शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

मालमत्ता कर वसुलीस श्रीरामपूर न्यायालयात आव्हान

By admin | Updated: April 8, 2017 18:22 IST

नगरपालिका व महानगरपालिकांचे मालमत्ता कर आकराणीचे अधिकार काढून यासाठी महाराष्ट्र नगरपालिका कर मंडळ स्थापन करुन मूल्य आधारित करप्रणाली सुरु केली.

आॅनलाईन लोकमतरमेश कोठारी / श्रीरामपूर (अहमदनगर), दि़ ८- महाराष्ट्र शासनाने राज्यातील नगरपालिका व महानगरपालिकांचे मालमत्ता कर आकराणीचे अधिकार काढून यासाठी महाराष्ट्र नगरपालिका कर मंडळ (म्युनिसिपल टॅक्स बोर्ड) स्थापन करुन मूल्य आधारित करप्रणाली सुरु केली. त्यामुळे मालमत्ताधारकांच्या करात मोठी वाढ झाली आहे. या कायद्यास श्रीरामपूर न्यायालयात जनहित याचिका दाखल करुन आव्हान देण्यात आले आहे. श्रीरामपूरचे मालमत्ताधारक समित मुथा, शांतीलाल पोरवाल, अशोक कोठारी, ज्ञानदेव रोडे यांच्या वतीने अ‍ॅड. सुभाष कोठारी यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यात जिल्हाधिकारी, श्रीरामपूर पालिकेचे प्राधिकृत मुख्य निर्धारण अधिकारी, नगररचना लवाद आदींना प्रतिवादी केले आहे.याचिकाकर्त्यांचे वकील सुभाष कोठारी यांंनी याबाबत सांगितले की, १३ व्या वित्त आयोगाने मूल्य आधारित करप्रणाली अंमलात आणण्यासाठी महाराष्ट्र मुनिसिपल प्रॉपर्टी टॅक्स बोर्ड अ‍ॅक्ट अजून मंजूर करुन घेतले नसल्याने राज्य सरकारला मिळणारे सुमारे ११०० कोटींचे अनुदान मिळू शकणार नाही, असे तेराव्या वित्त आयोगाने निदर्शनास आणले आहे. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने राज्यात नगरपालिका व महापालिका क्षेत्रात मूल्य आधारित करप्रणाली लागू करण्यासाठी व त्यात सारखेपणा येण्यासाठी महाराष्ट्र म्युन्सिपल प्रॉपर्टी टॅक्स बोर्ड अ‍ॅक्ट २०११ विधानसभेत मंजूर केले. त्यास राज्यपालांची मंजुरी मिळवून अनुदानाचे सुमारे ११०० कोटी रुपये मिळविले. यामुळे नगरपालिका, महापालिकांचे अ‍ॅसेसमेंट व रिव्हिजन करुन रेंटेबल व्हॅल्यू निश्चित करण्याचे अधिकार संपुष्टात येऊन टॅक्स बोर्डला अधिकार प्राप्त झाले आहेत.सन २०११ नंतर महाराष्ट्रातील महापालिका, नगरपालिका यांनी मालमत्तांचे केलेले असेसमेंट रिव्हिजन करुन मालमत्ता कराची बिले ही मुळातच अधिकार नसतांना तयार केलेली असल्याने ती बेकायदेशीर आहेत. बेकायदेशीर कर बिलाची मागणी जनतेकडून करण्याचा पालिका व महानगरपालिकांना नगरपालिका अधिकार नाही. या निर्णयाविरुद्ध श्रीरामपूर शहरातील स्थावर मिळकतधारकांच्या वतीने श्रीरामपूरच्या दिवाणी न्यायालयात याचिका दाखल करुन नगरपालिकेच्या अधिकार क्षेत्राबाहेर जाऊन बळजबरीने सुरु केलेल्या मालमत्ता कर वसुलीस न्यायालयात आव्हान दिले आहे.मालमत्ता कर धारकांवर होत असलेल्या अन्यायास वाचा फोडण्यासाठी श्रीरामपूर शहरातील मालमत्ताधारकांनी मालमत्ता कराबाबत न्यायालयात २० एप्रिलपर्यंत या याचिकेत सहभागी होऊन हरकती नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.