शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

कत्तलीच्या उद्देशाने डोंगराच्या पायथ्याशी बांधली गोवंशीय जनावरे!

By शेखर पानसरे | Updated: June 28, 2023 14:15 IST

पावसामुळे चिखल झाल्याने तेथून जनावरांना बाहेर काढणे अवघड काम होते.

संगमनेर : कत्तलीच्या उद्देशाने डोंगराच्या पायथ्याशी गोवंशीय जनावरे बांधली होती. याबाबत माहिती मिळाल्यानंतर विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तेथे पोहोचले. त्या संदर्भात पोलिसांना कळविण्यात आले. निदर्यतेने बांधलेल्या ३२ गोवंशीय जनावरांना जीवदान मिळाले असून मंगळवारी (दि.२७) दुपारी दीड वाजेच्या सुमारास सुरू झालेली कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या प्रकरणी बुधवारी (दि.२८) संगमनेर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

संगमनेर तालुक्यातील खांजापूर शिवारात कत्तलीच्या उद्देशाने डोंगराच्या पायथ्याशी मोठ्या संख्येने गोवंशीय जनावरे बांधली असल्याची माहिती विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांना मिळाली. पाऊस झाल्याने जनावरे बांधलेल्या ठिकाणापर्यंत जाण्यासाठी चांगला रस्ता नव्हता. अडगळीत जनावरे बांधलेल्या ठिकाणी पदाधिकारी, कार्यकर्ते पोहोचले. याबाबत पोलिसांना माहिती दिल्यानंतर संगमनेर शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगवान मथुरे, सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र पवार, पोलिस उपनिरीक्षक निवांत जाधव हे पोलिस कर्मचाऱ्यांसह तेथे पोहोचले. 

पावसामुळे चिखल झाल्याने तेथून जनावरांना बाहेर काढणे अवघड काम होते. पिकअप वाहनांमधून गोवंशीय जनावरांना गोशाळेत नेण्यात आले. तसेच पोलिसांनी दोन दुचाकी वाहने देखील जप्त केली आहेत. या प्रकरणी पोलिस हेड कॉस्टेबल रामकिसन मुकरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस हेड कॉस्टेबल पारधी अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Sangamnerसंगमनेर