शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिवांना कतरमध्ये काश्मीरी वेटर भेटला; 'ट्रम्पना थँक्यू सांगा' म्हटला...
2
गुरुवारी सायंकाळी तुर्की तर पहाटे हादरला चीन; पाकिस्ताननंतर त्याला साथ देणाऱ्या देशांना भूकंपाचे धक्के
3
चिदंबरम थरूर यांच्या मार्गावर! आधी युद्धविरामवर मोदी सरकारला पाठिंबा; आता इंडिया आघाडीबाबत सवाल उपस्थित
4
मुंबई एअरपोर्टवरुन प्रवास करणाऱ्यांना आता अधिक खर्च करावा लागणार; 'या' शुल्कात मोठी वाढ, किती पैसे द्यावे लागणार?
5
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
6
SBI मध्ये ₹५ लाख जमा केल्यावर मिळेल ₹२ लाखांपेक्षा अधिक व्याज; पाहा १,२,३ आणि ५ वर्षांचं कॅलक्युलेशन
7
भारतात तुर्की अन् अझरबैजानवरील बहिष्काराला वेग; ३० टक्के भारतीय पर्यटकांनी बुकिंग रद्द केले
8
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
9
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
10
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
11
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
12
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
13
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
14
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
15
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
16
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
17
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
18
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
19
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
20
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान

बुद्धीसह आत्म्यात होतो बदल

By admin | Updated: July 21, 2016 23:57 IST

राहाता: वीणा वाजवण्या करीता ज्याप्रमाणे तारा समतोल असाव्या लागतात, त्याप्रमाणे जीवनासाठी समतोल आहार आवश्यक आहे़

राहाता: वीणा वाजवण्या करीता ज्याप्रमाणे तारा समतोल असाव्या लागतात, त्याप्रमाणे जीवनासाठी समतोल आहार आवश्यक आहे़ शरीर व मनाने समतोल राखला तर आत्म्याचा शोध घेता येतो़ मन परिवर्तनाचा बुध्दीला व आत्म्याला बदलवणारा संस्काराचा हा चतुर्मास असल्याचे मत साध्वी प्रीतिसुधाजी म़सा़ यांनी व्यक्त केले़राहाता येथे साध्वी प्रीतिसुधाजी शैक्षणिक संकुलात आयोजित ज्ञान संस्कार चतुर्मास निमित्त त्या बोलत होत्या़ प्रवचन देताना पुढे त्या म्हणाल्या, तत्वशून्य राजकारण, श्रमशून्य सम्पत्ती, चरित्र शून्य जीवन व मानवताशून्य विज्ञान या मुळे अनागोंदी व अनास्था निर्माण होते़ जीवनात पहिले सुख निरोगी काया आहे़ घरात माया असेल तर घरातील नारी सुशिल होते़ आज्ञाकारी गृहिणीमुळे घरात स्वर्गा सारखी शांतता निर्माण होते़अत्यंत खादाडपणा हे असंस्कृत पणाचे लक्षण आहे़ अन्नातून ऊर्जा, ऊर्जेतून बुध्दी व बुध्दीतून ध्येय प्राप्ती मिळते़ आहार साधा व सकस हवा़ स्वास्थ सांभाळणे बुध्दीवंताचे लक्षण आहे़ निसर्गाने आपल्याला भरपूर दिले आहे़ त्या मुळे आपण खूप श्रीमंत आहोत़ संस्कार बाजारात विकत मिळत नाही तर ते घडवून घ्यावे लागतात़लोखंडाचा तुकडा लोहाराकडे नेला व त्याची घोड्याची नाल बनवली तर त्याचे बाजारात हजार रुपये येतात, तोच तुकडा कारखानदाराकडे दिला तर त्याच्या सुया बनवून त्याची किंमत पाच हजार रुपये होते, तोच तुकडा घड्याळ कंपनीच्या मालकाकडे दिला तर त्याची किंमत २५ हजार रुपये होते, या प्रमाणे माणसावर संस्कार झाले तर मनुष्य अनमोल बनतो़ असा उपदेश साध्वी प्रीतिसुधाजी यांनी केला़ पुणे येथील सुभाषराव पिपाडा, शिर्डीचे संघपती पृथ्वीराज लोढा, ललिताताई बांठीया, लुधियाना येथील गणेशभाई, अंमळनेर येथील पाटील या सर्वांचे प्रीतिसुधाजी संकुलाचे अध्यक्ष इंद्रभान डांगे, प्राचार्य ज्ञानेश डांगे, पुनम डांगे, भगवान डांगे यांनी स्वागत केले. राजेश भन्साळी, बाबुशेठ पिपाडा, रमेश सांड, प्रविण जैन यांच्यासह जैन अजैन श्रावक उपस्थित होते .(वार्ताहर)