शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
2
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
3
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
4
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
5
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
6
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
7
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
8
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
9
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
10
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
11
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
12
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
13
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
14
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
15
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
16
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
17
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
18
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
19
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
20
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...

बुद्धीसह आत्म्यात होतो बदल

By admin | Updated: July 21, 2016 23:57 IST

राहाता: वीणा वाजवण्या करीता ज्याप्रमाणे तारा समतोल असाव्या लागतात, त्याप्रमाणे जीवनासाठी समतोल आहार आवश्यक आहे़

राहाता: वीणा वाजवण्या करीता ज्याप्रमाणे तारा समतोल असाव्या लागतात, त्याप्रमाणे जीवनासाठी समतोल आहार आवश्यक आहे़ शरीर व मनाने समतोल राखला तर आत्म्याचा शोध घेता येतो़ मन परिवर्तनाचा बुध्दीला व आत्म्याला बदलवणारा संस्काराचा हा चतुर्मास असल्याचे मत साध्वी प्रीतिसुधाजी म़सा़ यांनी व्यक्त केले़राहाता येथे साध्वी प्रीतिसुधाजी शैक्षणिक संकुलात आयोजित ज्ञान संस्कार चतुर्मास निमित्त त्या बोलत होत्या़ प्रवचन देताना पुढे त्या म्हणाल्या, तत्वशून्य राजकारण, श्रमशून्य सम्पत्ती, चरित्र शून्य जीवन व मानवताशून्य विज्ञान या मुळे अनागोंदी व अनास्था निर्माण होते़ जीवनात पहिले सुख निरोगी काया आहे़ घरात माया असेल तर घरातील नारी सुशिल होते़ आज्ञाकारी गृहिणीमुळे घरात स्वर्गा सारखी शांतता निर्माण होते़अत्यंत खादाडपणा हे असंस्कृत पणाचे लक्षण आहे़ अन्नातून ऊर्जा, ऊर्जेतून बुध्दी व बुध्दीतून ध्येय प्राप्ती मिळते़ आहार साधा व सकस हवा़ स्वास्थ सांभाळणे बुध्दीवंताचे लक्षण आहे़ निसर्गाने आपल्याला भरपूर दिले आहे़ त्या मुळे आपण खूप श्रीमंत आहोत़ संस्कार बाजारात विकत मिळत नाही तर ते घडवून घ्यावे लागतात़लोखंडाचा तुकडा लोहाराकडे नेला व त्याची घोड्याची नाल बनवली तर त्याचे बाजारात हजार रुपये येतात, तोच तुकडा कारखानदाराकडे दिला तर त्याच्या सुया बनवून त्याची किंमत पाच हजार रुपये होते, तोच तुकडा घड्याळ कंपनीच्या मालकाकडे दिला तर त्याची किंमत २५ हजार रुपये होते, या प्रमाणे माणसावर संस्कार झाले तर मनुष्य अनमोल बनतो़ असा उपदेश साध्वी प्रीतिसुधाजी यांनी केला़ पुणे येथील सुभाषराव पिपाडा, शिर्डीचे संघपती पृथ्वीराज लोढा, ललिताताई बांठीया, लुधियाना येथील गणेशभाई, अंमळनेर येथील पाटील या सर्वांचे प्रीतिसुधाजी संकुलाचे अध्यक्ष इंद्रभान डांगे, प्राचार्य ज्ञानेश डांगे, पुनम डांगे, भगवान डांगे यांनी स्वागत केले. राजेश भन्साळी, बाबुशेठ पिपाडा, रमेश सांड, प्रविण जैन यांच्यासह जैन अजैन श्रावक उपस्थित होते .(वार्ताहर)