शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
3
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
4
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
5
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
6
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
7
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
8
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
9
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
10
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
11
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
12
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
13
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
14
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
15
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
16
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
17
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
18
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
19
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
20
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."

नव्या पदाधिकाऱ्यांपुढे कारभार चालविण्याचे आव्हान

By admin | Updated: October 5, 2014 23:55 IST

अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि दोन विषय समित्यांच्या पदाधिकाऱ्यांची निवड झाली आहे.

अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि दोन विषय समित्यांच्या पदाधिकाऱ्यांची निवड झाली आहे. उर्वरित दोन सभापतींचीही निवड झाली असून त्यांच्या वाट्याला येणाऱ्या समित्यांची अधिकृत घोषणा बाकी आहे. या नवीन पदाधिकाऱ्यांत उपाध्यक्ष अण्णा शेलार वगळता अन्य पदाधिकारी हे नवखे आहेत. यामुळे त्यांच्या पुढे पुढील अडीच वर्षे जिल्हा परिषदेचा गाडा चालविण्याचे आवाहन आहे.जिल्हा परिषद अध्यक्ष मंजुषा गुंड ह्या पहिल्यांदा जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आलेल्या असून पहिल्याच संधीत त्यांना अध्यक्ष होण्याचा मान मिळालेला आहे. यापूर्वीच्या अडीच वर्षात त्यांनी जिल्हा परिषदेच्या सभागृहात क्वचित प्रश्नांवर चर्चा केलेली आहे. या परिस्थितीत त्यांना आता जिल्हा परिषदेत त्यांना अध्यक्षांची खडतर भूमिका बजवावी लागणार आहे. अन्य वेळी ज्येष्ठ सदस्य, प्रतोद यांच्याशी सल्ला-मसलत करून निर्णय घेता येतात. मात्र, सभागृहात व्यासपीठावर बसून सर्व बाजुंचा विचार करून त्यांना निर्णय घ्यावे लागणार आहेत. हा काळ त्यांच्यासाठी खडतर ठरणार आहे. उपाध्यक्ष शेलार यांना उपाध्यक्षपदाचा अनुभव आहे. यामुळे त्यांची अडचण राहणार नाही. मात्र, अध्यक्ष गुंड यांना सोबत घेऊन काम करावे लागणार आहे. याशिवाय त्यांच्याकडे शिक्षण आणि आरोग्य हे दोन मोठे विभाग असून त्यांच्या कामकाजात सुधारणा करण्यासोबतच या विभागांना पुढे नेण्याचे काम करावे लागणार आहे.चारही विषय समितीचे सभापती हे नवखे आहेत. यात नंदा वारे, मीना चकोर, बाबासाहेब दिघे आणि शरद नवले यांचा समावेश आहे. गत अडीच वर्षात जिल्हा परिषदेच्या सभागृहात नवले, दिघे आणि चकोर चर्चा करताना दिसले. वारे यांच्याकडे महिला बालकल्याण सारखा मोठा विभाग असून यात अंगणवाड्या, गरोदर माता, स्त्री जन्मदर आणि कुपोषण मुक्ती या कार्यक्रमांकडे लक्ष द्यावे लागणार आहे. (प्रतिनिधी)