शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
3
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
4
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
5
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
6
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
7
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
8
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
9
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
10
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
11
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
12
बदल्याची आग! तरुणाने नकार देताच 'ती' संतापली, ११ राज्यांमधील शाळांना दिली बॉम्बची धमकी
13
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
14
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
15
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
16
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
17
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
18
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
19
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
20
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार

तळेगाव चौफुलीवर चक्काजाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:22 IST

तळेगाव दिघे : खंडित वीजपुरवठ्यामुळे शेती पिकांना पाणी देणे मुश्कील झाल्याने, संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील संतप्त शेतकऱ्यांनी सोमवारी ...

तळेगाव दिघे : खंडित वीजपुरवठ्यामुळे शेती पिकांना पाणी देणे मुश्कील झाल्याने, संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील संतप्त शेतकऱ्यांनी सोमवारी (दि. ८) तळेगाव चौफुलीवर एक तास रास्ता रोको आंदोलन छेडले. या रास्ता रोकोमुळे रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागल्याने वाहतूक ठप्प झाली होती.

तळेगाव दिघे येथे शेतीसाठी दोन दिवसांतून केवळ आठ तासच वीजपुरवठा केला जातो. त्यामुळे पाण्याअभावी शेतातील उभी पिके जळून चालली आहेत. पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना रात्री अपरात्री शेतास पाणी भरण्यासाठी जावे लागते. त्यामुळे तळेगाव दिघे येथील शेतकरी आक्रमक व संतप्त झाले. या प्रश्नी आंदोलनाचे निवेदन देऊनही वीजपुरवठा सुरळीत न केल्याने संतप्त शेतकऱ्यांनी सोमवारी तळेगाव दिघे येथील चौफुलीवर रास्तारोको आंदोलन छेडले.

या आंदोलनात माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर कांदळकर, सरपंच बाबासाहेब कांदळकर, उपसरपंच रमेश दिघे, सचिन दिघे, अमोल बाळासाहेब दिघे, तात्यासाहेब दिघे, मच्छिंद्र दिघे, पंढरीनाथ इल्हे, गणेश दिघे, विकास गुरव, रवींद्र दिघे, पोपट दिघे, नामदेव दिघे, शिवाजी दिघे, गणपत दिघे, इसाक शेख, गोविंद कांदळकर, बापूसाहेब दिघे, संतोष डांगे, नवनाथ दिघे, बाळासाहेब दिघे, भानुदास दिघे, साहेबराव दिघे, शिवाजी सुपेकर, सीताराम दिघे, दगुभाई शेख, उत्तम दिघे, सुनील दिघे सहित पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

वीज वितरण कंपनीचे अधिकारी जाधव यांनी वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर, शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना मागणीचे निवेदन दिल्यानंतर रास्तारोको आंदोलन मागे घेण्यात आले. शेतीसाठी वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता, पुन्हा रास्तारोको आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा उपसरपंच रमेश दिघे यांनी यावेळी दिला.

....

वाहतूक ठप्प, वाहनांच्या रांगा

आंदोलनप्रसंगी संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. या रास्तारोको आंदोलनामुळे संगमनेर ते कोपरगाव व लोणी ते नांदूरशिंगोटे रस्त्यावरील वाहतूक तळेगाव दिघे चौफुलीदरम्यान ठप्प झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे प्रवासी व वाहनधारकांची मोठी गैरसोय झाली.