शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

श्रीगोंदा तालुक्यातील ‘कुकडी’च्या चारीची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 13:53 IST

श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव, तांदळी दुमाला, घुगलवडगाव, देऊळगाव, घोडेगाव आणि परिसरातील सुमारे पाच हजार हेक्टर क्षेत्राला कुकडीचे पाणी देणारी चारी क्रमांक १२ ची दुरवस्था झाल्यामुळे हक्काच्या पाण्यापासून शेतकरी वंचित आहेत.

ठळक मुद्देशेतकरी पाण्यापासून वंचितलाखो रुपयांचा खर्च वायाचारी दुरुस्तीचा केवळ देखावा

शरद शिंदेआढळगाव : श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव, तांदळी दुमाला, घुगलवडगाव, देऊळगाव, घोडेगाव आणि परिसरातील सुमारे पाच हजार हेक्टर क्षेत्राला कुकडीचे पाणी देणारी चारी क्रमांक १२ ची दुरवस्था झाल्यामुळे हक्काच्या पाण्यापासून शेतकरी वंचित आहेत. चारीच्या दुरवस्थेमुळे पूर्ण क्षमतेने पाणी मिळण्यास अडथळा येत आहे. दीड वर्षांपूर्वी चारी दुरुस्ती केल्याचा फक्त देखावा केला आहे. त्यामुळे दुरुस्तीसाठी झालेला खर्च वाया गेला आहे.

परिसराला वरदान ठरलेले कुकडीचे पाटपाणी सहजासहजी मिळणे दुरापास्त झाले असून त्याची कारणे अनेक आहेत. परंतु, मुख्य कालव्यापासून पूर्ण क्षमतेने शेतकऱ्याच्या जमिनीपर्यंत पाणी देण्यासाठी आवश्यक असलेल्या चा-यांची दुरवस्था हे सुद्धा एक महत्वाचे कारण आहे. सुमारे सोळा किलोमीटर लांबी असलेली चारी क्रमांक १२ ही दगडी बांधकाम असलेली तालुक्यातील एकमेव चारी आहे. बांधकाम करतेवेळी योग्य पध्दतीने केले नाही. त्यामुळे चारीची रुंदी कमी झाली. सध्या ठिकठिकाणी चारीचे बांधकाम कोसळले असून चारीची रुंदी आणखी कमी झाली आहे. त्यामुळे पूर्ण दाबाने पाणी सोडले तरी पाणी मिळत नाही. आवर्तनाचा ‘हेड टू टेल’ असा नियम असूनही या चारीवर मुख्य कालव्यापासून सात किलोमीटरच्या पुढे पाणी जातच नाही. त्यामुळे शेवटच्या शेतकºयांपर्यंत पाणी मिळत नाही. या चारीच्या दुरुस्तीसाठी दीड वर्षापूर्वी निधी आला. काही ठिकाणी केलेल्या डागडुजीच्या कामाचा दर्जा पहिल्याच आवर्तनात उघड झाला. नव्याने केलेल्या या काँक्रिटीकरणाला अनेक ठिकाणी तडे गेले असून काँक्रिटीकरणाच्या मजबुतीसाठी मातीचा भराव टाकण्याचा विसर काम करताना पडला असल्याचे दिसत आहे. पाण्याचा दाब वाढल्यास चारी फुटून शेतीचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे शेतक-यांनी चारी दुरुस्तीची मागणी केली आहे.दुरुस्ती आवश्यकदीड वषार्पूर्वी खर्च झालेल्या निधीबद्दल माहिती नसून माझ्या कार्यकाळात निधी आला नाही. परंतु, चारीचे मजबुतीकरण आणि रुंदीकरण करणे आवश्यक असल्याचे शाखा अभियंता रमेश इथापे यांनी सांगितले. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदा