शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

केंद्र सरकारने केली शेतकऱ्यांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:04 IST

श्रीरामपूर : बहुमताच्या जोरावर विरोधी पक्षाला न जुमानता शेतकऱ्यांविरुद्ध तीन कायदे पारित करून भांडवलदारांना आर्थिक फायदा पोहोचविण्याचा केंद्र सरकारचा ...

श्रीरामपूर : बहुमताच्या जोरावर विरोधी पक्षाला न जुमानता शेतकऱ्यांविरुद्ध तीन कायदे पारित करून भांडवलदारांना आर्थिक फायदा पोहोचविण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे, अशी टीका आमदार लहू कानडे यांनी केली.

येथील महात्मा गांधी पुतळ्याजवळ आम आदमी पक्षाच्यावतीने दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी आमदार कानडे यांनी सरकारवर गंभीर आरोप केले. यावेळी आपचे जिल्हाध्यक्ष तिलक डुंगरवाल, तालुका अध्यक्ष विकास डेंगळे उपस्थित होते. तत्पूर्वी माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, सचिन गुजर, नागेश सावंत, सचिन बडदे, डॉ.महेश क्षीरसागर, योगेश बोर्डे, ज्ञानेश्वर मुरकुटे आदींनी भेट देऊन शेतकऱ्यांना अभिवादन केले.

आमदार कानडे म्हणाले, ‘‘केंद्राकडून शेतकऱ्यांचा कळवळा असल्याचा भास निर्माण केला जातो. बाजारपेठेचे स्वातंत्र्य मिळून अधिक भाव मिळेल, असे सांगितले जाते; मात्र शेतकऱ्यांना सरकारने फसविले आहे, हे लक्षात आल्याने अनेक संघटना एकत्र येऊन आंदोलन उभे राहिले. हे कायदे मागे घ्यावेत, यासाठी राजधानीमध्ये शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू झाले; मात्र त्यांच्यावर अश्रुधुराचा मारा करण्यात आला. आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न झाला. धमकावण्याचे प्रकार घडले; मात्र तरीही शेतकरी आंदोलनावर ठाम राहिले.’’

यावेळी राजेंद्र भोसले, शेतकरी संघटनेचे अहमद जागीरदार, यासीन सय्यद, नगरसेवक मुक्तार शहा, माजी नगरसेवक राजेंद्र सोनवणे, वंचित बहुजन आघाडीचे चरण त्रिभुवन, छावाचे नितीन पठारे, जोएफ जमादार, रियाज पठाण, अमरप्रीत सिंग, जीवन सुरडे, लहुजी सेनेचे हनीफ पठाण आदींनी अभिवादन केले.

----------

फोटो : ०४श्रीरामपूर कानडे अभिवादन

....

ओळी-दिल्लीतील आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांना अभिवादन करताना आमदार लहू कानडे, तिलक डुंगरवाल आदी.

----------