शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

नगरच्या व्यापाऱ्यांचा एलबीटीला विरोधच!

By admin | Updated: June 13, 2014 01:14 IST

अहमदनगर : एलबीटी कर भरण्यास नगरच्या व्यापाऱ्यांचा स्पष्ट विरोध असून त्याऐवजी व्हॅटमध्ये वाढ करावी अशी भूमिका आडते बाजार व्यापारी असोशिएशनचे सचिव संतोष बोरा यांनी ‘लोकमत’शी बोलताना मांडली.

अहमदनगर : एलबीटी कर भरण्यास नगरच्या व्यापाऱ्यांचा स्पष्ट विरोध असून त्याऐवजी व्हॅटमध्ये वाढ करावी अशी भूमिका आडते बाजार व्यापारी असोशिएशनचे सचिव संतोष बोरा यांनी ‘लोकमत’शी बोलताना मांडली. एलबीटी हवी की नको या संदर्भात व्यापाऱ्यांची मते जाणून घेण्यासाठी महापौर संग्राम जगताप यांनी महापालिकेत शुक्रवारी बैठकीचे आयोजन केले आहे. एलबीटी संदर्भात भूमिका मांडताना बोरा म्हणाले, व्यापाऱ्यांची कर भरण्यास ना नाही. नगर शहराचा विकास करायचा असेल तर महापालिकेला पैसे लागणार आहे हे मान्य आहे. पण मानसिक त्रास देणारा एलबीटी भरण्यास आमचा विरोध आहे. त्याऐवजी व्हॅटमध्ये वाढ करावी. कुठलीही कर वाढ करताना शासनाने कधी कोणाला विचारले नाही. पर्याय काय हवा हे त्यांनीच सांगयला हवे होते. शासनाने अशी कर प्रणाली लागू करावी की त्यातून व्यापाऱ्यांना कर चुकविता येणार नाही. एलबीटी बंद झाली तर शासनाकडून महापालिकेला अनुदान मिळणार नाही असे सांगितले जाते. परंतु शासनाच्या अनुदानाशी व्यापाऱ्यांचा संबंध नाही. तो महापालिका व शासनामधील प्रश्न आहे. शासन अनुदान देत नाही म्हणून व्यापाऱ्यांची पिळवणूक करणे योग्य नाही. नगरच्या व्यापाऱ्यांनी महापालिकेला आजपर्यंत सहकार्य केले आहे. व्यापाऱ्यांची भूमिका सहकार्याचीच आहे. एलबीटी भरताना महापालिकेकडून मानसिक त्रास दिला जातो. आयात मालाची बिले दाखविणे, त्याची नोंद ठेवणे व त्याचे विवरण पत्र भरून देणे बंधनकारक आहे. व्यापाऱ्यांना व्यापार सोडून लिखापढी करत बसावे लागते. विवरणपत्र वेळेत दिले नाही तर महापालिका व्यापाऱ्यांना नोटीस बजावून दंड आकारणी करते. व्यापारी व्यापार करतो म्हणजे चोरीच करतो असा त्रास महापालिकेकडून दिला जातो. हे योग्य नाही. त्यामुळेच नगरच्या व्यापाऱ्यांचा एलबीटीला विरोध आहे. महापौर जगताप, आयुक्त कुलकर्णी यांच्या बैठकीत नगरचे व्यापारी हीच भूमिका मांडणार असल्याचे बोरा यांनी सांगितले. (प्रतिनिधी)विक्री कर विभागावर मनपाचा विश्वास नाहीएलबीटीतून महापालिकेला चांगले उत्पन्न मिळते आहे. व्हॅट लागू केला तर विक्रीकर विभागामार्फत महापालिकेला पैसे मिळतील. व्हॅट कमी गोळा झाला तर महापालिकेचा तोटा होतो. शिवाय व्हॅट गोळा करताना व्यापाऱ्यांवर महापालिकेचे नियंत्रण राहत नाही. विक्री कर विभागावर महापालिकेचा विश्वास नाही. त्यामुळे एलबीटी रहावी अशी महापालिकेची इच्छा आहे.