शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

खरंच पाच नगरसेवकांसाठी मुख्यमंत्री ठाकरे संतप्त?; सेना-राष्ट्रवादीत चर्चेला उधाण

By सुधीर लंके | Updated: July 8, 2020 11:38 IST

पारनेर नगरपंचायतच्या पाच नगरसेवकांसाठी खरोखरच उद्धव ठाकरे यांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे का? याबाबत शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांमध्ये संभ्रम आहे. विधानसभेपूर्वीच तेथे सेनेत धुसफूस होती. त्यातूनच हे बंड घडले असून यास आम्ही नव्हे तर सेनाच जबाबदार आहे, असे राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांचे म्हणणे आहे. 

पारनेर नगरपंचायत-विश्लेषणअहमदनगर : पारनेर नगरपंचायतच्या पाच नगरसेवकांसाठी खरोखरच उद्धव ठाकरे यांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे का? याबाबत शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांमध्ये संभ्रम आहे. विधानसभेपूर्वीच तेथे सेनेत धुसफूस होती. त्यातूनच हे बंड घडले असून यास आम्ही नव्हे तर सेनाच जबाबदार आहे, असे राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांचे म्हणणे आहे. 

पारनेर नगरपंचायतमधील शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी गत आठवड्यात बारामतीला जाऊन अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे स्थानिक आमदार निलेश लंके यांची ताकद त्यामुळे वाढली आहे. या नगरसेवकांच्या पक्षांतराची थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दखल घेतली असून ‘आमचे नगरसेवक परत पाठवा’, असा संदेश त्यांनी महाआघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीला पाठविला असल्याची चर्चा मुंबईत रंगली आहे. 

पारनेर हा विधानसभेचा मतदारसंघ सेनेने गत निवडणुकीत गमावला आहे. सेनेचे नेते व विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी यांचा लंके यांनी येथे पराभव केला. लंके हे पूर्वाश्रमीचे शिवसैनिकच आहेत. सेनेचे तालुकाप्रमुख होते. औटी व त्यांच्यात वाद झाल्यानंतर त्यांनी पक्ष सोडला. उद्धव ठाकरे हे २०१८ साली पारनेर दौ-यावर असताना लंके समर्थकांनी त्यांच्या ताफ्यावर दगडफेक केल्याचा आरोप झाला होता. तेव्हापासून लंके चर्चेत आहेत. सेना व त्यांच्यात तेव्हापासून जोरदार संघर्ष आहे. ही किनारही ठाकरे यांच्या नाराजीला असू शकते़ 

सेनेने येथील नगरपंचायतीची सत्ता ही विधानसभा निवडणुकीपूर्वीच गमावलेली आहे. या नगरपंचायतीत १७ सदस्यांपैकी ९ सेनेचे आहेत. पहिल्या अडीच वर्षात सेनेचाच नगराध्यक्ष होता. नंतरच्या अडीच वर्षात मात्र सेनेत बंडखोरी होऊन अपक्षाला नगराध्यक्षपद मिळाले. विधानसभेपूर्वीच हे बंड झाले होते. त्यामुळे आजच्या पक्षांतरालाही आम्ही जबाबदार नसून सेनेतील अंतर्गत नाराजी जबाबदार असल्याचे राष्ट्रवादीचे म्हणणे आहे. अर्थात नगरपंचायतची निवडणूक तोंडावर असल्याने येथील सध्याच्या पक्षांतराचा लगेच नगराध्यक्ष पदावर काहीही परिणाम संभवत नाही. 

आपल्यादृष्टीने पक्षांतराचा हा विषय संपलेला आहे. आपणाला या विषयावर काहीही प्रतिक्रिया द्यायची नाही.                   -विजय औटी, माजी आमदार, शिवसेना.

पारनेरच्या शिवसेनेत अगोदरपासून धुसफूस आहे. अंतर्गत मतभेदांमुळे सेनेला बहुमत असूनही नगराध्यक्षपद राखता आलेले नाही. सेनेचे पाच नगरसेवक भाजपात निघाले होते. त्यांना राष्ट्रवादीत घेतले. यात चुकीचे काय आहे?  मुख्यमंत्र्यांनीही याबाबत हरकत घेतली असेल असे आपणाला वाटत नाही. ही चर्चा केवळ मीडियात आहे.               

             - राजेंद्र फाळके, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी.

शिवसेनेचे कोणते नगरसेवक पक्ष सोडून गेले ती माहिती मातोश्रीने मागितली होती. ती यादी दिली. इतर काय घडामोडी सुरु आहेत, किंवा मुख्यमंत्री काय बोलले? हे माहित नाही. नगरसेवकांनी पक्ष सोडताना आपणाशी चर्चा केलेली नाही. पक्षांतराचे कारण सांगता येणार नाही.           - शशिकांत गाडे, दक्षिण जिल्हा प्रमुख, शिवसेना.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरParnerपारनेरPoliticsराजकारण