शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

महाविकास आघाडी सरकारचा निष्काळजी कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:22 IST

संगमनेर : महाविकास आघाडी सरकारच्या निष्काळजी कारभारामुळे जनतेवर आता ‘माझा जीव, माझीच जबाबदारी’ असे म्हणण्याची वेळ आली ...

संगमनेर : महाविकास आघाडी सरकारच्या निष्काळजी कारभारामुळे जनतेवर आता ‘माझा जीव, माझीच जबाबदारी’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. जनतेला सल्ले देण्यापेक्षा ‘प्रवरे’प्रमाणे व्यवस्था उभी केली असती तरी कोरोनाच्या संकटात संगमनेर तालुक्याला दिलासा मिळाला असता. अशी टीका आमदार राधाकृष्ण विखे यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता केली.

संगमनेर तालुक्यातील निमोण येथे पुष्पगंध सेवाभावी संस्था आणि ग्रामपंचायतीच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या कोविड हेल्थ केअर सेंटरचे उद्घाटन शनिवारी (दि. ८) आमदार विखे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी बोलताना विखे म्हणाले, सरकारच्या घोषणा आणि नियोजन फक्त कागदावर राहिले. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या घोषणेचे काय झालेॽ महाविकास आघाडी सरकारची कोणतीच यंत्रणा मदतीला नाही. या संकटात लोकांना मदत करून आधार देण्याची गरज होती. मात्र, मंत्री फक्त दौरे करून काळजी न करण्याचे सल्ले देताना दिसतात. त्यांच्या बैठकांचा केवळ फार्स सुरू आहे. सरकारी यंत्रणेचे सोडा, जिल्ह्यातील मंत्र्यांनी स्वत:हून नागरिकांसाठी काय केले? सरकारमधील लोकांची इच्छाशक्ती संपली आहे. त्यामुळेच सामाजिक संस्था आणि तरुण कार्यकर्ते जनतेला आधार देण्यासाठी पुढे आले आहेत. गावागावांत उभारलेले कोविड हेल्थ केअर सेंटरच आता सामान्य माणसाला आधार ठरतील, असेही विखे म्हणाले.

-----------------

तेव्हा समाजातील तरुण पुढे येतात

सरकारची व्यवस्था जेव्हा अपयशी ठरते तेव्हा समाजातील तरुण धैर्याने पुढे येऊन सामान्य माणसाला आधार देण्याचे काम करतात. हीच खरी ईश्वरसेवा आहे. कोरोना संकटाची तिसरी लाट येण्याची चर्चा आता सुरू झाली आहे. आताच रुग्णांना बेड मिळत नाही, इंजेक्शन जादा दराने खरेदी करण्याची वेळ आली आहे. काही खासगी रुग्णालयात कंपाउंडर आता सल्ले देऊन रुग्ण आणि त्याच्या नातेवाइकांना घाबरवत आहेत. सरकारची कोणतीच व्यवस्था नसल्याने सामान्य माणसाला खासगी रुग्णालयांचा आश्रय घ्यावा लागल्याने त्यांच्यासमोर आर्थिक संकट मोठे उभे राहिले.