शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
3
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
4
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
5
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
6
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
7
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
8
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
9
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
10
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
11
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
12
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
13
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
14
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
15
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
16
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
17
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
18
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
19
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
20
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका

नगरमधून ‘चिऊताई’ गायब!

By admin | Updated: January 31, 2016 23:31 IST

अहमदनगर : ज्या चिऊताईबद्दल बालगीते व बालकथांमधून भरभरुन ऐकवले जाते, ती चिऊताई म्हणजेच चिमणी, ऐतिहासिक नगर शहरातून आता गायब झाली आहे.

अहमदनगर : ज्या चिऊताईबद्दल बालगीते व बालकथांमधून भरभरुन ऐकवले जाते, ती चिऊताई म्हणजेच चिमणी, ऐतिहासिक नगर शहरातून आता गायब झाली आहे. आज झालेल्या पक्षी निरीक्षणात एकाही चिमणीची नोंद झाली नसून इतर २२ जातींच्या १५१ पक्ष्यांची नोंद झालेली असताना चिऊताई मात्र शहरातून हरवली आहे. कधीकाळी चिमण्यांच्या चिवचिवाटाने माणसांना जाग येत. आता तीच गायब होत आहे.नगरमधील पक्षीतज्ज्ञ डॉ. सुधाकर कुऱ्हाडे यांनी काही पक्षी मित्रांसमवेत निसर्ग मित्र मंडळाची स्थापना केली आहे. या मंडळाच्यावतीने कापूरवाडी तलाव किंवा पिंपळगाव माळवी तलाव या परिसरात दरवर्षी पक्षीगणना करण्यात येते. यात विविध पक्षी तज्ज्ञ व अभ्यासक हजेरी लावतात. मात्र, गेल्या काही वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी होत गेल्याने या मंडळाच्यावतीने गेल्या चार वर्षांपासून भुईकोट किल्ला परिसरात पक्षीगणना व त्यांची नोंद घेतली जाते. डॉ. सुधाकर कुऱ्हाडे यांच्यासह पक्षी अभ्यासक बाळासाहेब कुलकर्णी, विजय देवचक्के, प्रा. अविनाश अडसुरे यांनी आज सकाळी ८ ते १० या वेळेत संपूर्ण किल्ला परिसरात पक्षीगणना केली. यात २२ जातींच्या पक्ष्यांची नोंद करण्यात आली. १५१ पक्षी किल्ला परिसरात आढळून आले. चिमणी मात्र दिसली नाही. किल्ला परिसरात इतर ठिकाणी अभावाने आढळून येणाऱ्या पक्ष्यांचे अस्तित्व असताना चिमणी मात्र गायब झाल्याचे दिसून आले.आज झालेल्या पक्षी निरीक्षणात राखीपीट, सुबग, तितर यांचीही नोंद प्रथमच किल्ला परिसरात घेण्यात आली. याचबरोबर खंड्या, कोकीळ, वेडा राघु, टिटवी, लहान बगळे, कोतवाल, किडक, बुलबुल, मैना, बारवे, घार, होले, पोपट यांसारख्या आकर्षक व रंगीबेरंगी पक्ष्यांची किल्ला परिसरात नोंद घेण्यात आली. पक्षीगणनेचे हे चौथे वर्ष होते.(प्रतिनिधी)आम्ही सलग चार वर्षांपासून किल्ला परिसरात पक्षीगणना करतो. पण एकदाही चिमणी आम्हास दिसली नाही. यामुळे सर्वत्र दिसणारी चिमणी शहरातून दिसेनाशी झाल्याने चिंतेचा विषय आहे.-डॉ. सुधाकर कुऱ्हाडे, पक्षी अभ्यासक.