शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

बिबट्या देतोय पिंज-याला हुलकावणी;  शेतक-यांना धास्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 16:17 IST

कोल्हार व भगवतीपूर परिसरात वनखात्याने लावलेल्या पिंज-यात बिबट्या जेरबंद होणे मुश्किल झाले आहे. पिंज-यात बिबट्याचे भक्ष्य ठेवूनही चतुर बिबटे पिंज-याला हुलकावणी देत आहेत.

कोल्हार  : कोल्हार व भगवतीपूर परिसरात वनखात्याने लावलेल्या पिंज-यात बिबट्या जेरबंद होणे मुश्किल झाले आहे. पिंज-यात बिबट्याचे भक्ष्य ठेवूनही चतुर बिबटे पिंज-याला हुलकावणी देत आहेत.मानवाने जंगली प्राण्यांच्या हक्काच्या निवा-यावर अतिक्रमण केले. त्यामुळे जंगलातील ही श्वापदे मानवी वस्तीकडे वळली. प्रवरा पट्ट्यात नगर जिल्ह्यात बहुसंख्येने साखर कारखानदारी आहे. बिबट्यांना येथे मुबलक पाणी, लपण्यासाठी उसाचा आडोसा व शेतक-यांचे पशुधन मिळत आहे. सर्व सुविधा मिळत असल्याने बिबटे उत्तर नगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात स्थिरावले आहेत. येथेच प्रजनन होत असल्याने बिबट्यांची संख्या आता वाढतच आहे.बिबटे पिंज-यात जेरबंद करण्यासाठी वनखात्याकडे केवळ एकच उपाय आहे. पिंजºयात भक्ष्य ठेवून बिबट्या जेरबंद होण्याची प्रतीक्षा करणे. मात्र आता परिसरातील चतुर बिबटे वनखात्याने पिंज-यात ठेवलेल्या भक्ष्यास बळी पडत नसल्याने बिबटे जेरबंद होण्याचे प्रमाण घटले आहे.भगवतीपूर येथील थडी फाटा परिसरात बिरोबा मंदिराजवळ लावलेल्या पिंजºयात अनेक महिन्यांपासून येथे वास्तव्यास असलेल्या तीन बिबट्यापैकी एकही बिबट्या जेरबंद झाला नाही. त्यामुळे आता वनखात्याने येथील पिंजराच अन्यत्र हलविला आहे. येथे रोजच पशुधन व कुत्री बिबट्याच्या भक्ष्यस्थानी पडत असल्याने शेतकरी चिंतातूर बनला आहे. एकाच वेळी तीन बिबट्याचे ग्रामस्थांना दर्शन झाल्याने त्याच्या दहशतीने सायंकाळी सात नंतर शेतकरी बाहेर पडत नाहीत. त्यात रात्री ११ नंतर वीज येते. दिवसभर वीज नसल्याने शेतीमध्ये पिकांना पाणी देता येत नाही, असे भगवतीपूरचे माजी उपसरपंच बी. के. खर्डे यांनी सांगितले.  

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरrahaataराहाताleopardबिबट्या