शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
3
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
4
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
5
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
6
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
7
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
8
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
9
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
10
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
11
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
12
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
13
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
14
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
15
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
16
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
17
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
18
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
19
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
20
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी

केंद्र सरकारने केली शेतकऱ्यांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:04 IST

श्रीरामपूर : बहुमताच्या जोरावर विरोधी पक्षाला न जुमानता शेतकऱ्यांविरुद्ध तीन कायदे पारित करून भांडवलदारांना आर्थिक फायदा पोहोचविण्याचा केंद्र सरकारचा ...

श्रीरामपूर : बहुमताच्या जोरावर विरोधी पक्षाला न जुमानता शेतकऱ्यांविरुद्ध तीन कायदे पारित करून भांडवलदारांना आर्थिक फायदा पोहोचविण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे, अशी टीका आमदार लहू कानडे यांनी केली.

येथील महात्मा गांधी पुतळ्याजवळ आम आदमी पक्षाच्यावतीने दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी आमदार कानडे यांनी सरकारवर गंभीर आरोप केले. यावेळी आपचे जिल्हाध्यक्ष तिलक डुंगरवाल, तालुका अध्यक्ष विकास डेंगळे उपस्थित होते. तत्पूर्वी माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, सचिन गुजर, नागेश सावंत, सचिन बडदे, डॉ.महेश क्षीरसागर, योगेश बोर्डे, ज्ञानेश्वर मुरकुटे आदींनी भेट देऊन शेतकऱ्यांना अभिवादन केले.

आमदार कानडे म्हणाले, ‘‘केंद्राकडून शेतकऱ्यांचा कळवळा असल्याचा भास निर्माण केला जातो. बाजारपेठेचे स्वातंत्र्य मिळून अधिक भाव मिळेल, असे सांगितले जाते; मात्र शेतकऱ्यांना सरकारने फसविले आहे, हे लक्षात आल्याने अनेक संघटना एकत्र येऊन आंदोलन उभे राहिले. हे कायदे मागे घ्यावेत, यासाठी राजधानीमध्ये शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू झाले; मात्र त्यांच्यावर अश्रुधुराचा मारा करण्यात आला. आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न झाला. धमकावण्याचे प्रकार घडले; मात्र तरीही शेतकरी आंदोलनावर ठाम राहिले.’’

यावेळी राजेंद्र भोसले, शेतकरी संघटनेचे अहमद जागीरदार, यासीन सय्यद, नगरसेवक मुक्तार शहा, माजी नगरसेवक राजेंद्र सोनवणे, वंचित बहुजन आघाडीचे चरण त्रिभुवन, छावाचे नितीन पठारे, जोएफ जमादार, रियाज पठाण, अमरप्रीत सिंग, जीवन सुरडे, लहुजी सेनेचे हनीफ पठाण आदींनी अभिवादन केले.

----------

फोटो : ०४श्रीरामपूर कानडे अभिवादन

....

ओळी-दिल्लीतील आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांना अभिवादन करताना आमदार लहू कानडे, तिलक डुंगरवाल आदी.

----------