शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
3
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
4
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
5
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
6
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
7
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
8
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
9
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
10
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
11
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
12
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
13
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
14
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
15
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
16
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
17
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
18
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
19
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
20
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!

मखदूम सोसायटीच्या वतीने मिर्जा गालिब जयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:17 IST

शायर हा आपल्या शायरीतून फक्त प्रेम, शराब, मैखाना अशाच गोष्टींचा ऊहापोह करतो, हा जनसामान्यांचा समज आहे. आजच नाही तर ...

शायर हा आपल्या शायरीतून फक्त प्रेम, शराब, मैखाना अशाच गोष्टींचा ऊहापोह करतो, हा जनसामान्यांचा समज आहे. आजच नाही तर जुन्या काळापासून आपण अभ्यास केला, तर सर्व शायरांनी मनुष्याच्या जीवनात घडणाऱ्या व समाजात घडणाऱ्या घडामोडींवरील भाष्य आपल्या कवितेतून मांडले आहे. मिर्जा गालिब यांच्याबाबत विचार केला, तर त्यांनी स्वतंत्र्यपूर्ण काळात देशातील स्थितीवर, लोकांच्या समस्यांवर शायरी केली; पण लोकांनी त्यांच्या फक्त प्यार, मोहब्बत, शराबच्या शायरीलाच जास्त पसंत केल्यामुळे त्यांच्याकडे त्याच दृष्टिकोनातून पाहण्यात येऊ लागले. खरं तर मिर्जा गालिब यांनी जीवनातील प्रत्येक बाबीवर आपल्या कवितेच्या माध्यमातून वास्तव मांडले आहे, असे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदेच्या सहसचिव उर्दू कवयित्री डॉ. कमर सुरूर यांनी केले.

मखदुम सोसायटी व अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदेच्या वतीने मिर्जा गालिब यांच्या जयंतीनिमित्त गोविंदपुरा येथील मखदुम कार्यालयात शेरीनशिस्तचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून डॉ. कमर सुरूर बोलत होत्या. प्रमुख पाहुणे म्हूणन उर्दू कवयित्री नफिसा हया होत्या. या नशिस्तमध्ये डॉ. कमर सुरूर, सलीम यावर, नफिसा हया यांनी आपल्या शायरी सादर केल्या. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन आबीद दुलेखान यांनी मानले.