शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

कोरोनाचे नियम मोडत नगरकरांनी भरला ९४ लाखांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:18 IST

अहमदनगर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या नियमांचा भंग केल्याप्रकरणी मागील साडेचार महिन्यांत पोलिसांनी ७४ हजार ५२७ ...

अहमदनगर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या नियमांचा भंग केल्याप्रकरणी मागील साडेचार महिन्यांत पोलिसांनी ७४ हजार ५२७ कारवाया करीत तब्बल ९४ लाख २५ हजार ६७० रुपयांचा दंड वसूल केला आहे. गेल्या वर्षभरात २६ हजार ८५६ जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.

कोरोना प्रतिबंधासाठी गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. नियमांच्या अंमलबजावणीची सर्वाधिक मोठी जबाबदारी पोलिसांवर आहे. गेल्या वर्षात पोलिसांनी चोवीस तास रस्त्यावर खडा पहारा देत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव थोपविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मागील वर्षी नियम तोडणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. यावर्षी मात्र दंडात्मक कारवाई केली जात आहे. प्रशासनाकडून वारंवार सूचना देऊनही नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन होताना दिसत असल्याने जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले व जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी स्वतः रस्त्यावर उतरून नियम पाळण्याबाबत नागरिकांना समज दिली आहे.

गेल्या काही दिवसांत नगर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात कोरोनाचा नव्याने उद्रेक वाढल्याने पोलिसांनी नियमांची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. मास्क न वापरणे, सोशल डिस्टन्सिंग न पाळणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, गर्दी करणे आदी नियमांचा भंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. पोलिसांनी सुरू केलेल्या कडक अंमलबजावणीमुळे नियम तोडणाऱ्यांना चांगलाच वचक बसला आहे.

..........

मास्क न वापरणाऱ्या ६९ हजार ९७२ जणांवर कारवाई

घराबाहेर पडल्यानंतर मास्क न वापरणाऱ्या ६९ हजार ९७२ जणांवर पोलिसांनी कारवाई करीत एकूण ८६ लाख ३३ हजार ७०० रुपयांचा दंड ठोठावला आहे.

...........

पिचकारी बहाद्दरांनाही दणका

सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या १ हजार ६३१ जणांकडून २ लाख ३९ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

.............

सोशल डिस्टन्सिंगचा नियम न पाळणाऱ्या १ हजार ९०६ जणांवर पोलिसांनी कारवाई करीत २ लाख ४५ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे

..............

२० मंगल कार्यालय चालकांवर कारवाई

जिल्ह्यात १९ फेब्रुवारी ते १८ मार्च या दरम्यान कोरोनासंदर्भात लागू करण्यात आलेले नियम न पाळणाऱ्या ३० मंगल कार्यालय चालकांवर पोलिसांनी कारवाई करीत १ लाख ८५ हजार रुपयांचा दंड केला आहे.

......................

पोलिसांकडून नियमांची कडक अंमलबजावणी

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या नियमांची जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील व अपर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभरात

पोलिसांकडून कडक अंमलबजावणी होत आहे. शास्त्रशुद्ध नियोजन व कारवाईतील सातत्यामुळे आधीच्या तुलनेत लोक आता गांभीर्याने नियम पाळताना दिसत आहेत. मात्र, जेथे उल्लंघन होत आहे तेथे तात्काळ कारवाई होत असल्याचे जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी सांगितले.