शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

नगर जिल्हा विभाजनासाठी पाठपुरावा करणार-प्राजक्त तनपुरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 16:09 IST

भौगोलिकदृष्ट्या अहमदनगर जिल्हा विस्ताराने मोठा आहे़. त्यामुळे जिल्ह्याचे विभाजन गरजेचे आहे. यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी शनिवारी (दि़४) नगर येथे माध्यमांशी बोलताना सांगितले़. 

अहमदनगर : भौगोलिकदृष्ट्या अहमदनगर जिल्हा विस्ताराने मोठा आहे़. त्यामुळे जिल्ह्याचे विभाजन गरजेचे आहे. यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे राज्यमंत्रीप्राजक्त तनपुरे यांनी शनिवारी (दि़४) नगर येथे माध्यमांशी बोलताना सांगितले़. तनपुरे म्हणाले, नगर जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सहा आमदार निवडून आले आहेत.  मंत्रीपद मिळावे, अशी प्रत्येकाला अपेक्षा असते़. मंत्रीपद मिळाले नाही म्हणून मात्र कुणीही नाराज नाही़. आम्ही निवडून आलेल्या आमदारांमध्ये चांगला सुसंवाद आहे़. मंत्रीपदाच्या माध्यमातून तिनही पक्षांच्या समान कार्यक्रमातंर्गत जिल्ह्यातील विकासकामांना प्राधान्य देणार आहे़. यामध्ये निळवंडे धरणाचे कालवे, वांबोरी चारी, रस्ते, पाणी योजना आदी रखडलेल्या कामांना गती देण्यात येईल़. कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टिने जिल्ह्याला तातडीने पोलीस अधीक्षक मिळावेत, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. लवकरच अधीक्षकांची नियुक्ती होईल़ लष्कराच्या के़ के़ रेंज येथील जमिनीबाबत शेतक-यांवर अन्याय होणार नाही. यासाठी केंद्रिय मंत्र्यांकडे प्रश्न मांडणार असल्याचे तनपुरे म्हणाले़, राज्य सरकारची शिवभोजन ही योजना यशस्वी होईल, यात काही त्रुटी राहिल्या तर त्यात पुढील काळात सुधारणा करता येतील. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली तेव्हा त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. राज्यात निवडून आलेल्या तरुण आमदारांकडून हजारे यांना चांगल्या कामाची अपेक्षा आहे़. मागील आमदाराला राहुरी तालुक्याचा विकास करता आलेला नाही़. शहरातील बसस्थानक, रस्ते, पाणी आदी प्रश्न प्रलंबित आहेत. येणा-या काळात सर्वसामान्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करण्याचे उदष्टि असल्याचे तनपुरे म्हणाले़. उद्योग खाते मिळावे ही अपेक्षा राज्यमंत्री म्हणून कोणते खाते मिळणार हा पक्षश्रेष्ठींचा निर्णय आहे़. मात्र उद्योग खाते मिळाले तर सुशिक्षित बेरोजगारांसाठी नवनवीन योजना राबविण्याचा मानस आहे़. त्यामुळे उद्योग खाते मिळावे, अशी मागणी करणार आहे तसेच जिल्ह्यात जास्तीतजास्त रोजगार उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे तनपुरे म्हणाले़. 

टॅग्स :Prajakta Tanpurayप्राजक्त तनपुरेAhmednagarअहमदनगरRahuriराहुरीministerमंत्री