शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

सोमैया महाविद्यालयास केंद्र शासनाचा पुरस्कार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:21 IST

कोपरगाव : भारत सरकारच्या उच्च शिक्षण मंत्रालय व केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयअंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण शिक्षण परिषद द्वारा ...

कोपरगाव : भारत सरकारच्या उच्च शिक्षण मंत्रालय व केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयअंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण शिक्षण परिषद द्वारा आयोजित 'एक जिल्हा एक हरित विजेता महाविद्यालय' या स्वच्छता कृती आराखड्यानुसार स्वच्छता रँकिंग पुरस्कार नुकतेच घोषित करण्यात आले. यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातून कोपरगाव येथील के. जे. सोमैया कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय एकमेव विजेते ठरले आहे.

महाविद्यालय परिसरातील स्वच्छता, स्वच्छतेसाठी केले जाणारे प्रयत्न, जलसंवर्धनासाठी केलेल्या उपाययोजना, घनकचरा व्यवस्थापन, सौरऊर्जा प्रकल्प व त्याचा वापर, हरित संवर्धनासाठी केलेल्या उपाययोजना, सांडपाणी व्यवस्थापन या निकषांच्या आधारे के. जे. सोमैया महाविद्यालय जिल्ह्यात अव्वल ठरले असल्याची माहिती प्राचार्य डॉ. बी.एस. यादव यांनी दिली आहे.

यादव म्हणाले, महाविद्यालयात विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या विविध समित्या स्थापन करून केंद्र व राज्य सरकारच्या सर्व योजनांची अंमलबजावणी नियमित केली जाते. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दिन महाविद्यालयात विविध विभागांमार्फत उपक्रम राबवून साजरे केले जातात. महाविद्यालयातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून महाविद्यालयाच्या शेजारून वाहणार्‍या गोदावरी नदीकाठी असलेल्या वृक्षांना दिले जाते. महाविद्यालय व स्थानिक गोदामाई प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने नदी किनारी 'अंबिका बन' निर्माण केले आहे. या उपक्रमाचे कौतुक जलतज्ज्ञ राजेंद्र सिंग यांनी स्वतः कार्यस्थळी येऊन केले होते. पावसाचे वाहून जाणारे पाणी साठविण्यासाठी महाविद्यालयात ४ लाख लीटर क्षमतेच्या टाक्या उभारल्या आहेत.

महाविद्यालयाच्या या अहवाल समितीचे सदस्य म्हणून उपप्राचार्य डॉ. संतोष पगारे, एन. एस. एस. जिल्हा समन्वयक प्रा. शैलेंद्र बनसोडे, एन. एस. एस.चे कार्यक्रम अधिकारी प्रा. बी. एस. गायकवाड, बी. बी. ए. विभागप्रमुख प्रशांत भदाने, कार्यालय अधीक्षक डॉ. अभिजित नाईकवाडे व विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. संजय दवंगे, संजय पाचोरे यांनी काम पाहिले. या यशाबाबत कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे, सचिव संजीव कुलकर्णी, व्यवस्थापन सदस्य संदीप रोहमारे यांनी महाविद्यालयातील सर्वांचे कौतुक केले आहे.