष मदतीसाठी तत्पर असतात; परंतु या शांतताप्रिय समाजाला नेहमीच लक्ष्य करून विचलित करण्याचा होणारा प्रयत्न अतिशय निंदनीय आहे. या पुढील काळामध्ये अशा घटना घडू नये व घडलेल्या घटनेत जे दोषी आहेत त्या समाजकंटकांवर कठोर कार्यवाही व्हावी, अशी मागणी भोसले यांनी केली आहे.