शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

बिबट्या देतोय पिंज-याला हुलकावणी;  शेतक-यांना धास्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 16:17 IST

कोल्हार व भगवतीपूर परिसरात वनखात्याने लावलेल्या पिंज-यात बिबट्या जेरबंद होणे मुश्किल झाले आहे. पिंज-यात बिबट्याचे भक्ष्य ठेवूनही चतुर बिबटे पिंज-याला हुलकावणी देत आहेत.

कोल्हार  : कोल्हार व भगवतीपूर परिसरात वनखात्याने लावलेल्या पिंज-यात बिबट्या जेरबंद होणे मुश्किल झाले आहे. पिंज-यात बिबट्याचे भक्ष्य ठेवूनही चतुर बिबटे पिंज-याला हुलकावणी देत आहेत.मानवाने जंगली प्राण्यांच्या हक्काच्या निवा-यावर अतिक्रमण केले. त्यामुळे जंगलातील ही श्वापदे मानवी वस्तीकडे वळली. प्रवरा पट्ट्यात नगर जिल्ह्यात बहुसंख्येने साखर कारखानदारी आहे. बिबट्यांना येथे मुबलक पाणी, लपण्यासाठी उसाचा आडोसा व शेतक-यांचे पशुधन मिळत आहे. सर्व सुविधा मिळत असल्याने बिबटे उत्तर नगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात स्थिरावले आहेत. येथेच प्रजनन होत असल्याने बिबट्यांची संख्या आता वाढतच आहे.बिबटे पिंज-यात जेरबंद करण्यासाठी वनखात्याकडे केवळ एकच उपाय आहे. पिंजºयात भक्ष्य ठेवून बिबट्या जेरबंद होण्याची प्रतीक्षा करणे. मात्र आता परिसरातील चतुर बिबटे वनखात्याने पिंज-यात ठेवलेल्या भक्ष्यास बळी पडत नसल्याने बिबटे जेरबंद होण्याचे प्रमाण घटले आहे.भगवतीपूर येथील थडी फाटा परिसरात बिरोबा मंदिराजवळ लावलेल्या पिंजºयात अनेक महिन्यांपासून येथे वास्तव्यास असलेल्या तीन बिबट्यापैकी एकही बिबट्या जेरबंद झाला नाही. त्यामुळे आता वनखात्याने येथील पिंजराच अन्यत्र हलविला आहे. येथे रोजच पशुधन व कुत्री बिबट्याच्या भक्ष्यस्थानी पडत असल्याने शेतकरी चिंतातूर बनला आहे. एकाच वेळी तीन बिबट्याचे ग्रामस्थांना दर्शन झाल्याने त्याच्या दहशतीने सायंकाळी सात नंतर शेतकरी बाहेर पडत नाहीत. त्यात रात्री ११ नंतर वीज येते. दिवसभर वीज नसल्याने शेतीमध्ये पिकांना पाणी देता येत नाही, असे भगवतीपूरचे माजी उपसरपंच बी. के. खर्डे यांनी सांगितले.  

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरrahaataराहाताleopardबिबट्या