शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
4
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
5
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
6
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
7
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
8
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
9
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
10
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
11
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
12
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
13
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
14
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
15
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
16
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
17
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
18
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
19
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
20
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल

मुंबईसह १२ महानगरांतील बालके असुरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 12:59 IST

रस्त्यावर भटकणा-या बालकांच्या पुनर्वसनासाठी विविध सामाजिक संस्था पुढे येत आहेत. शासकीय यंत्रणेला मात्र पाझर फुटला नसून, मुंबईसह बारा महानगरांतील महापालिकांनी बालकांच्या पुनर्वसनाची ‘शून्य कार्यवाही’ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

अण्णा नवथर ।  अहमदनगर : रस्त्यावर भटकणाºया बालकांच्या पुनर्वसनासाठी विविध सामाजिक संस्था पुढे येत आहेत. शासकीय यंत्रणेला मात्र पाझर फुटला नसून, मुंबईसह बारा महानगरांतील महापालिकांनी बालकांच्या पुनर्वसनाची ‘शून्य कार्यवाही’ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे रस्त्यावर भटकणा-या बालकांच्या पुनर्वसनाचा शासनाच्या उद्देशाला मूठमाती मिळाली आहे.  टाटा इन्स्टिट्यूट या संस्थेने मुंबईतील रस्ते, रेल्वेस्टेशन आणि गजबजलेल्या ठिकाणी भटकणा-या बालकांची गणना केली होती़. बालकांच्या गणनेचा कार्यकाळ नोव्हेंबर २०१२ ते फेब्रुवारी २०१३ हा होता़. बालकांच्या सर्वेक्षणाचा अहवाल ‘लोकमत’च्या हाती आला आहे. सर्वेक्षण केलेल्या कार्यकाळात ३६ हजार १५४ मुले रस्त्यावर आढळून भटकंती करत असल्याची माहिती समोर आली़. ९०५ मुले ही रेल्वेच्या डब्यांमध्ये आढळून आली होती़. यापैकी २५ टक्के मुलांनाच फक्त एक वेळचे जेवण मिळते, असा अहवाल संस्थेने दिला आहे. रस्त्यावर भटकणा-या बालकांच्या विकासासाठी सदर संस्थेने शासनाला काही शिफारशी केल्या़. त्यानुसार महिला व बालकल्याण विभागाच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली सन २०१४ मध्ये स्वतंत्र बैठक झाली. या बैठकीत राज्यस्तरावर कृतिदल स्थापन करण्याचा निर्णय झाला़ शासनाचे मुख्य सचिव या कृतिदलाचे अध्यक्ष आहेत़. या बैठकीत नागरी भागातील रस्त्यावर राहणाºया बालकांच्या पुनर्वसनाची संपूर्ण जबाबदारी महापालिकेवर सोपविण्यात आली़. यासंदर्भात महापालिकांनी १५ दिवसांत कृती दल स्थापन करण्याचा आदेश देण्यात आला होता़.  तसेच केलेल्या कार्यवाहीचा अहवाल शासनाने महापालिकांकडून मागविला होता.  परंतु, अहमदनगरसह बृहन्मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, भिवंडी, सांगली मिरज कुपवाड, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, वसई विरार, परभणी या महापालिकांनी रस्त्यावरील भटकणाºया मुलांच्या पुनर्वसनासाठी कुठलीही कार्यवाही केली नाही.  त्यामुळे शासनाने सदर महापालिकांना कार्यवाही करण्याबाबत स्मरणपत्र पाठविले आहे.काय सांगतो अहवाल नोव्हेंबर २०१२ ते फेब्रुवारी २०१३ या काळात झालेल्या सर्वेक्षणात ३६ हजार १५४ मुले रस्त्यावर राहत असल्याचे आढळून आले. त्यामध्ये रस्त्यावर राहणाºयांमध्ये ३० टक्के मुली, ६५ टक्के मुले कुटुंबासोबत आधाराच्या शोधात, रस्त्यावर राहणा-यांमध्ये २५ टक्के मुले रोजगार करतात. तर १५ टक्के मुले व्यसनाधीन असल्याचे आढळून आले आहे.दर ५ पैकी २ मुले अत्याचाराचे शिकाररस्त्यावर राहणा-या दर पाच मुलांपैकी २ मुले मानसिक, शारीरिक अत्याचाराचे शिकार होत असल्याचे संस्थेने दिलेल्या अहवालात नमूद केले आहे़. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरchildren's dayबालदिन