शहरं
Join us  
Trending Stories
1
सोशल मीडियावरचे आरोप गडकरींनी लोकसभेत फेटाळले; म्हणाले, इथेनॉल मिश्रित इंधनावर ARAI ने १ लाख किमी...
2
बांगलादेशात युनूस सरकार मावळणार, संध्याकाळी मोठी घोषणा होणार; संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं
3
महाराष्ट्रातील सीमेवरील गावात गुजरातची घुसखोरी; सीमांकन हळूहळू वाढवत असल्याचा स्थानिकांचा दावा
4
'त्यांचे हाथ थरथरत होते, दडपणाखाली होते'; राहुल गांधी अमित शाहांच्या लोकसभेतील भाषणावर आता काय बोलले?
5
लग्नाआधीच मुलगी गरोदर; आईला कळताच तिच्या प्रियकराला घरी बोलवलं अन् मग...शेवट भयंकर!
6
आम्हाला तर पाकिस्तान सोबत येणे शक्य, पण हे दोन देश...; नव्या समूहासंदर्भात काय म्हणाला बांगलादेश
7
'स्वाभिमानाने जगणारा कोकणातला शेतकरी आज चिंतेत', वलसाड हापूसवरून भास्कर जाधव आक्रमक
8
व्हॉट्सअ‍ॅपवरची एक चूक थेट घेऊन जाऊ शकते तुरुंगात! 'ही' गोष्ट करताना किमान दहा वेळ विचार कराच
9
पाकिस्तानमध्ये कधी येणार? 'रेड सी फिल्म फेस्टिव्हल'मध्ये आलिया भटला चाहत्याचा प्रश्न; म्हणाली...
10
ऐश्वर्यासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवर अखेर अभिषेक बच्चनने सोडलं मौन, म्हणाला- "माझ्या पत्नीला..."
11
धक्कादायक! दारुच्या नशेत होता बोगस डॉक्टर; YouTube पाहून ऑपरेशन, चुकीची नस कापली अन्...
12
Gold Silver Price Today: यावर्षी सोनं ₹५२,७९५ आणि चांदी ₹१००९३६ रुपयांनी महागली; आजही दरानं तोडले सर्व विक्रम, पाहा किंमत
13
पुढील वर्षात १ तोळा सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागणार? ब्रोकरेज फर्मने सांगितला मोठा आकडा
14
लुथरा बंधूंचे थायलंडमधून फोटो आले, पासपोर्टसह घेतले ताब्यात; कारवाईपासून वाचण्यासाठी पळाले खरे पण...
15
व्हॉट्सअप चॅट्स वाचण्यासाठी...! डीएसपी 'कल्पना वर्मा' यांच्या 'लव्ह ट्रॅप' प्रकरणात 'Love U यार...' ची एन्ट्री...
16
Geminid Meteor Shower: १३,१४ डिसेंबर ठरणार इच्छापूर्तीची रात्र; आकाशाकडे बघून करा 'हे' काम!
17
'एसी-थ्री टियर'मध्ये प्रवाशासोबत कुत्रा! रेल्वेतून नेता येतो का? व्हिडिओ व्हायरल होताच रेल्वे 'सेवा' झाली सक्रिय
18
माइंडमेश समिट २०२५: विद्या-कला-नीती पुरस्कारांची घोषणा; समाजाला आकार देणाऱ्यांचा सन्मान
19
३ महिन्यांतच गमावलेलं दुसरं बाळ, पहिल्यांदाच व्यक्त झाली सुनीता अहुजा, म्हणाली- "तिला श्वास घ्यायला त्रास व्हायचा..."
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईसह १२ महानगरांतील बालके असुरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 12:59 IST

रस्त्यावर भटकणा-या बालकांच्या पुनर्वसनासाठी विविध सामाजिक संस्था पुढे येत आहेत. शासकीय यंत्रणेला मात्र पाझर फुटला नसून, मुंबईसह बारा महानगरांतील महापालिकांनी बालकांच्या पुनर्वसनाची ‘शून्य कार्यवाही’ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

अण्णा नवथर ।  अहमदनगर : रस्त्यावर भटकणाºया बालकांच्या पुनर्वसनासाठी विविध सामाजिक संस्था पुढे येत आहेत. शासकीय यंत्रणेला मात्र पाझर फुटला नसून, मुंबईसह बारा महानगरांतील महापालिकांनी बालकांच्या पुनर्वसनाची ‘शून्य कार्यवाही’ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे रस्त्यावर भटकणा-या बालकांच्या पुनर्वसनाचा शासनाच्या उद्देशाला मूठमाती मिळाली आहे.  टाटा इन्स्टिट्यूट या संस्थेने मुंबईतील रस्ते, रेल्वेस्टेशन आणि गजबजलेल्या ठिकाणी भटकणा-या बालकांची गणना केली होती़. बालकांच्या गणनेचा कार्यकाळ नोव्हेंबर २०१२ ते फेब्रुवारी २०१३ हा होता़. बालकांच्या सर्वेक्षणाचा अहवाल ‘लोकमत’च्या हाती आला आहे. सर्वेक्षण केलेल्या कार्यकाळात ३६ हजार १५४ मुले रस्त्यावर आढळून भटकंती करत असल्याची माहिती समोर आली़. ९०५ मुले ही रेल्वेच्या डब्यांमध्ये आढळून आली होती़. यापैकी २५ टक्के मुलांनाच फक्त एक वेळचे जेवण मिळते, असा अहवाल संस्थेने दिला आहे. रस्त्यावर भटकणा-या बालकांच्या विकासासाठी सदर संस्थेने शासनाला काही शिफारशी केल्या़. त्यानुसार महिला व बालकल्याण विभागाच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली सन २०१४ मध्ये स्वतंत्र बैठक झाली. या बैठकीत राज्यस्तरावर कृतिदल स्थापन करण्याचा निर्णय झाला़ शासनाचे मुख्य सचिव या कृतिदलाचे अध्यक्ष आहेत़. या बैठकीत नागरी भागातील रस्त्यावर राहणाºया बालकांच्या पुनर्वसनाची संपूर्ण जबाबदारी महापालिकेवर सोपविण्यात आली़. यासंदर्भात महापालिकांनी १५ दिवसांत कृती दल स्थापन करण्याचा आदेश देण्यात आला होता़.  तसेच केलेल्या कार्यवाहीचा अहवाल शासनाने महापालिकांकडून मागविला होता.  परंतु, अहमदनगरसह बृहन्मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, भिवंडी, सांगली मिरज कुपवाड, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, वसई विरार, परभणी या महापालिकांनी रस्त्यावरील भटकणाºया मुलांच्या पुनर्वसनासाठी कुठलीही कार्यवाही केली नाही.  त्यामुळे शासनाने सदर महापालिकांना कार्यवाही करण्याबाबत स्मरणपत्र पाठविले आहे.काय सांगतो अहवाल नोव्हेंबर २०१२ ते फेब्रुवारी २०१३ या काळात झालेल्या सर्वेक्षणात ३६ हजार १५४ मुले रस्त्यावर राहत असल्याचे आढळून आले. त्यामध्ये रस्त्यावर राहणाºयांमध्ये ३० टक्के मुली, ६५ टक्के मुले कुटुंबासोबत आधाराच्या शोधात, रस्त्यावर राहणा-यांमध्ये २५ टक्के मुले रोजगार करतात. तर १५ टक्के मुले व्यसनाधीन असल्याचे आढळून आले आहे.दर ५ पैकी २ मुले अत्याचाराचे शिकाररस्त्यावर राहणा-या दर पाच मुलांपैकी २ मुले मानसिक, शारीरिक अत्याचाराचे शिकार होत असल्याचे संस्थेने दिलेल्या अहवालात नमूद केले आहे़. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरchildren's dayबालदिन